शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराचे आरोप हा राजकीय कट, केंद्राच्या खोट्या आरोपांमुळे पुरावा सापडला नाही: केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 07:47 IST

भ्रष्टाचाराचे आरोप हा केवळ राजकीय कट होता, असा आरोप आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून विरोधकांना लक्ष्य करण्याचे राजकारण सध्या सुरू आहे. मनिष सिसोदिया यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना महिनोनमहिने तुरुंगात ठेवण्यात आले, तरीही कोणीही दोषी आढळले नाही. भ्रष्टाचाराचे आरोप हा केवळ राजकीय कट होता असा आरोप आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. 

केजरीवाल म्हणाले की, खोट्या दारू धोरण प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, मात्र कोणताही पुरावा सापडला नाही आणि ६०० पानी न्यायालयीन आदेशातही खटला चालवण्यासाठी पुरेसा आधार नव्हता. 

पणजीत अरविंद केजरीवाल यांचा सत्कार करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केजरीवाल यांनी वरील आरोप केला. यावेळी त्यांच्यासोबत आपचे राज्य निमंत्रक वाल्मिकी नायक, गोवा प्रभारी आतिशी, आमदार वेंझी विएगस, क्रूझ सिल्वा, जिल्हा पंचायत सदस्य अँटोनियो लिआओ फर्नांडिस, नगरसेवक जॅक सुखिजा व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मनपा निवडणुकीतील नगरसेवक जॅक सुखिजा आणि जिल्हा पंचायत विजेते अँटोनियो लिआओ फर्नांडिस यांचाही गौरव करण्यात आला.

आपगोवा प्रभारी आतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मीकी १ नायक तसेच आमदार क्रूझ सिल्वा आणि व्हॅझी व्हिएगस यांनी या निकालाला सत्याचा विजय म्हटले. आपने स्पष्ट केले की या निर्णयामुळे पक्षाचा प्रामाणिक राजकारणासाठीचा लढा अधिक २ बळकट झाला असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपला सक्षम पर्याय म्हणून पक्ष उभा राहील.

'आप'ला रोखण्यासाठी भाजपकडून बदनामी

केजरीवाल यांनी सांगितले की, आपचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी भाजप नेतृत्वाने हा मोठा राजकीय कट रचला. सत्ता, पैसा आणि केंद्रीय यंत्रणा असूनही भाजप आपचा राजकीय पराभव करू शकला नाही, म्हणून बदनामी आणि अटकांचा मार्ग अवलंबला. दिल्ली आणि पंजाबमधील शिक्षण, आरोग्य, मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक यांसारख्या कामांमुळे आपची राजकारणाची नवी दिशा भाजपसाठी आव्हान ठरली आणि त्यामुळे पक्षाला दडपण्याचा प्रयत्न झाला.

दोन दिवसांत फोंड्याचा निर्णय

केजरीवाल फोंडा पोटनिवडणुकी संदर्भात बोलताना केजरीवाल यांनी सांगितले की, पुढील एक-दोन दिवसांत बैठक घेऊन आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. फोंड्यात कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ सांडपाणी, तुंबलेली गटारे आणि खराब पायाभूत सुविधा हे गंभीर प्रश्न आहेत. या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून, जनतेच्या प्रश्नांऐवजी राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यावर भर दिला जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kejriwal: Corruption charges a political conspiracy, no evidence found.

Web Summary : Arvind Kejriwal alleges corruption charges are a political conspiracy by BJP due to AAP's rising influence. Despite investigations, no evidence was found. He highlighted AAP's work in education and healthcare as a challenge to BJP's governance.
टॅग्स :goaगोवाAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवालPoliticsराजकारण