शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींप्रश्नी भेंब्रेंच्या विधानाचा वाद वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 13:07 IST

दोन्ही बाजूने लोकांमध्ये विविध चर्चा : राजकारणीही उतरले मैदानात; कोंकणी भाषा मंडळाकडून सरकारवर दोषारोप

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव / पणजी:छत्रपती शिवाजी महाराजांनी बार्देशवर स्वारी केल्यानंतर शिवरायांच्या सैनिकांनी तेथील खजाना नेताना महिला व मुलांनाही ते घेऊन गेले होते, अशा अर्थाचे विधान लेखक उदय भेंब्रे यांनी केल्यानंतर लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भेंब्रे यांच्या घरी जाऊन जमावाने वाद घालणे लोकांना मान्य नाही. तसेच भेंद्रे यांची विधानेदेखील खोटी असल्याची भावना उत्तर गोव्यात व्यक्त होऊ लागली आहे.

भेंद्रे यांच्या विधानांचा वाद वाढू लागला आहे. या वादात काल आमदार विजय सरदेसाई यांनीही उडी टाकली. त्यानंतर लगेच भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी सरदेसाई यांना प्रत्युत्तर दिले आहे. माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांनीही भेंद्रे यांच्या विधानांचा निषेध केला आहे.

भैबेंच्या भूमिकेबाबत खेद वाटतो: वेलिंगकर

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही मंडळी समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी विधाने करत असून आता त्यांच्या पंक्तीला उदय भेंब्रेही जाऊन बसल्याने मनाला खेद वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. शिवराय हे पोर्तुगीजांचे मित्र होते. त्यांनी पोर्तुगीजांना हाकलण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. बार्देशवरील स्वारीवेळी त्यांनी बायकामुले पळवून नेली. तीन पार्टीना ठार मारले, अशी वक्तव्य करून भेंब्रे यांनी गोमंतकीयांची प्रतारणा केली आहे. राज्यात दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान रचले जात असून गोमंतकीयांनी सावध राहावे, असे आवाहन प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.

राजवट नव्हती म्हणणे चुकीचे : सचिन मदगे

सचिन मदगे यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्तरी, डिचोली, बार्देश, पेडणे या तालुक्यात प्रभाव दिसून येतो. नंतर त्यांनी फोंडा, सांगे, केपे भागातही आपला प्रभाव दाखवला. सप्तकोटेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण केले याविषयी काही बोलायचे नाही. चुकीचा आणि खोटा इतिहास वाचून शिवाजी महाराजांची गोव्यात काही राजवट नव्हती, असे सांगणे चुकीचे आहे.

भेंब्रे वस्तुस्थितीला धरून बोलतात : विजय

अॅड. उदय भेंद्रे हे जे काही बोलतात व लिहितात ते वस्तुस्थितीला धरून असते. ते कोणत्याही अभ्यासाशिवाय बोलत नाहीत. जर कोणाला त्यांची विधाने चुकीची वाटत असतील तर त्यांनी ती पुराव्यानिशी खोडावीत. रात्रीच्यावेळी भेंब्रे यांच्या घरी जाऊन वाद घालणे निषेधार्ह असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

हा सरदेसाईंचा ढोंगीपणा : वेर्णेकर

विजय सरदेसाई यांनी मंत्री झाल्यावर भारतीय संविधानाची शपथ घेतली. आता ते गोव्याच्या भारतीयीकरण'वर चिंता व्यक्त करीत आहेत. त्यांच्या या ढोंगीपणाला मर्यादाच राहिलेल्या नाहीत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याने महिलांचे अपहरण केल्याबद्दलच्या खोट्या गोष्टींना ते समर्थन कसे काय देतात का? एका महान मराठा राजाविरुद्ध भेंब्रे यांनी केलेल्या अपमानावर ते गप्प का आहेत? असा प्रश्नही वेर्णेकर यांनी सरदेसाई यांना केला. पोर्तुगीजधार्जिणा इतिहास सरदेसाई यांना लाभदायक असू शकतो, परंतु हिंदूंचा अपमान सहन केला जाणार नाही, असेही वेर्णेकर यांनी म्हटले आहे.

कोंकणीवाद्यांची भेंब्रे यांच्या घरी बैठक

अॅड. उदय भेब्रे यांच्या निवासस्थानी जाऊन रात्री-अपरात्री त्यांना त्रास देणाऱ्या घटनेचा कोंकणी भाषा मंडळाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच रविवारी उदय भेंब्रे यांच्या घरी याबाबत निषेध बैठक घेणार असल्याची माहिती दिली. 

टॅग्स :goaगोवाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज