शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

CoronaVirus News: भाजपा सरकारकडून 'त्या' १८ जणांची हत्या केली; काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 20:11 IST

कृती आराखडा जाहीर करा, अन्यथा आत्मक्लेश आंदोलन; काँग्रेसचा इशारा

मडगाव - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन अविचारी व कोणताही ठोस शास्त्रीय आधार नसलेला आहे व तो निर्णय डिफेक्टिव्ह भाजप सरकारचे प्रतिबिंब आहे. गोव्यातील असंवेदनशील व भ्रष्ट भाजप सरकारने निष्पाप १८ कोविड रुग्णांची  एकाप्रकारे हत्याच केली आहे. आज सरकारच्या बेपर्वाईमुळे जनता भयभीत झाली आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी ताबडतोब कोविड हाताळणीचा कृती आराखडा तसेच श्वेतपत्रिका जारी करावी. सरकारने त्वरित याची दखल न घेतल्यास काँग्रेस पक्ष आत्मक्लेशाचे आंदोलन करेल.

सरकारने कृती आराखडा व श्वेतपत्रातुन सर्व माहिती जनतेसमोर ठेवल्यानंतर त्याचा अभ्यास करुन आम्ही सरकारला योग्य सल्ला देऊ शकतो.

काँग्रेसने पहिल्या दिवसापासून सरकारला कोविडचा सामना करण्यासाठी योग्य सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. आमचे विधिमंडळ गट नेते तसेच चार आमदार यांनी अनेक विधायक सूचना सरकारला केल्या. सामाजिक क्षेत्रातील तज्ञ व लष्करांचे काही सदस्य यांचा टास्क फोर्स करणे, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी सर्व भुसारी दुकाने लॉकडाऊन काळात उघडी ठेवणे, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित करुन तेथे कोविड सेंटर स्थापन करणे यासह लॉकडाऊनमुळे हलाखीच्या परिस्थितीत असलेले छोटे व्यावसायिकांना १०० कोटींची आर्थिक पॅकेज देणे अशा अनेक सूचना आम्ही सरकारला केल्या. 

मुख्यमंत्र्यानी हट्टाला पेटून केलेल्या सामाजिक सर्वेक्षणाला काँग्रेसने आक्षेप घेतला होता व त्याऐवजी सामाजिक चाचणी करण्याची मागणी केली होती. मांगोरचे कोविड रुग्ण वाढू लागल्यानंतर वास्को शहर लॉकडाऊन करण्याच्या आमची मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. काँग्रेसचे आमचे दिवंगत नेते जितेंद्र देशप्रभू यांच्या निधनानंतर लगेच गोमेकोतील चाचणी व्यवस्था व आकडेवारी यांवर प्रश्न विचारले होते. परंतु, सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले व त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

लोक संकटात असताना गोव्यातील भाजप सरकार मोदींची वर्षपूर्ती व आभासी सभा घेण्यात व्यस्त होते. त्यामुळे कोविडचा संसर्ग आज संपूर्ण गोव्यात झाला आहे. सरकारने वेळ न घालवता सर्वांना विश्वासात घेऊन तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्वजण यांची बैठक घ्यावी व त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावरुन पुढची कृती ठरवावी. मागील ३ महिने काँग्रेस पक्ष मागणी करीत असलेला कृती आराखडा व श्वेतपत्रिका सरकारने ताबडतोब काढावी.