शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

प्रदेशाध्यक्षांचा इशाऱ्यानंतर काँग्रेस नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 13:34 IST

प्रदेशाध्यक्ष चोडणकर तसेच अन्य काँग्रेसी नेत्यांनी नोटीस मिळाल्यानंतर सरकारच्या हुकूमशाही

पणजी : म्हादईच्या प्रश्नावर काँग्रेसकडूनइफ्फीत निदर्शने, आंदोलनं होण्याची शक्यता गृहीत धरून आगशी पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह पक्षाच्या काही युवा नेत्यांना नोटिसा बजावून शांतता भंग न करण्याचा इशारा दिला आहे. आगशी पोलीस निरीक्षकांनी बजावलेल्या नोटिशीत इफ्फी काळात कोणताही कायदा-सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये, शांतता राखावी, निदर्शने आंदोलने करू नयेत, असे काँग्रेसी नेत्यांना बजावले आहे. गोव्यात आज 50 व्या ईफ्फी सोहळ्याचे उद्घाटन होत आहे. पुढील दहा दिवस हा सोहळा चालणार आहे. प्रदेशाध्यक्ष चोडणकर तसेच अन्य काँग्रेसी नेत्यांनी नोटीस मिळाल्यानंतर सरकारच्या हुकूमशाही भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार जनतेला आहे असे चोडणकर यांनी म्हटले आहे. कळसा-भंडुरा प्रकल्पाला ईसीच्याबाबतीत मुभा देणारे पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला दिल्यानंतर गोव्यात गेले काही दिवस खळबळ उडाली आहे. या प्रश्नावर जनमानसात तीव्र संताप आहे. विरोधी काँग्रेस पक्षाने या प्रश्नावर सरकारला लक्ष्य केले असून केंद्रात पर्यावरण मंत्री असलेले प्रकाश जावडेकर माहिती प्रसारण खात्याचेही मंत्री आहेत. इफ्फीच्या उद्घाटनासाठी मंगळवारी रात्री उशीरा ते गोव्यात दाखल झाले. 

जावडेकर यांचा निषेध करण्यासाठी इफ्फीच्या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलनाची शक्यता आहे. तसा इशारा चोडणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला होता. कर्नाटकला मुभा देणारे पत्र मागे घेणारे पत्र घेऊनच जावडेकर यांनी गोव्यात यावे, अन्यथा येऊ नये. तसेच मुख्यमंत्री किंवा सरकारी यंत्रणेनेही जावडेकर यांचे स्वागत करू नये, अशी मागणी केली होती. कर्नाटकने पाणी वळविल्यास गोव्याच्या जनजीवनावर परिणाम होईल. कृषी क्षेत्रासाठी, औद्योगिक वापरासाठी पाणी मिळणार नाही. जनतेचे पाण्याविना हाल होतील, अशी भावना आहे. 

काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. जोपर्यंत कर्नाटकला याबाबत मुभा देणारे पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालय मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन शांत होणार नाही, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही बजावले आहे. म्हादई प्रश्नावर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी समिती स्थापन केली असली तरी आंदोलकांनी ही समिती स्वीकारलेली नाही. कर्नाटकला दिलेले पत्र आधी मागे घ्या, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फीcongressकाँग्रेस