शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

भाजपमध्ये धर्मगुरुंच्या विषयावरून वादाचा स्फोट; मंत्र्यांकडून पक्षाला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2024 13:00 IST

काँग्रेसची पोलिसांत तक्रार.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोव्यातील पराभवाला ख्रिस्ती धर्मगुरुच कारण असल्याचा आरोप भाजपने केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी धर्मगुरुंना दोष देऊ नका, कुठे कमी पडलो याबद्दल आत्मचिंतन करा, असा सल्ला देऊन स्वकीयांना घरचा अहेर दिला, तर सरकारात घटक असलेले मगोपचे नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही माविन यांची 'री' ओढली. दूसरीकडे काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ४ जून रोजी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण गोव्यात खिस्ती धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळेच पल्लवी धेपे हरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बुधवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनीही या आरोपांचा पुनरुच्चार केला. दक्षिण गोव्यात भाजप संपलेला नाही, असा दावा करून ख्रिस्ती धर्मगुरुंनी भाजपविरोधात कारवाया केल्या म्हणूनच पल्लवी यांना पराभव पत्करावा लागल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या आधी चर्च संस्थेच्या बड्या प्रतिनिधींनी तानावडे यांना चर्चेसाठी बोलावले. परंतु बैठक संपल्यानंतर एकत्रपणे फोटो काढू. अशी विनंती तानावडे यांनी केली तेव्हा या प्रतिनिधींनी फोटो काढण्यास नकार दिला. यावरून त्यांच्या मनात भाजपबद्दल असलेला गैरहेतू उघड होतो, असेही संकल्प यांनी म्हटले होते.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ढवळीकर म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून, ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. पराभवाच्या बाबतीत धर्मगुरुंवर निशाणा साधणे चुकीचे आहे. धर्मगुरु, मग तो ख्रिस्ती असो किंवा हिंदू चांगल्या गोष्टी सांगून समाजाला प्रबोधन करण्याचे काम ते करत असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदू धर्मगुरुंनी जो काही उपदेश केला तो हिंदू धर्मीयांनी मानून घेतला व ख्रिस्ती धर्मगुरुंनी जे काही सांगितले होते, त्याचे पालन ख्रिस्ती बांधवांनी केले. निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. आम्ही एकमेकांच्या धर्मगुरुंवर दोषारोप करणे योग्य नव्हे.'

जातीयवादाचा भाजपला फटका

भाजपने दक्षिण गोव्याचा पराभवाला धर्मगुरुना जबाबदार धरू नये. आमदार संकल्प आमोणकर व गिरीराज पै वेर्णेकरांनी ख्रिस्त धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळे पराभव झाला असे विधान केले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते समील वळवईकर यांनी सांगितले. भाजपने आतापर्यंत जातीय राजकारण केले आहे. त्याचाच त्यांना फटका बसला आहे. दक्षिण गोव्याच्या जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून त्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणले आहे, असेही ते म्हणाले.

कुठे कमी पडलो; आत्मचिंतन करावे

खिस्ती धर्मगुरुंवर केलेल्या या आरोपांवर पत्रकारांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, एकमेकांच्या धर्मगुरुंना दोष देण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याबाबत आत्मचिंतन करणे उचित ठरेल. प्रदेशाध्यक्षांनी निकालानंतर तात्काळ दिलेली ती प्रतिक्रिया होती. निवडणुका येतात व जातात. आता सर्व काही पार पडलेले आहे. त्यामुळे लोकांची कामे करण्याला प्राधान्य देऊया. दरम्यान, माविन हे दाबोळी मतदारसंघाचे आमदार आहेत. दाबोळीतही भाजपला मर्यादितच आघाडी यावेळी मिळाली.

आमचे कार्यकर्तेच कमी पडले

राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेले मगोपचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, असे मत व्यक्त करून दक्षिणेत काही मतदारसंघांमध्ये आमचे कार्यकर्तेच कमी पडले, असे बोलून दाखवले. ते म्हणाले की, आमचे कार्यकर्ते म्हणजे मला मगोपचे मडकईतील कार्यकर्ते, असे म्हणायचे आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा