शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 22:53 IST

सध्या मुंबईत अडकलेल्या 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

मडगाव - भारतीय बंदरावर असलेल्या जहाजातील भारतीय खलाशाना भूमीवर उतरण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी रात्री हिरवा कंदील दाखविल्यानंतर सध्या मुंबईत अडकलेल्या 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आणखी तीन जहाजे भारतात येण्यासाठी उद्या गुरुवारी मियामीहून सुटणार अशी माहिती मिळाली आहे. 28 मे पर्यंत ही जहाजे मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे खलाशांच्या कुटुंबामध्येही खुशीचे वातावरण पसरले आहे.

सध्या मुंबईत कर्णिका या जहाजावर 93, मारेला या जहाजावर 65 तर आंग्रेया या जहाजावर 23 गोमंतकीय खलाशी  आहेत त्यांना समुद्र मार्गानेच गोव्यात आणावे असा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात आला होता मात्र बहुतेक त्यांना बस मार्गेच गोव्यात आणले जाणार आहे. प्रत्येक बशीत 20 जणांना बसविले जाईल अशी माहिती  मिळाली आहे.

या घडामोडीवर  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी समाधान व्यक्त केले असून केलेल्या श्रमाची पावती मिळाली असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

या खलाशांना भूमीवर उतरता यावे यासाठी विषेश परिश्रम केलेले गोवन सीमेन अससोसिएशन या संघटनेचे डिक्सन वाझ याना विचारले असता,  आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अजूनही त्या खलाशाना भूमीवर उतरविण्यात आलेले नाही . मात्र मुंबईत खोल समुद्रात असलेले मारेला हे जहाज  बंदराच्या जवळ आले असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. बहुतेक गुरुवारी त्यांना खाली उतरविण्यात येईल.

मुंबईत नांगर घालून थांबलेले मारेला हे जहाज आज बुधवारी युरोपला जाण्यासाठी निघणार अशी माहिती मिळाल्यानंतर त्या जहाजावरील खलाशांच्या तोंडचे पाणी पळाले होते.  त्यांनी आपला एक व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित करताना एका दिवसात काही तरी हालचाली करा आणि आम्हाला सोडवा अशी विनंती केली होती. आमची बोट युरोपला गेल्यास आमच्या शवपेट्या आणण्याचे तुमच्या नशिबी येईल असा इशाराही दिला होता. त्यानंतर सरकारवर चारी बाजूनी दडपण येऊन दिल्लीत लगोलग सूत्रे हलून मंगळवारी रात्रीपर्यंत केंद्राचा आदेश जारी झाला होता.

यासंदर्भात बोलताना कॅ. वेंझी व्हिएगास म्हणाले, दबावाखाली जर केंद्र सरकार 24 तासात निर्णय घेऊ शकते तर इतर ठिकाणी अडकलेल्या खलाशाना आणण्यासाठी एका आठवड्यात निर्णय घेण्यास हे सरकार सक्षम आहे. सरकारने चार्टर विमानासाठी भारतीय विमानतळ खुले कारावेत एवढेच नव्हे तर विदेशात भूमीवर अडकलेल्या भरतीयांनाही भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

दरम्यान, आपल्या पतीला गोव्यात आणावे यासाठी उपोषणाला बसलेल्या जिना परेरा हिने खलाशाना भारतीय भूमीवर उतरता यावे यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेल्या प्रयत्नांना तोड नाही असे म्हणत त्यांचे धन्यवाद मानले.

चर्चिल म्हणतात मीच केले प्रयत्न

अडकलेल्या खलाशाना देशात येण्याचे मार्ग खुले झाल्यानंतर कित्येकजण त्याचे श्रेय घ्यायला पुढे आले असले तरी यासाठी सर्वप्रथम आपणच प्रयत्न केले . यासंबंधी आपण 29 मार्चला प्रधानमंत्र्यांना मेल पाठविला होता. वास्तविक त्यावेळीच या खलाशांचा देशात येण्याचा मार्ग खुला झाला होता पण निझमुद्दीन येथील मरकाजचे प्रकरण तेव्हाच उदभवल्याने तो निर्णय बारगळला गेला. या खलाशांचा देशात येण्याचा मार्ग मंगळवार बुधवारपर्यंत मोकळा होणार असे मी सांगितले होते पण मंगळवारी झालेल्या एका चर्चेत आमदार रोहन  खवटे व विजय सरदेसाई यांनी आपल्यावर नको नको ते आरोप केले पण मी जे काय सांगितले होते तेच आता खरे झाले असे चर्चिल म्हणाले.

तीन जहाजे भारताच्या वाटेवर

कार्निवल फेसिनेशन, कार्निवल लिबर्टी व एकटसी ही तीन जहाजे भारतात येण्यासाठी उद्या गुरुवारी सुटणार असून पहिली दोन जहाजे मियामीहून तर तिसरे जहाज जॅक्सनविले येथून सुटणार आहे. बार्बाडोस, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यामार्गे ती भारतात येणार आहेत. 27 किंवा 28 मेला ती मुंबईत पोहोचणार आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा