शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

विभाजनाचे षडयंत्र हाणून पाडू, देश प्रथम हे भारताचे तत्त्व: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 09:32 IST

साखळीत एकता दौडला प्रतिसाद.

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : विविधतेतून एकता जपणाऱ्या सर्वधर्म समभाव मानून एकसंध असलेल्या भारत देशात काही असंतुष्ट आत्मे देश विघटन करण्याचे षडयंत्र करीत आहेत. तुकडे तुकडे गँगचा नायनाट करून सर्व देश बांधवांनी एकतेचा संदेश देत मजबूत भारत, विकसित भारत व विश्वगुरू भारताचे स्वप्न साकारण्यासाठी एकसंध राहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

राष्ट्रीय एकतादिनानिमित्त साखळी येथे आयोजित केलेल्या एकता दौड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वांना एकतेची शपथ दिली. देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व राज्यांना, प्रदेशांना एकत्र आणण्याचे काम केले.

यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवा, ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी एकता दौडचा प्रारंभ केला. तसेच त्यांनी पूर्ण सहभाग दिला. यावेळी नगराध्यक्ष रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, सिद्धी पोरोब दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, राया पार्सेकर इतर सर्व नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित मार्गदर्शन करणारी भाषणे झाली.

नवभारताचे स्वप्न साकारूया....

एकेकाळी काश्मीर हा देशात असूनही वेगळा प्रदेश मानला जात असे. २०१३ साली दोन लाख युवकांनी त्याठिकाणी जाऊन तिरंगा फडकावला. त्यात आपलाही सहभाग होता, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकारताना ३७० कलम रद्द केले. तसेच अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. देशाचे विघटन करू पाहणाऱ्या तुकडे गँगचा नायनाट करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. युवा पिढीने भारत एकसंध ठेवण्याची शपथ घेताना आपले योगदान द्यावे व नवभारताचे स्वप्न साकार करावे, तसेच पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करूया, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत