शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

CoronaVirus : दिलासादायक! गोव्यात गेल्या 20 दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 21:28 IST

CoronaVirus : राज्यात एक हजारपेक्षा जास्त व्यक्तींच्या आतापर्यंत कोरोना (कोविड-19) चाचण्या केल्या आहेत.

पणजी : राज्यात गेल्या 20 दिवसांत कोरोनाचा एकही नवा कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. याबाबत सरकार समाधानी बनले आहे. तरीही परप्रांतांमधून जे कुणी आडवाटांनी गोव्यात येतात, त्यांना पकडून सक्तीने निगराणीखाली ठेवण्याचे काम सुरू आहे.

राज्यात एक हजारपेक्षा जास्त व्यक्तींच्या आतापर्यंत कोरोना (कोविड-19) चाचण्या केल्या आहेत. गेल्या 3 एप्रिल रोजी शेवटचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्याच्यावरही कोविड इस्पितळात यशस्वी उपचार केले गेले. तो रुग्ण ठीक झाला. आता राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही. शेवटचा रुग्ण सापडल्यानंतर चौदा दिवसांत जर नवा कोरोना रुग्ण सापडला नाही तर अशा कोणत्याही राज्याला अतिशय सुरक्षित मानले जाते. गोव्यात तर गेले वीस दिवस कोरोनाचा नवा पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने शासकीय यंत्रणांवरील ताण कमी झाला आहे.

आरोग्य खात्याच्या यंत्रणेकडून राज्यातील पाच हजार व्यक्तींची आता कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. याशिवाय पंचवीस हजार व्यक्तींना श्वासोश्वासाचा त्रास आहे. त्यांच्यापैकी किती जणांना विदेश किंवा देशांतर्गत प्रवासाचा इतिहास आहे, ते पाहून त्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.

1700 उद्योग सुरू राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक कामगार वापरून उद्योग सुरू करावेत असे सरकारने स्पष्ट केल्यानंतर 1 हजार 400 उद्योग प्रथम सुरू झाले. त्यानंतर आज शुक्रवारपासून आणखी तीनशे उद्योग सुरू केले जाणार आहेत. औद्योगिक वसाहतींमधील व्यवस्थापकाकडून परवानगी घेऊन हे उद्योग सुरू केले जातात. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योग सुरू आहेत. आरोग्य खात्याकडून सर्व उद्योगांतील कामगारांची यापुढे कोरोना चाचणी करण्याचा प्रस्ताव पुढे आणला गेला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा