शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

CoronaVirus : अखेर मारेलावरील 'त्या' खलाशांना झालं भूमीचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 18:50 IST

CoronaVirus : मुंबई बंदरावर गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास ते उतरल्यानंतर येथे गोव्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा श्वास सोडला.

- सुशांत  कुंकळयेकर

मडगाव: भारतात पोहोचूनही मायभूमीवर पाय ठेवता येईल की नाही या विवंचनेत मागचे 40 दिवस जहाजावरच काढणारे ते 65 गोमंतकीय खलाशी शेवटी गुरुवारी सकाळी मुंबई बंदरावर उतरले. त्यांची तपासणी करून त्यांना हॉटेल्सवर ठेवण्यात येणार असून त्यांच्या घेतलेल्या कोविड19 चाचणीचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे. जर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली तर त्यांना गोव्यात पाठविण्यात येणार आहे.

मुंबई बंदरावर गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास ते उतरल्यानंतर येथे गोव्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा श्वास सोडला. आमचे कुटुंबीय आनंदात आहेत असे काही खलाशांनी मोबाईलवरून संपर्क करून सांगितले. 40 दिवसापूर्वी हे जहाज कोचीच्या बंदरात आले होते. या जहाजात एकूण 140 भारतीय खलाशी होते त्यातील 65 खलाशी गोवेकर होते.

या खलाशांना कोची बंदरात उतरण्यास परवानगी न मिल्यानंतर ते मुंबईत आणण्यात आले होते. तरीही त्यांना खाली उतरण्याची परवानगी न मिळाल्यामुळे हे जहाज परत युरोपमध्ये नेण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे हबकलेल्या या खलाशांनी आपला एक व्हिडीओ अपलोड करून आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून या खलाशाना भारतीय भूमीवर उतरवण्याची परवानगी मिळाली होती.

एक खलाशी म्हणाला, आमचा धीर सुटल्यानेच आम्ही तो व्हिडीओ पाठविला. त्यामुळे आमचे कुटुंबीय अधिकच चिंतेत पडले. आम्हाला युरोपमध्ये नेले असते तर आमची स्थिती आणखी बिकट झाली असती.

गुरुवारी त्यांची तपासणी झाल्यानंतर बसमधून त्यांना हॉटेलमध्ये नेण्यात आले. एकूण तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्यांची सोय करण्यात आली असून जर त्यांची कोविड19 चाचणी निगेटिव्ह आली तर शनिवारी किंवा रविवारी बसमार्गे त्यांना गोव्यात आणण्यात येईल अशी माहिती प्राप्त झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा