शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

भावना दुखविणारे खुळे; संवेदनशील विषयांना नखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2024 08:08 IST

गेल्या आठ दिवसांत जनतेमधून याबाबत उठाव झाला.

सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र झाले आहे. कुणीही हातात स्मार्ट फोन घेतो आणि ऊठसूट अत्यंत आक्षेपार्ह भाषेत इतर धर्माच्या व्यक्तीविषयी बोलतो. कुणी पुजाऱ्यांना दोष देतो, कुणी देव-देवतांना, तर कुणी मंदिरे व चर्च यांच्याभोवती वाद उभे करतात. आपण काय बोलतो, कोणत्या विषयावर व्हिडीओ काढतो, आपण किती संवेदनशील विषयाला नख लावतो आहोत, याचे भान अनेकांना अलीकडे राहिलेले नाही. काहीजण यापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पकडले गेले आहेत. अशा आक्षेपार्ह विधानांकडे समाजही काहीवेळा दुर्लक्ष करतो. मात्र अलीकडे हे संताप आणणारे खुळचट प्रकार वाढले आहेत. विशेषतः हिंदू समाजबांधवांना गृहीत धरून त्यांच्या श्रद्धास्थानांविषयी वाट्टेल त्या प्रकारचे व्हिडीओ काढून व्हायरल करण्याचे खूळ काहीजणांच्या डोक्यात घुसले आहे. त्याविरुद्ध आवाज उठविण्याची, लढण्याची गरज होतीच. गेल्या आठ दिवसांत जनतेमधून याबाबत उठाव झाला.

श्रद्धा व अंधश्रद्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; मात्र अतिरेकी व अविवेकी भाषा वापरून कुणाच्या धार्मिक व जातीय भावना दुखविण्याचा अधिकार कुणालाच नाही. वाद जमिनीचा असेल तर तो न्यायालयात योग्य ते पुरावे सादर करून सोडवायला हवा. न्याय मागण्यासाठी विविध व्यासपीठे आहेत; मात्र जमिनीचा विषय किंवा मालकीचा प्रश्न राहिला बाजूला, त्याऐवजी देवतांना, भक्तांना व धोंडांना अकारण दोष देऊन, आक्षेपार्ह शब्द वापरून आपणच आपल्या अकलेचे दिवाळे काढत आहोत, याचे भान अशा लोकांना राहिलेले नाही. प्रत्येक वादाला व विषयाला दुसरी बाजूदेखील असते. ती समजून न घेता थेट धार्मिक भावनांवर हल्ले करून जगावेगळे प्रश्न विचारणारे काही घटक गोव्यात विविध तालुक्यांमध्ये आहेत. 

कधी परशुरामाविषयी वाद निर्माण करणारेही येथे पाहायला मिळाले. दुसऱ्याच्या प्रार्थनास्थळाविषयी गैरउद्‌गार काढून किंवा दुसऱ्याची श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे, असे दाखविण्याच्या नादात काहीजण खूप वाहवत जातात. काही अतिरेकी व अविवेकी व्यक्तींमुळे मूळ चळवळींचीदेखील हानी होते. उदाहरणार्थ काहीजण खरोखरच बुरसट व खुळचट प्रथांविरुद्ध प्रामाणिकपणे लढत असतील तर त्यात भलतेच वेडगळ लोक घुसतात आणि हिंदूच्या श्रद्धास्थानांवर हल्ले करून धार्मिक भावना दुखवतात. यातून मग मूळ चळवळीचा हेतूच नष्ट होतो. अर्थात कुंकळ्ळी किंवा डिचोलीत जो विषय झाला, तो थोडा वेगळा आहे. तिथे तर भक्तांना किंवा देवीला किंवा मंदिराला दोष देण्याचे कारणच नव्हते. 

समजा एखाद्याला जमिनीच्या मालकीविषयी शंका किंवा तक्रार असती तर न्यायालयात धाव घेता आली असती, लोकांच्या आडनावांवरून किंवा भक्तांच्या हेतू व श्रद्धांवरून वाद निर्माण करण्याचे किंवा अपशब्द वापरण्याचे कारणच नव्हते. सर्वच लोकांना किंवा महाजनांना अकारण दुखवण्याचे काम संबंधितांनी व्हिडीओ काढून केले आहे. एक-दोघांना पोलिसांनी अटकही केली.

गोवा मुक्ती लढ्यात कुंकळ्ळीच्या लोकांचे योगदान खूपच मोठे आहे. पोर्तुगीज राजवटीविरुद्ध तेथील भूमिपुत्रांनी दिलेला लढा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. ज्या काळात पोर्तुगीजांमधील काही घटक खूप अत्याचार करत होते, त्या काळात आपले देव-देवता, मंदिरे, धर्म या गोष्टी जपून ठेवण्यासाठी लढणे हे खूप शौर्याचे होते. गोव्यातील काहीजणांना ते जमले नाही. काहीजण तटस्थ राहिले, तर काहीजण शरण गेले. काहीजणांनी परराज्यात जाऊन राहणे पसंत केले. 

पोर्तुगीज काळात हिंदू मंदिरे किंवा मराठी शाळा जपण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी जुन्या काळातील एका पिढीने खूप हालअपेष्टा सोसल्या आहेत, याची कल्पना नव्या पिढीला नसेल. देवी-दैवतांवरील श्रद्धेतूनच गोमंतकीय भूमिपुत्रांना व कुंकळ्ळीच्या लोकांना शौर्याची प्रेरणा व वारसा मिळाला, असे एका मर्यादित अर्थाने म्हणता येईल. लोकांच्या आडनावांविषयी वगैरे प्रश्न उपस्थित करून आपण कोणता पराक्रम करीत आहोत, याचा विचार संबंधितांनी करायला हवा. कुंकळ्ळीचा विषय घेऊन काहीजणांनी शिरगावच्या लईराई देवीच्या धोंडांबाबतही चुकीची भाषा वापरली. धोंडांचे चुकीचे वर्णन केले. त्यामुळेही लोक खवळले आणि डिचोलीतील नागरिकांनी पोलिस स्थानकावर धडक दिली. लोकांना रस्त्यावर उतरावे लागले. धार्मिक छेड काढणाऱ्यांनी धडा घ्यायला हवा.

टॅग्स :goaगोवा