शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रपतींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:46 IST

ग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्यातील समस्यांवर गंभीर चर्चा केली.

पणजी: मागील १०० दिवसांपासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्याने घटनात्मक पेच निर्माण झाल्याचा दावा करून काँग्रेस विधीमंडळ मंडळाने राष्ट्रपतीला साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच काँग्रेस आमदारांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी म्हटले आहे. कवळेकर यांनी आपल्या विधानसभेतील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्यातील समस्यांवर गंभीर चर्चा केली.  तसेच या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपाय योजनेचेही प्रस्ताव तयार ठेवले आहेत. पहिली समस्या म्हणजे गोव्याला मुख्यमंत्री नसणे आणि ती सोडविण्यासाठी काँग्रेसचे आमदार राष्ट्रपतीना भेटणार आहेत. अद्याप तारीख ठरली नसली तरी लवकरच भेटणार आहेत असे त्यांनी सांगितले. खाण बंदीमुळे लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. राज्यात आणि केंद्रातही भाजप सरकार असून सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नाही. या सरकारने खाण प्रकरणात तोडगा काढल्यास सरकारचा काँग्रेसचा पाठिंबा  राहील. परंतु सरकार काही करतच नाही हे खरे दु:ख आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फेच काही तरी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी कायदे तज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू असून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही घेतला आहे अशी माहिती कवळेकर यांनी दिली. यावर विचार विनिमय करण्यासाठी प्रतापसिंग राणे यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती काढण्यात आली आली असून बुधवारी त्यांची बैठक होणार आहे. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले ४ हजार रुपये बेकारी भत्ता देण्याचे आश्वासनाची पूर्ती करण्याची ही वेळ असल्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. ही योजन त्वरीत लागू करण्याची मागणी त्यांनी केली. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला आमदार सुभाष शिरोडकर यांच्यासह बहुतेक सर्व आमदार उपस्थित होते. आमदार इजिदोर फर्नांडीस हे आजारी असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवा