शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

विभाजनाचे षडयंत्र हाणून पाडू, देश प्रथम हे भारताचे तत्त्व: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 09:32 IST

साखळीत एकता दौडला प्रतिसाद.

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : विविधतेतून एकता जपणाऱ्या सर्वधर्म समभाव मानून एकसंध असलेल्या भारत देशात काही असंतुष्ट आत्मे देश विघटन करण्याचे षडयंत्र करीत आहेत. तुकडे तुकडे गँगचा नायनाट करून सर्व देश बांधवांनी एकतेचा संदेश देत मजबूत भारत, विकसित भारत व विश्वगुरू भारताचे स्वप्न साकारण्यासाठी एकसंध राहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

राष्ट्रीय एकतादिनानिमित्त साखळी येथे आयोजित केलेल्या एकता दौड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वांना एकतेची शपथ दिली. देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व राज्यांना, प्रदेशांना एकत्र आणण्याचे काम केले.

यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवा, ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी एकता दौडचा प्रारंभ केला. तसेच त्यांनी पूर्ण सहभाग दिला. यावेळी नगराध्यक्ष रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, सिद्धी पोरोब दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, राया पार्सेकर इतर सर्व नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित मार्गदर्शन करणारी भाषणे झाली.

नवभारताचे स्वप्न साकारूया....

एकेकाळी काश्मीर हा देशात असूनही वेगळा प्रदेश मानला जात असे. २०१३ साली दोन लाख युवकांनी त्याठिकाणी जाऊन तिरंगा फडकावला. त्यात आपलाही सहभाग होता, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकारताना ३७० कलम रद्द केले. तसेच अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. देशाचे विघटन करू पाहणाऱ्या तुकडे गँगचा नायनाट करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. युवा पिढीने भारत एकसंध ठेवण्याची शपथ घेताना आपले योगदान द्यावे व नवभारताचे स्वप्न साकार करावे, तसेच पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करूया, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत