शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

भंडारी समाजाची मते लक्षात घेऊन गोव्यातील मंत्रीमंडळात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:15 IST

वास्को: गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघ भाजपने जिंकल्याने हा तालुका त्यांच्यासाठी बालेकिल्ला ठरलेला आहे. असे असले तरी या तालुक्यातील वास्को मतदारसंघाचे आमदार कार्लुस आल्मेदा सध्या आजारी आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भंडारी समाज भाजपकडे आणखीन जास्त जवळ यावा म्हणून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिल्याचे स्पष्ट होते.नाईक ...

वास्को: गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघ भाजपने जिंकल्याने हा तालुका त्यांच्यासाठी बालेकिल्ला ठरलेला आहे. असे असले तरी या तालुक्यातील वास्को मतदारसंघाचे आमदार कार्लुस आल्मेदा सध्या आजारी आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भंडारी समाज भाजपकडे आणखीन जास्त जवळ यावा म्हणून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिल्याचे स्पष्ट होते.

नाईक सलग तीन वेळा (२००७, २०१२ व २०१७) विजयी झाले आहेत. २०१२ ते २०१७ या काळात ते मंत्री होते. आता ते पुन्हा मंत्री झालेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवाराला पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी त्यांचा समावेश झाल्याचे स्पष्ट आहे. ते भंडारी या बहुजन समाजाचे नेते आहेत. याचाही विचार मंत्रिपद देण्यामागे आहेच. त्यांनी वीजमंत्री व इतर काही मंत्रिपदे सांभाळलेली आहेत.

आमदार बनण्यापूर्वी ते मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवकही होते. २०१७ मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकांनंतर भाजपला दुसऱ्या पक्षांचा पाठींबा घेऊन युतीचे सरकार घडवावे लागले. परिणामी नाईक यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही.

खरे तर राज्यात २०१७ च्या निवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला. त्यांचे फक्त १३ उमेदवार विजयी झाले. अशा स्थितीत सरकार स्थापन करण्यात मुरगाव तालुका भाजपसाठी महत्त्वाचा ठरला. तालुक्यातील चारही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे नाईक यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार असा उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यात होता. मात्र काँग्रेस पक्ष सोडून भाजपात आलेले दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांची वर्णी लागली. परिणामी नाईक यांचे कार्यकर्ते खूप नाराज झालेले. नाईक यांनी मात्र पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले होते.

आता मुरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त ख्रिस्ती बांधवांची मते भाजपच्या बाजूने आणण्यासाठी मंत्री नाईक, मंत्री गुदिन्हो प्रयत्न करतील. दुसरे असे की मुरगाव तालुक्यातील वास्को, कुठ्ठाळी, दाबोळी व मुरगाव अशा चारही मतदारसंघातील भंडारी बहुजन समाजाची मते राखण्यात नाईक महत्त्वाचा वाटा राहू शकतो. या कारणांसाठीच मंत्रीपदाची खुर्ची देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे राजकीय अभ्यासकांना वाटते. मंत्रीमंडळातील बदल पाहता भाजपने दक्षिण गोव्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस