शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

विभाजनाचे षडयंत्र हाणून पाडू, देश प्रथम हे भारताचे तत्त्व: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 09:32 IST

साखळीत एकता दौडला प्रतिसाद.

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : विविधतेतून एकता जपणाऱ्या सर्वधर्म समभाव मानून एकसंध असलेल्या भारत देशात काही असंतुष्ट आत्मे देश विघटन करण्याचे षडयंत्र करीत आहेत. तुकडे तुकडे गँगचा नायनाट करून सर्व देश बांधवांनी एकतेचा संदेश देत मजबूत भारत, विकसित भारत व विश्वगुरू भारताचे स्वप्न साकारण्यासाठी एकसंध राहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

राष्ट्रीय एकतादिनानिमित्त साखळी येथे आयोजित केलेल्या एकता दौड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वांना एकतेची शपथ दिली. देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व राज्यांना, प्रदेशांना एकत्र आणण्याचे काम केले.

यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवा, ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी एकता दौडचा प्रारंभ केला. तसेच त्यांनी पूर्ण सहभाग दिला. यावेळी नगराध्यक्ष रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, सिद्धी पोरोब दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, राया पार्सेकर इतर सर्व नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित मार्गदर्शन करणारी भाषणे झाली.

नवभारताचे स्वप्न साकारूया....

एकेकाळी काश्मीर हा देशात असूनही वेगळा प्रदेश मानला जात असे. २०१३ साली दोन लाख युवकांनी त्याठिकाणी जाऊन तिरंगा फडकावला. त्यात आपलाही सहभाग होता, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकारताना ३७० कलम रद्द केले. तसेच अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. देशाचे विघटन करू पाहणाऱ्या तुकडे गँगचा नायनाट करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. युवा पिढीने भारत एकसंध ठेवण्याची शपथ घेताना आपले योगदान द्यावे व नवभारताचे स्वप्न साकार करावे, तसेच पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करूया, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत