शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

भंडारी समाजाची मते लक्षात घेऊन गोव्यातील मंत्रीमंडळात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:15 IST

वास्को: गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघ भाजपने जिंकल्याने हा तालुका त्यांच्यासाठी बालेकिल्ला ठरलेला आहे. असे असले तरी या तालुक्यातील वास्को मतदारसंघाचे आमदार कार्लुस आल्मेदा सध्या आजारी आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भंडारी समाज भाजपकडे आणखीन जास्त जवळ यावा म्हणून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिल्याचे स्पष्ट होते.नाईक ...

वास्को: गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघ भाजपने जिंकल्याने हा तालुका त्यांच्यासाठी बालेकिल्ला ठरलेला आहे. असे असले तरी या तालुक्यातील वास्को मतदारसंघाचे आमदार कार्लुस आल्मेदा सध्या आजारी आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भंडारी समाज भाजपकडे आणखीन जास्त जवळ यावा म्हणून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिल्याचे स्पष्ट होते.

नाईक सलग तीन वेळा (२००७, २०१२ व २०१७) विजयी झाले आहेत. २०१२ ते २०१७ या काळात ते मंत्री होते. आता ते पुन्हा मंत्री झालेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवाराला पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी त्यांचा समावेश झाल्याचे स्पष्ट आहे. ते भंडारी या बहुजन समाजाचे नेते आहेत. याचाही विचार मंत्रिपद देण्यामागे आहेच. त्यांनी वीजमंत्री व इतर काही मंत्रिपदे सांभाळलेली आहेत.

आमदार बनण्यापूर्वी ते मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवकही होते. २०१७ मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकांनंतर भाजपला दुसऱ्या पक्षांचा पाठींबा घेऊन युतीचे सरकार घडवावे लागले. परिणामी नाईक यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही.

खरे तर राज्यात २०१७ च्या निवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला. त्यांचे फक्त १३ उमेदवार विजयी झाले. अशा स्थितीत सरकार स्थापन करण्यात मुरगाव तालुका भाजपसाठी महत्त्वाचा ठरला. तालुक्यातील चारही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे नाईक यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार असा उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यात होता. मात्र काँग्रेस पक्ष सोडून भाजपात आलेले दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांची वर्णी लागली. परिणामी नाईक यांचे कार्यकर्ते खूप नाराज झालेले. नाईक यांनी मात्र पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले होते.

आता मुरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त ख्रिस्ती बांधवांची मते भाजपच्या बाजूने आणण्यासाठी मंत्री नाईक, मंत्री गुदिन्हो प्रयत्न करतील. दुसरे असे की मुरगाव तालुक्यातील वास्को, कुठ्ठाळी, दाबोळी व मुरगाव अशा चारही मतदारसंघातील भंडारी बहुजन समाजाची मते राखण्यात नाईक महत्त्वाचा वाटा राहू शकतो. या कारणांसाठीच मंत्रीपदाची खुर्ची देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे राजकीय अभ्यासकांना वाटते. मंत्रीमंडळातील बदल पाहता भाजपने दक्षिण गोव्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस