शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

प्रशासनातील खर्चावर नियंत्रणासाठी मंत्रीमंडळाची संख्या कमी करा; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 14:05 IST

मंत्री व आमदारांना देण्यात येणारा पगार विविध सुविधात भत्त्यात ५० टक्के कपात करण्याची मागणी उत्तर गोवा काँग्रेसने केली आहे.

म्हापसा : कोवीड-१९ च्या काळात राज्याला महसूलाची प्राप्ती होत नसल्याने सरकारने प्रशासनातील व राज्यातील खर्च कमी करण्यासाठी मंत्रीमंडळाची संख्या ५ करावी. तसेच मंत्री व आमदारांना देण्यात येणारा पगार विविध सुविधात भत्त्यात ५० टक्के कपात करण्याची मागणी उत्तर गोवाकाँग्रेसने केली आहे.

लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद पडल्याने सरकारी तिजोरीत येणारा महसूल ठप्प झाला आहे. आरोग्य खाते वगळता बहुतेक खात्यांची कामे बंद पडली आहेत. पर्यटन खाते व इतर काही खात्यांची गरज नसल्याने हा मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून  टाकावे. सध्या असलेली मंत्रीमंडळाची संख्या १२ वरून ५ वर करावी अशी मागणी उत्तर गोवाकाँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. सध्याच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर टप्याटप्यात त्यांचा पुन्हा समावेश करावा असेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत अ‍ॅड. शंकर फडते, भोला घाडी हे नेते उपस्थित होते.

विद्यमान स्थितीत बऱ्याच लोकांची मिळकत बंद झाली आहे. पुढील काही दिवसात अनेकांना वाईट परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. अनेक लोकांचे व्यवसाय एकतर बंद आहेत किंवा ठप्प झालेले आहेत. काहींना नोकऱ्या गमावण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. आणिबाणीच्या अशा परिस्थितीत लोकांना कराचे भर टाकून तिजोरी भरण्यावर लक्ष देण्यापेक्षा कर न लादता कशा प्रकारे महसूलाची प्राप्तीसाठी इतर पर्यांयावर विचार करणे गरजेचे असल्याचे भिके म्हणाले. सध्या महसूल प्राप्तीसाठी सरकारकडून पोलिसांमार्फत लोकांची सतावणूक सुरू केली आहे. ही सतावणूक बंद करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी बोलताना केली.

लोकांना सध्याच्या स्थितीत आर्थिक सहकार्य लाभावे यासाठी त्यांना विशेष पॅकेज देण्यात यावी. लोकांवर लागू असलेल्या विविध करात किमान ५० टक्के सवलत देण्याची मागणी भिके यांनी केली. यात घरपट्टी, वीज पाणी तसेच इतर बिलात विद्यमान आर्थिक वर्षात सवलत देण्यात यावी अशीही मागणी केली. त्याची अमंलबजावणी तातडीने करण्यात यावी असे भिके म्हणाले.

विद्यमान सरकार लोकांच्या हितासाठीच्या अनेक गोष्टी बोलतात पण प्रत्यक्षात त्या अंमलात आणण्यात मात्र अपयशी ठरले आहे. जे बिगर गोमंतकीय कामगार गोव्यात वास्तव्य करून होते त्यांचे हित जपून ठेवण्यात त्यांना गरजेच्या वस्तू पुरवण्यात अपयश आल्याने माघारी गेल्याचा आरोपही त्यांनी केला. अशावेळी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राजपालांच्या दरबारी जाणे भाग पडत असल्याचे सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाcongressकाँग्रेस