शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

भाजपमध्ये धर्मगुरुंच्या विषयावरून वादाचा स्फोट; मंत्र्यांकडून पक्षाला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2024 13:00 IST

काँग्रेसची पोलिसांत तक्रार.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोव्यातील पराभवाला ख्रिस्ती धर्मगुरुच कारण असल्याचा आरोप भाजपने केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी धर्मगुरुंना दोष देऊ नका, कुठे कमी पडलो याबद्दल आत्मचिंतन करा, असा सल्ला देऊन स्वकीयांना घरचा अहेर दिला, तर सरकारात घटक असलेले मगोपचे नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही माविन यांची 'री' ओढली. दूसरीकडे काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ४ जून रोजी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण गोव्यात खिस्ती धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळेच पल्लवी धेपे हरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बुधवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनीही या आरोपांचा पुनरुच्चार केला. दक्षिण गोव्यात भाजप संपलेला नाही, असा दावा करून ख्रिस्ती धर्मगुरुंनी भाजपविरोधात कारवाया केल्या म्हणूनच पल्लवी यांना पराभव पत्करावा लागल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या आधी चर्च संस्थेच्या बड्या प्रतिनिधींनी तानावडे यांना चर्चेसाठी बोलावले. परंतु बैठक संपल्यानंतर एकत्रपणे फोटो काढू. अशी विनंती तानावडे यांनी केली तेव्हा या प्रतिनिधींनी फोटो काढण्यास नकार दिला. यावरून त्यांच्या मनात भाजपबद्दल असलेला गैरहेतू उघड होतो, असेही संकल्प यांनी म्हटले होते.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ढवळीकर म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून, ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. पराभवाच्या बाबतीत धर्मगुरुंवर निशाणा साधणे चुकीचे आहे. धर्मगुरु, मग तो ख्रिस्ती असो किंवा हिंदू चांगल्या गोष्टी सांगून समाजाला प्रबोधन करण्याचे काम ते करत असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदू धर्मगुरुंनी जो काही उपदेश केला तो हिंदू धर्मीयांनी मानून घेतला व ख्रिस्ती धर्मगुरुंनी जे काही सांगितले होते, त्याचे पालन ख्रिस्ती बांधवांनी केले. निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. आम्ही एकमेकांच्या धर्मगुरुंवर दोषारोप करणे योग्य नव्हे.'

जातीयवादाचा भाजपला फटका

भाजपने दक्षिण गोव्याचा पराभवाला धर्मगुरुना जबाबदार धरू नये. आमदार संकल्प आमोणकर व गिरीराज पै वेर्णेकरांनी ख्रिस्त धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळे पराभव झाला असे विधान केले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते समील वळवईकर यांनी सांगितले. भाजपने आतापर्यंत जातीय राजकारण केले आहे. त्याचाच त्यांना फटका बसला आहे. दक्षिण गोव्याच्या जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून त्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणले आहे, असेही ते म्हणाले.

कुठे कमी पडलो; आत्मचिंतन करावे

खिस्ती धर्मगुरुंवर केलेल्या या आरोपांवर पत्रकारांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, एकमेकांच्या धर्मगुरुंना दोष देण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याबाबत आत्मचिंतन करणे उचित ठरेल. प्रदेशाध्यक्षांनी निकालानंतर तात्काळ दिलेली ती प्रतिक्रिया होती. निवडणुका येतात व जातात. आता सर्व काही पार पडलेले आहे. त्यामुळे लोकांची कामे करण्याला प्राधान्य देऊया. दरम्यान, माविन हे दाबोळी मतदारसंघाचे आमदार आहेत. दाबोळीतही भाजपला मर्यादितच आघाडी यावेळी मिळाली.

आमचे कार्यकर्तेच कमी पडले

राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेले मगोपचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, असे मत व्यक्त करून दक्षिणेत काही मतदारसंघांमध्ये आमचे कार्यकर्तेच कमी पडले, असे बोलून दाखवले. ते म्हणाले की, आमचे कार्यकर्ते म्हणजे मला मगोपचे मडकईतील कार्यकर्ते, असे म्हणायचे आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा