शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

coronavirus : 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 22:53 IST

सध्या मुंबईत अडकलेल्या 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

मडगाव - भारतीय बंदरावर असलेल्या जहाजातील भारतीय खलाशाना भूमीवर उतरण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी रात्री हिरवा कंदील दाखविल्यानंतर सध्या मुंबईत अडकलेल्या 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आणखी तीन जहाजे भारतात येण्यासाठी उद्या गुरुवारी मियामीहून सुटणार अशी माहिती मिळाली आहे. 28 मे पर्यंत ही जहाजे मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे खलाशांच्या कुटुंबामध्येही खुशीचे वातावरण पसरले आहे.

सध्या मुंबईत कर्णिका या जहाजावर 93, मारेला या जहाजावर 65 तर आंग्रेया या जहाजावर 23 गोमंतकीय खलाशी  आहेत त्यांना समुद्र मार्गानेच गोव्यात आणावे असा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात आला होता मात्र बहुतेक त्यांना बस मार्गेच गोव्यात आणले जाणार आहे. प्रत्येक बशीत 20 जणांना बसविले जाईल अशी माहिती  मिळाली आहे.

या घडामोडीवर  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी समाधान व्यक्त केले असून केलेल्या श्रमाची पावती मिळाली असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

या खलाशांना भूमीवर उतरता यावे यासाठी विषेश परिश्रम केलेले गोवन सीमेन अससोसिएशन या संघटनेचे डिक्सन वाझ याना विचारले असता,  आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अजूनही त्या खलाशाना भूमीवर उतरविण्यात आलेले नाही . मात्र मुंबईत खोल समुद्रात असलेले मारेला हे जहाज  बंदराच्या जवळ आले असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. बहुतेक गुरुवारी त्यांना खाली उतरविण्यात येईल.

मुंबईत नांगर घालून थांबलेले मारेला हे जहाज आज बुधवारी युरोपला जाण्यासाठी निघणार अशी माहिती मिळाल्यानंतर त्या जहाजावरील खलाशांच्या तोंडचे पाणी पळाले होते.  त्यांनी आपला एक व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित करताना एका दिवसात काही तरी हालचाली करा आणि आम्हाला सोडवा अशी विनंती केली होती. आमची बोट युरोपला गेल्यास आमच्या शवपेट्या आणण्याचे तुमच्या नशिबी येईल असा इशाराही दिला होता. त्यानंतर सरकारवर चारी बाजूनी दडपण येऊन दिल्लीत लगोलग सूत्रे हलून मंगळवारी रात्रीपर्यंत केंद्राचा आदेश जारी झाला होता.

यासंदर्भात बोलताना कॅ. वेंझी व्हिएगास म्हणाले, दबावाखाली जर केंद्र सरकार 24 तासात निर्णय घेऊ शकते तर इतर ठिकाणी अडकलेल्या खलाशाना आणण्यासाठी एका आठवड्यात निर्णय घेण्यास हे सरकार सक्षम आहे. सरकारने चार्टर विमानासाठी भारतीय विमानतळ खुले कारावेत एवढेच नव्हे तर विदेशात भूमीवर अडकलेल्या भरतीयांनाही भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

दरम्यान, आपल्या पतीला गोव्यात आणावे यासाठी उपोषणाला बसलेल्या जिना परेरा हिने खलाशाना भारतीय भूमीवर उतरता यावे यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेल्या प्रयत्नांना तोड नाही असे म्हणत त्यांचे धन्यवाद मानले.

चर्चिल म्हणतात मीच केले प्रयत्न

अडकलेल्या खलाशाना देशात येण्याचे मार्ग खुले झाल्यानंतर कित्येकजण त्याचे श्रेय घ्यायला पुढे आले असले तरी यासाठी सर्वप्रथम आपणच प्रयत्न केले . यासंबंधी आपण 29 मार्चला प्रधानमंत्र्यांना मेल पाठविला होता. वास्तविक त्यावेळीच या खलाशांचा देशात येण्याचा मार्ग खुला झाला होता पण निझमुद्दीन येथील मरकाजचे प्रकरण तेव्हाच उदभवल्याने तो निर्णय बारगळला गेला. या खलाशांचा देशात येण्याचा मार्ग मंगळवार बुधवारपर्यंत मोकळा होणार असे मी सांगितले होते पण मंगळवारी झालेल्या एका चर्चेत आमदार रोहन  खवटे व विजय सरदेसाई यांनी आपल्यावर नको नको ते आरोप केले पण मी जे काय सांगितले होते तेच आता खरे झाले असे चर्चिल म्हणाले.

तीन जहाजे भारताच्या वाटेवर

कार्निवल फेसिनेशन, कार्निवल लिबर्टी व एकटसी ही तीन जहाजे भारतात येण्यासाठी उद्या गुरुवारी सुटणार असून पहिली दोन जहाजे मियामीहून तर तिसरे जहाज जॅक्सनविले येथून सुटणार आहे. बार्बाडोस, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यामार्गे ती भारतात येणार आहेत. 27 किंवा 28 मेला ती मुंबईत पोहोचणार आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा