शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

CoronaVirus News: भाजपा सरकारकडून 'त्या' १८ जणांची हत्या केली; काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 20:11 IST

कृती आराखडा जाहीर करा, अन्यथा आत्मक्लेश आंदोलन; काँग्रेसचा इशारा

मडगाव - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन अविचारी व कोणताही ठोस शास्त्रीय आधार नसलेला आहे व तो निर्णय डिफेक्टिव्ह भाजप सरकारचे प्रतिबिंब आहे. गोव्यातील असंवेदनशील व भ्रष्ट भाजप सरकारने निष्पाप १८ कोविड रुग्णांची  एकाप्रकारे हत्याच केली आहे. आज सरकारच्या बेपर्वाईमुळे जनता भयभीत झाली आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी ताबडतोब कोविड हाताळणीचा कृती आराखडा तसेच श्वेतपत्रिका जारी करावी. सरकारने त्वरित याची दखल न घेतल्यास काँग्रेस पक्ष आत्मक्लेशाचे आंदोलन करेल.

सरकारने कृती आराखडा व श्वेतपत्रातुन सर्व माहिती जनतेसमोर ठेवल्यानंतर त्याचा अभ्यास करुन आम्ही सरकारला योग्य सल्ला देऊ शकतो.

काँग्रेसने पहिल्या दिवसापासून सरकारला कोविडचा सामना करण्यासाठी योग्य सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. आमचे विधिमंडळ गट नेते तसेच चार आमदार यांनी अनेक विधायक सूचना सरकारला केल्या. सामाजिक क्षेत्रातील तज्ञ व लष्करांचे काही सदस्य यांचा टास्क फोर्स करणे, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी सर्व भुसारी दुकाने लॉकडाऊन काळात उघडी ठेवणे, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित करुन तेथे कोविड सेंटर स्थापन करणे यासह लॉकडाऊनमुळे हलाखीच्या परिस्थितीत असलेले छोटे व्यावसायिकांना १०० कोटींची आर्थिक पॅकेज देणे अशा अनेक सूचना आम्ही सरकारला केल्या. 

मुख्यमंत्र्यानी हट्टाला पेटून केलेल्या सामाजिक सर्वेक्षणाला काँग्रेसने आक्षेप घेतला होता व त्याऐवजी सामाजिक चाचणी करण्याची मागणी केली होती. मांगोरचे कोविड रुग्ण वाढू लागल्यानंतर वास्को शहर लॉकडाऊन करण्याच्या आमची मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. काँग्रेसचे आमचे दिवंगत नेते जितेंद्र देशप्रभू यांच्या निधनानंतर लगेच गोमेकोतील चाचणी व्यवस्था व आकडेवारी यांवर प्रश्न विचारले होते. परंतु, सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले व त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

लोक संकटात असताना गोव्यातील भाजप सरकार मोदींची वर्षपूर्ती व आभासी सभा घेण्यात व्यस्त होते. त्यामुळे कोविडचा संसर्ग आज संपूर्ण गोव्यात झाला आहे. सरकारने वेळ न घालवता सर्वांना विश्वासात घेऊन तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्वजण यांची बैठक घ्यावी व त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावरुन पुढची कृती ठरवावी. मागील ३ महिने काँग्रेस पक्ष मागणी करीत असलेला कृती आराखडा व श्वेतपत्रिका सरकारने ताबडतोब काढावी.