शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

काँग्रेसने गोव्याशी दुजाभाव केला; मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2024 13:12 IST

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: काँग्रेस सरकारने गोव्याचा काहीच विकास केला नाहीं. केंद्रात, राज्यात सत्ता असतानाही गोव्याला सावत्रपणाची वागणूक दिली. विकासासाठी निधी असो की गोव्याला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याबाबत विषय काँग्रेसने नेहमीच दुजाभाव केला, अशी टीका मुख्यमंत्री डी. प्रमोद सावंत यांनी काल केली. खासदार श्रीपाद नाईक यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी नियुक्ती केल्याबद्दल काल प्रदेश भाजपकडून पणजीत सत्कार केल्ला. मिनेझिस ब्रोगाझा सभागृहात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री माचिन गुदिन्हो, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार डिलायला लोबो, आमदार डॉ. दिव्या राणे, उल्हास नाईक तुवेकर, संकल्प आमोणकर, प्रेमेंद्र शेट, रुदोल्फ फर्नाडिस, माजी खासदार अॅड, नरेंद्र सावईकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीपाद नाईक हे सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत ते १ लाख २७ हजार मताधिक्याने निवडून आले असून एवडे मताधिक्य पहिल्यांदाच मिळाले. गोया है लहान राज्य असून केवळ दोनच खासदार आहेत. मात्र असे असूनही भाजप सरकारने गोव्याला नेहमीच गांभीर्याने घेतले.

भाजपचा गोव्यातून एक खासदार निवडून आला तरी भाजप सरकार त्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले. श्रीपादभाऊ है केंद्रात १५ वर्ष मंत्री म्हणून गोव्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यावरूनच भाजपचे गोव्यावर असलेले प्रेम दिसून येते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निधी देण्यात आखडता हात 

काँग्रेसने गोव्याला कधीच गांभीर्याने घेतले नाही, मग ते विकासाच्याबाबतीत असो की निधीच्याबाबतीत, त्याचबरोबर गोव्याला केंद्रीय मंत्रिमंडळातही प्रतिनिधित्व देण्याविषयी काँग्रेसमध्ये उदासीनता होती. गोष्यातून काँग्रेसचे खासदार निवडून आले तरी काँग्रेस सरकारने त्यांना दुर्लक्षित केले. काँग्रेसने विकास कामांसाठी हवा तितका निधीं कधीच दिला नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

विरोधकांना सत्य दिसेना 

राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, आपला आजचा सत्कार हा भाजप पक्षाच्या सामान्य कार्यकत्यांचा सत्कार आहे. निवडणुकीत विरोधकांकडे आपल्याला विरोधात कुठलेही मुद्दे नव्हते. त्यामुळे उत्तर गोव्यातील विकासाचा मुद्दा त्यांनी काडला. खरे तर देशात विकासाबाबत उत्तर गीचा हा दहाव्या स्थानी आहे है विरोधक विसरले आहेत, असा टोलाही लगावला.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण