शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

भावना दुखविणारे खुळे; संवेदनशील विषयांना नखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2024 08:08 IST

गेल्या आठ दिवसांत जनतेमधून याबाबत उठाव झाला.

सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र झाले आहे. कुणीही हातात स्मार्ट फोन घेतो आणि ऊठसूट अत्यंत आक्षेपार्ह भाषेत इतर धर्माच्या व्यक्तीविषयी बोलतो. कुणी पुजाऱ्यांना दोष देतो, कुणी देव-देवतांना, तर कुणी मंदिरे व चर्च यांच्याभोवती वाद उभे करतात. आपण काय बोलतो, कोणत्या विषयावर व्हिडीओ काढतो, आपण किती संवेदनशील विषयाला नख लावतो आहोत, याचे भान अनेकांना अलीकडे राहिलेले नाही. काहीजण यापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पकडले गेले आहेत. अशा आक्षेपार्ह विधानांकडे समाजही काहीवेळा दुर्लक्ष करतो. मात्र अलीकडे हे संताप आणणारे खुळचट प्रकार वाढले आहेत. विशेषतः हिंदू समाजबांधवांना गृहीत धरून त्यांच्या श्रद्धास्थानांविषयी वाट्टेल त्या प्रकारचे व्हिडीओ काढून व्हायरल करण्याचे खूळ काहीजणांच्या डोक्यात घुसले आहे. त्याविरुद्ध आवाज उठविण्याची, लढण्याची गरज होतीच. गेल्या आठ दिवसांत जनतेमधून याबाबत उठाव झाला.

श्रद्धा व अंधश्रद्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; मात्र अतिरेकी व अविवेकी भाषा वापरून कुणाच्या धार्मिक व जातीय भावना दुखविण्याचा अधिकार कुणालाच नाही. वाद जमिनीचा असेल तर तो न्यायालयात योग्य ते पुरावे सादर करून सोडवायला हवा. न्याय मागण्यासाठी विविध व्यासपीठे आहेत; मात्र जमिनीचा विषय किंवा मालकीचा प्रश्न राहिला बाजूला, त्याऐवजी देवतांना, भक्तांना व धोंडांना अकारण दोष देऊन, आक्षेपार्ह शब्द वापरून आपणच आपल्या अकलेचे दिवाळे काढत आहोत, याचे भान अशा लोकांना राहिलेले नाही. प्रत्येक वादाला व विषयाला दुसरी बाजूदेखील असते. ती समजून न घेता थेट धार्मिक भावनांवर हल्ले करून जगावेगळे प्रश्न विचारणारे काही घटक गोव्यात विविध तालुक्यांमध्ये आहेत. 

कधी परशुरामाविषयी वाद निर्माण करणारेही येथे पाहायला मिळाले. दुसऱ्याच्या प्रार्थनास्थळाविषयी गैरउद्‌गार काढून किंवा दुसऱ्याची श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे, असे दाखविण्याच्या नादात काहीजण खूप वाहवत जातात. काही अतिरेकी व अविवेकी व्यक्तींमुळे मूळ चळवळींचीदेखील हानी होते. उदाहरणार्थ काहीजण खरोखरच बुरसट व खुळचट प्रथांविरुद्ध प्रामाणिकपणे लढत असतील तर त्यात भलतेच वेडगळ लोक घुसतात आणि हिंदूच्या श्रद्धास्थानांवर हल्ले करून धार्मिक भावना दुखवतात. यातून मग मूळ चळवळीचा हेतूच नष्ट होतो. अर्थात कुंकळ्ळी किंवा डिचोलीत जो विषय झाला, तो थोडा वेगळा आहे. तिथे तर भक्तांना किंवा देवीला किंवा मंदिराला दोष देण्याचे कारणच नव्हते. 

समजा एखाद्याला जमिनीच्या मालकीविषयी शंका किंवा तक्रार असती तर न्यायालयात धाव घेता आली असती, लोकांच्या आडनावांवरून किंवा भक्तांच्या हेतू व श्रद्धांवरून वाद निर्माण करण्याचे किंवा अपशब्द वापरण्याचे कारणच नव्हते. सर्वच लोकांना किंवा महाजनांना अकारण दुखवण्याचे काम संबंधितांनी व्हिडीओ काढून केले आहे. एक-दोघांना पोलिसांनी अटकही केली.

गोवा मुक्ती लढ्यात कुंकळ्ळीच्या लोकांचे योगदान खूपच मोठे आहे. पोर्तुगीज राजवटीविरुद्ध तेथील भूमिपुत्रांनी दिलेला लढा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. ज्या काळात पोर्तुगीजांमधील काही घटक खूप अत्याचार करत होते, त्या काळात आपले देव-देवता, मंदिरे, धर्म या गोष्टी जपून ठेवण्यासाठी लढणे हे खूप शौर्याचे होते. गोव्यातील काहीजणांना ते जमले नाही. काहीजण तटस्थ राहिले, तर काहीजण शरण गेले. काहीजणांनी परराज्यात जाऊन राहणे पसंत केले. 

पोर्तुगीज काळात हिंदू मंदिरे किंवा मराठी शाळा जपण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी जुन्या काळातील एका पिढीने खूप हालअपेष्टा सोसल्या आहेत, याची कल्पना नव्या पिढीला नसेल. देवी-दैवतांवरील श्रद्धेतूनच गोमंतकीय भूमिपुत्रांना व कुंकळ्ळीच्या लोकांना शौर्याची प्रेरणा व वारसा मिळाला, असे एका मर्यादित अर्थाने म्हणता येईल. लोकांच्या आडनावांविषयी वगैरे प्रश्न उपस्थित करून आपण कोणता पराक्रम करीत आहोत, याचा विचार संबंधितांनी करायला हवा. कुंकळ्ळीचा विषय घेऊन काहीजणांनी शिरगावच्या लईराई देवीच्या धोंडांबाबतही चुकीची भाषा वापरली. धोंडांचे चुकीचे वर्णन केले. त्यामुळेही लोक खवळले आणि डिचोलीतील नागरिकांनी पोलिस स्थानकावर धडक दिली. लोकांना रस्त्यावर उतरावे लागले. धार्मिक छेड काढणाऱ्यांनी धडा घ्यायला हवा.

टॅग्स :goaगोवा