शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

भाजपमध्ये धर्मगुरुंच्या विषयावरून वादाचा स्फोट; मंत्र्यांकडून पक्षाला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2024 13:00 IST

काँग्रेसची पोलिसांत तक्रार.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोव्यातील पराभवाला ख्रिस्ती धर्मगुरुच कारण असल्याचा आरोप भाजपने केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी धर्मगुरुंना दोष देऊ नका, कुठे कमी पडलो याबद्दल आत्मचिंतन करा, असा सल्ला देऊन स्वकीयांना घरचा अहेर दिला, तर सरकारात घटक असलेले मगोपचे नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही माविन यांची 'री' ओढली. दूसरीकडे काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ४ जून रोजी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण गोव्यात खिस्ती धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळेच पल्लवी धेपे हरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बुधवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनीही या आरोपांचा पुनरुच्चार केला. दक्षिण गोव्यात भाजप संपलेला नाही, असा दावा करून ख्रिस्ती धर्मगुरुंनी भाजपविरोधात कारवाया केल्या म्हणूनच पल्लवी यांना पराभव पत्करावा लागल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या आधी चर्च संस्थेच्या बड्या प्रतिनिधींनी तानावडे यांना चर्चेसाठी बोलावले. परंतु बैठक संपल्यानंतर एकत्रपणे फोटो काढू. अशी विनंती तानावडे यांनी केली तेव्हा या प्रतिनिधींनी फोटो काढण्यास नकार दिला. यावरून त्यांच्या मनात भाजपबद्दल असलेला गैरहेतू उघड होतो, असेही संकल्प यांनी म्हटले होते.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ढवळीकर म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून, ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. पराभवाच्या बाबतीत धर्मगुरुंवर निशाणा साधणे चुकीचे आहे. धर्मगुरु, मग तो ख्रिस्ती असो किंवा हिंदू चांगल्या गोष्टी सांगून समाजाला प्रबोधन करण्याचे काम ते करत असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदू धर्मगुरुंनी जो काही उपदेश केला तो हिंदू धर्मीयांनी मानून घेतला व ख्रिस्ती धर्मगुरुंनी जे काही सांगितले होते, त्याचे पालन ख्रिस्ती बांधवांनी केले. निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. आम्ही एकमेकांच्या धर्मगुरुंवर दोषारोप करणे योग्य नव्हे.'

जातीयवादाचा भाजपला फटका

भाजपने दक्षिण गोव्याचा पराभवाला धर्मगुरुना जबाबदार धरू नये. आमदार संकल्प आमोणकर व गिरीराज पै वेर्णेकरांनी ख्रिस्त धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळे पराभव झाला असे विधान केले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते समील वळवईकर यांनी सांगितले. भाजपने आतापर्यंत जातीय राजकारण केले आहे. त्याचाच त्यांना फटका बसला आहे. दक्षिण गोव्याच्या जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून त्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणले आहे, असेही ते म्हणाले.

कुठे कमी पडलो; आत्मचिंतन करावे

खिस्ती धर्मगुरुंवर केलेल्या या आरोपांवर पत्रकारांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, एकमेकांच्या धर्मगुरुंना दोष देण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याबाबत आत्मचिंतन करणे उचित ठरेल. प्रदेशाध्यक्षांनी निकालानंतर तात्काळ दिलेली ती प्रतिक्रिया होती. निवडणुका येतात व जातात. आता सर्व काही पार पडलेले आहे. त्यामुळे लोकांची कामे करण्याला प्राधान्य देऊया. दरम्यान, माविन हे दाबोळी मतदारसंघाचे आमदार आहेत. दाबोळीतही भाजपला मर्यादितच आघाडी यावेळी मिळाली.

आमचे कार्यकर्तेच कमी पडले

राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेले मगोपचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, असे मत व्यक्त करून दक्षिणेत काही मतदारसंघांमध्ये आमचे कार्यकर्तेच कमी पडले, असे बोलून दाखवले. ते म्हणाले की, आमचे कार्यकर्ते म्हणजे मला मगोपचे मडकईतील कार्यकर्ते, असे म्हणायचे आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा