शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

coronavirus : 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 22:53 IST

सध्या मुंबईत अडकलेल्या 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

मडगाव - भारतीय बंदरावर असलेल्या जहाजातील भारतीय खलाशाना भूमीवर उतरण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी रात्री हिरवा कंदील दाखविल्यानंतर सध्या मुंबईत अडकलेल्या 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आणखी तीन जहाजे भारतात येण्यासाठी उद्या गुरुवारी मियामीहून सुटणार अशी माहिती मिळाली आहे. 28 मे पर्यंत ही जहाजे मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे खलाशांच्या कुटुंबामध्येही खुशीचे वातावरण पसरले आहे.

सध्या मुंबईत कर्णिका या जहाजावर 93, मारेला या जहाजावर 65 तर आंग्रेया या जहाजावर 23 गोमंतकीय खलाशी  आहेत त्यांना समुद्र मार्गानेच गोव्यात आणावे असा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात आला होता मात्र बहुतेक त्यांना बस मार्गेच गोव्यात आणले जाणार आहे. प्रत्येक बशीत 20 जणांना बसविले जाईल अशी माहिती  मिळाली आहे.

या घडामोडीवर  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी समाधान व्यक्त केले असून केलेल्या श्रमाची पावती मिळाली असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

या खलाशांना भूमीवर उतरता यावे यासाठी विषेश परिश्रम केलेले गोवन सीमेन अससोसिएशन या संघटनेचे डिक्सन वाझ याना विचारले असता,  आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अजूनही त्या खलाशाना भूमीवर उतरविण्यात आलेले नाही . मात्र मुंबईत खोल समुद्रात असलेले मारेला हे जहाज  बंदराच्या जवळ आले असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. बहुतेक गुरुवारी त्यांना खाली उतरविण्यात येईल.

मुंबईत नांगर घालून थांबलेले मारेला हे जहाज आज बुधवारी युरोपला जाण्यासाठी निघणार अशी माहिती मिळाल्यानंतर त्या जहाजावरील खलाशांच्या तोंडचे पाणी पळाले होते.  त्यांनी आपला एक व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित करताना एका दिवसात काही तरी हालचाली करा आणि आम्हाला सोडवा अशी विनंती केली होती. आमची बोट युरोपला गेल्यास आमच्या शवपेट्या आणण्याचे तुमच्या नशिबी येईल असा इशाराही दिला होता. त्यानंतर सरकारवर चारी बाजूनी दडपण येऊन दिल्लीत लगोलग सूत्रे हलून मंगळवारी रात्रीपर्यंत केंद्राचा आदेश जारी झाला होता.

यासंदर्भात बोलताना कॅ. वेंझी व्हिएगास म्हणाले, दबावाखाली जर केंद्र सरकार 24 तासात निर्णय घेऊ शकते तर इतर ठिकाणी अडकलेल्या खलाशाना आणण्यासाठी एका आठवड्यात निर्णय घेण्यास हे सरकार सक्षम आहे. सरकारने चार्टर विमानासाठी भारतीय विमानतळ खुले कारावेत एवढेच नव्हे तर विदेशात भूमीवर अडकलेल्या भरतीयांनाही भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

दरम्यान, आपल्या पतीला गोव्यात आणावे यासाठी उपोषणाला बसलेल्या जिना परेरा हिने खलाशाना भारतीय भूमीवर उतरता यावे यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेल्या प्रयत्नांना तोड नाही असे म्हणत त्यांचे धन्यवाद मानले.

चर्चिल म्हणतात मीच केले प्रयत्न

अडकलेल्या खलाशाना देशात येण्याचे मार्ग खुले झाल्यानंतर कित्येकजण त्याचे श्रेय घ्यायला पुढे आले असले तरी यासाठी सर्वप्रथम आपणच प्रयत्न केले . यासंबंधी आपण 29 मार्चला प्रधानमंत्र्यांना मेल पाठविला होता. वास्तविक त्यावेळीच या खलाशांचा देशात येण्याचा मार्ग खुला झाला होता पण निझमुद्दीन येथील मरकाजचे प्रकरण तेव्हाच उदभवल्याने तो निर्णय बारगळला गेला. या खलाशांचा देशात येण्याचा मार्ग मंगळवार बुधवारपर्यंत मोकळा होणार असे मी सांगितले होते पण मंगळवारी झालेल्या एका चर्चेत आमदार रोहन  खवटे व विजय सरदेसाई यांनी आपल्यावर नको नको ते आरोप केले पण मी जे काय सांगितले होते तेच आता खरे झाले असे चर्चिल म्हणाले.

तीन जहाजे भारताच्या वाटेवर

कार्निवल फेसिनेशन, कार्निवल लिबर्टी व एकटसी ही तीन जहाजे भारतात येण्यासाठी उद्या गुरुवारी सुटणार असून पहिली दोन जहाजे मियामीहून तर तिसरे जहाज जॅक्सनविले येथून सुटणार आहे. बार्बाडोस, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यामार्गे ती भारतात येणार आहेत. 27 किंवा 28 मेला ती मुंबईत पोहोचणार आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा