शहरं
Join us  
Trending Stories
1
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
2
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
3
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
4
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
5
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
6
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
7
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
8
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
9
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
10
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
11
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
12
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
13
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
14
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
15
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
16
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
17
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
18
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
19
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
20
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये धर्मगुरुंच्या विषयावरून वादाचा स्फोट; मंत्र्यांकडून पक्षाला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2024 13:00 IST

काँग्रेसची पोलिसांत तक्रार.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोव्यातील पराभवाला ख्रिस्ती धर्मगुरुच कारण असल्याचा आरोप भाजपने केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी धर्मगुरुंना दोष देऊ नका, कुठे कमी पडलो याबद्दल आत्मचिंतन करा, असा सल्ला देऊन स्वकीयांना घरचा अहेर दिला, तर सरकारात घटक असलेले मगोपचे नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही माविन यांची 'री' ओढली. दूसरीकडे काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ४ जून रोजी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण गोव्यात खिस्ती धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळेच पल्लवी धेपे हरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बुधवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनीही या आरोपांचा पुनरुच्चार केला. दक्षिण गोव्यात भाजप संपलेला नाही, असा दावा करून ख्रिस्ती धर्मगुरुंनी भाजपविरोधात कारवाया केल्या म्हणूनच पल्लवी यांना पराभव पत्करावा लागल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या आधी चर्च संस्थेच्या बड्या प्रतिनिधींनी तानावडे यांना चर्चेसाठी बोलावले. परंतु बैठक संपल्यानंतर एकत्रपणे फोटो काढू. अशी विनंती तानावडे यांनी केली तेव्हा या प्रतिनिधींनी फोटो काढण्यास नकार दिला. यावरून त्यांच्या मनात भाजपबद्दल असलेला गैरहेतू उघड होतो, असेही संकल्प यांनी म्हटले होते.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ढवळीकर म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून, ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. पराभवाच्या बाबतीत धर्मगुरुंवर निशाणा साधणे चुकीचे आहे. धर्मगुरु, मग तो ख्रिस्ती असो किंवा हिंदू चांगल्या गोष्टी सांगून समाजाला प्रबोधन करण्याचे काम ते करत असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदू धर्मगुरुंनी जो काही उपदेश केला तो हिंदू धर्मीयांनी मानून घेतला व ख्रिस्ती धर्मगुरुंनी जे काही सांगितले होते, त्याचे पालन ख्रिस्ती बांधवांनी केले. निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. आम्ही एकमेकांच्या धर्मगुरुंवर दोषारोप करणे योग्य नव्हे.'

जातीयवादाचा भाजपला फटका

भाजपने दक्षिण गोव्याचा पराभवाला धर्मगुरुना जबाबदार धरू नये. आमदार संकल्प आमोणकर व गिरीराज पै वेर्णेकरांनी ख्रिस्त धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळे पराभव झाला असे विधान केले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते समील वळवईकर यांनी सांगितले. भाजपने आतापर्यंत जातीय राजकारण केले आहे. त्याचाच त्यांना फटका बसला आहे. दक्षिण गोव्याच्या जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून त्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणले आहे, असेही ते म्हणाले.

कुठे कमी पडलो; आत्मचिंतन करावे

खिस्ती धर्मगुरुंवर केलेल्या या आरोपांवर पत्रकारांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, एकमेकांच्या धर्मगुरुंना दोष देण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याबाबत आत्मचिंतन करणे उचित ठरेल. प्रदेशाध्यक्षांनी निकालानंतर तात्काळ दिलेली ती प्रतिक्रिया होती. निवडणुका येतात व जातात. आता सर्व काही पार पडलेले आहे. त्यामुळे लोकांची कामे करण्याला प्राधान्य देऊया. दरम्यान, माविन हे दाबोळी मतदारसंघाचे आमदार आहेत. दाबोळीतही भाजपला मर्यादितच आघाडी यावेळी मिळाली.

आमचे कार्यकर्तेच कमी पडले

राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेले मगोपचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, असे मत व्यक्त करून दक्षिणेत काही मतदारसंघांमध्ये आमचे कार्यकर्तेच कमी पडले, असे बोलून दाखवले. ते म्हणाले की, आमचे कार्यकर्ते म्हणजे मला मगोपचे मडकईतील कार्यकर्ते, असे म्हणायचे आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा