शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

चक्रीवादळाचे कमी दाबाच्या पट्ट्यांत रुपांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 20:18 IST

पणजी: अपेक्षेप्रमाणे ओखी चक्रीवादळ मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्ण शमल्याचा निर्वाळा हवामान खात्याने दिला असून, गुजरात किना-यावरून भूभागात घुसलेले हे वादळ केवळ कमी दाबाचा पट्टा बनल्याचेही खात्याने म्हटले आहे.

पणजी: अपेक्षेप्रमाणे ओखी चक्रीवादळ मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्ण शमल्याचा निर्वाळा हवामान खात्याने दिला असून, गुजरात किना-यावरून भूभागात घुसलेले हे वादळ केवळ कमी दाबाचा पट्टा बनल्याचेही खात्याने म्हटले आहे. सोमवारीच मंदावलेल्या ओखी वादळाने नंतर काही नुकसानी केली नाही, परंतु बदलेल्या हवामानामुळे राज्यात मंगळवारी जोरदार पाऊस पडला. पावसाला वा-याची साथ नव्हती, मात्र पाऊस राज्यात सर्वत्र पडला. अजूनही गोव्यावर पावसाच्या ढगांची दाटी झाल्याचे हवामान खात्याच्या रडारद्वारे मिळालेल्या छायाचित्रतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे बुधवारीही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सद्य परिस्थितीत काणकोण किनारपट्टी भागात आणि तिसवाडीत ढगांची दाटी दिसून येते.सोमवारी ताशी 120 ते 130 किलोमीटर गतीने धावणा-या चक्रीवादळाची गती मंगळवारी साडेपाच वाजता ताशी 55 ते 75 किलोमीटर एवढा उतरल्यामुळे हवामान खात्याने चक्रीवादळाचे रुपांतर खोल कमी दाबाच्या पट्ट्यात झाल्याचे जाहीर केले. बुधवारी पहाटेपर्यंत तो केवळ कमी दाबाचा पट्टा राहणार आहे आणि संध्याकाळी स्थिती पूर्वपदावर येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

टॅग्स :goaगोवाOckhi Cycloneओखी चक्रीवादळ