शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पणजीतील मल्टिप्लेक्स पाडून नवीन बांधण्यास काँग्रेसचा जोरदार विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 15:34 IST

इफ्फी व मनोरंजन संस्थेचा गोमंतकीयाना किती लाभ झाला हे स्पष्ट होण्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली.

पणजी - पणजीतील मल्टिप्लेक्स पाडून नवीन बांधण्यास काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत म्हणतात की, 'गोव्यातील भाजपा सरकारने स्थानिक सिने निर्मात्यांना कसलेही सहकार्य न देता पद्धतशीरपणे संपविले व आता केवळ आपल्या स्वार्थासाठी सन २००४ साली बांधलेले फोर स्क्रीन मल्टिप्लेक्स पाडून तेथे नवीन उभारण्याचा प्रस्ताव गोवा मनोरंजन संस्थेने पुढे आणला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी त्वरित हस्तक्षेप करुन सदर निर्णय मागे घ्यावा.'

इफ्फी व मनोरंजन संस्थेचा गोमंतकीयाना किती लाभ झाला हे स्पष्ट होण्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली. कन्वेंशन सेंटर उभारण्याची घोषणा करुन कित्येक वर्षे उलटली तरी त्याची पायाभरणीसुद्धा सरकारला शक्य झालेली नाही. आणि अवघ्या १५ वर्षांपूर्वी बांधलेला मल्टिप्लेक्स प्रकल्प जमिनदोस्त करण्याचा निर्णय सरकार घेते हे धक्कादायक असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, नवीन प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावामध्ये नक्कीच काळेबेरे असून, केवळ स्वार्थासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडे दैनंदिन खर्चासाठी निधी नाही व कर्ज काढत आहे आणि दुसऱ्या बाजुने असा अनाठायी खर्च करीत सुटले आहे. 

सन २०१२ पासून इफ्फीचे 'इंटरनेशनल फ्रॉड फेस्टिव्हल ॲाफ इंडिया'त परिवर्तन झाले आहे. आयोजन खर्च, सांस्कृतिक कार्यक्रम, सजावटच्या कंत्राटात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. सत्तेत असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा या घोटाळ्यांत प्रत्यक्ष हात आहे. मिलींद नाईक यानी सदर घोटाळ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन मला विधानसभेत दिले होते, सदर चौकशी अहवाल सरकारने ताबडतोब जाहीर करावा, असे कामत म्हणतात. काँग्रेस सरकारने सुरू केलेली चित्रपट अनुदान योजना सरकारने २०१२ नंतर तीन वर्षे बंद ठेवली. सन २०११ मध्ये निर्मिती केलेल्या स्थानिक चित्रपटांना अजूनही सरकारी अनुदान देण्यात आलेले नाही हे दुर्दैवी आहे. 

गोवन स्टोरीज विभाग सोडून, इफ्फि -२०१९ मध्ये दाखविण्यात आलेल्या इतर  गोमंतकीय चित्रपटांना कसलाच लाभ मिळणार नसल्याचे विधानसभेतील उत्तरातून स्पष्ट झाले असून मनोरंजन संस्थेने स्थानिक निर्मात्यांची थट्टाच चालवल्याचा आरोप कामत यांनी केला आहे. नवीन मल्टिप्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव रद्द करावा, अन्यथा सरकारला प्रखर विरोधाला सामोरे जावे लागेल हे सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा कामत यांनी दिला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवा