शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गोव्यात अमली पदार्थांची सर्रास विक्री : काँग्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 15:28 IST

भाजपा सरकारवर काँग्रेसचे गंभीर आरोप

म्हापसा : गोव्यात खास करुन किनारी भागात अमली पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक किनारे अमली पदार्थांच्या विक्रीचे केंद्र बनले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. सरकार आणि पोलिसांच्या आशिर्वादाने बिनबोभाटपणे हा व्यवसाय सुरु असून बेकारी वाढल्याने तरुणसुद्धा या व्यवसायाकडे आकर्षित होऊ लागल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या अनेकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असून फक्त अमली पदार्थ, कॅसिनो, जुगार तसेच इतर गैरप्रकारांकडे आकर्षित होणारे पर्यटकच गोव्यात येवू लागले असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. गोव्यात खास करुन उत्तर गोव्यातील किनारी भागात अमली पदार्थाच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचा आरोप आलेक्स रेजिनाल्ड यांनी केला. रात्री उशीरापर्यंत होणाऱ्या पार्ट्यातून तसेच किनाऱ्यावरील शॅकातून खुलेआम पद्धतीने अमली पदार्थाची विक्री किनारी भागात केली जाते, असंही त्यांनी म्हटलं. कळंगुटचे आमदार आणि उपसभापती मायकल लोबो यांनी पणजी तसेच वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेला पोलिसांची नावे जाहीर करण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी त्यांची नावे जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. मागील काही महिन्यांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा, चरस पकडला आहे. मात्र हा साठा हलक्या प्रतीचा होता. त्यामुळे उच्च प्रतीचे ड्रग्स पोलिसांकडून पकडले जात नसून हे ड्रग्स थेट विक्रीसाठी पुरवले जाते, असा आरोपही रेजिनाल्ड यांनी यावेळी केले. हल्लीच्या काळात पोलिसांनी कारवाई करुन टाकलेल्या छाप्यात किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई करुन मोठ्या ड्रग्स माफीयांवर दुर्लक्ष करुन त्यांना सोडून दिले जाते. यातून पोलीस तसेच ड्रग्स माफियांमध्ये असलेले हितसंबंध स्पष्ट दिसून येत असल्याचे ते म्हणाले. लहान विक्रेत्यांवर कारवाई करुन भाजपा लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत  असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.  

टॅग्स :goaगोवाDrugsअमली पदार्थ