शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भंडारी समाजाची मते लक्षात घेऊन गोव्यातील मंत्रीमंडळात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:15 IST

वास्को: गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघ भाजपने जिंकल्याने हा तालुका त्यांच्यासाठी बालेकिल्ला ठरलेला आहे. असे असले तरी या तालुक्यातील वास्को मतदारसंघाचे आमदार कार्लुस आल्मेदा सध्या आजारी आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भंडारी समाज भाजपकडे आणखीन जास्त जवळ यावा म्हणून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिल्याचे स्पष्ट होते.नाईक ...

वास्को: गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघ भाजपने जिंकल्याने हा तालुका त्यांच्यासाठी बालेकिल्ला ठरलेला आहे. असे असले तरी या तालुक्यातील वास्को मतदारसंघाचे आमदार कार्लुस आल्मेदा सध्या आजारी आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भंडारी समाज भाजपकडे आणखीन जास्त जवळ यावा म्हणून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिल्याचे स्पष्ट होते.

नाईक सलग तीन वेळा (२००७, २०१२ व २०१७) विजयी झाले आहेत. २०१२ ते २०१७ या काळात ते मंत्री होते. आता ते पुन्हा मंत्री झालेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवाराला पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी त्यांचा समावेश झाल्याचे स्पष्ट आहे. ते भंडारी या बहुजन समाजाचे नेते आहेत. याचाही विचार मंत्रिपद देण्यामागे आहेच. त्यांनी वीजमंत्री व इतर काही मंत्रिपदे सांभाळलेली आहेत.

आमदार बनण्यापूर्वी ते मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवकही होते. २०१७ मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकांनंतर भाजपला दुसऱ्या पक्षांचा पाठींबा घेऊन युतीचे सरकार घडवावे लागले. परिणामी नाईक यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही.

खरे तर राज्यात २०१७ च्या निवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला. त्यांचे फक्त १३ उमेदवार विजयी झाले. अशा स्थितीत सरकार स्थापन करण्यात मुरगाव तालुका भाजपसाठी महत्त्वाचा ठरला. तालुक्यातील चारही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे नाईक यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार असा उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यात होता. मात्र काँग्रेस पक्ष सोडून भाजपात आलेले दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांची वर्णी लागली. परिणामी नाईक यांचे कार्यकर्ते खूप नाराज झालेले. नाईक यांनी मात्र पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले होते.

आता मुरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त ख्रिस्ती बांधवांची मते भाजपच्या बाजूने आणण्यासाठी मंत्री नाईक, मंत्री गुदिन्हो प्रयत्न करतील. दुसरे असे की मुरगाव तालुक्यातील वास्को, कुठ्ठाळी, दाबोळी व मुरगाव अशा चारही मतदारसंघातील भंडारी बहुजन समाजाची मते राखण्यात नाईक महत्त्वाचा वाटा राहू शकतो. या कारणांसाठीच मंत्रीपदाची खुर्ची देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे राजकीय अभ्यासकांना वाटते. मंत्रीमंडळातील बदल पाहता भाजपने दक्षिण गोव्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस