शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काँग्रेसला अपक्षांचे ‘बळ’

By admin | Updated: March 30, 2015 01:27 IST

पणजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर धारेवर धरण्यासाठी अपक्ष आमदारांनी विरोधी काँग्रेसबरोबर केलेला समन्वय

पणजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर धारेवर धरण्यासाठी अपक्ष आमदारांनी विरोधी काँग्रेसबरोबर केलेला समन्वय पुढील काळातही सत्ताधाऱ्यांना गारद करण्यास पुरेसा ठरणार आहे. सरकारने अल्पकालीन अधिवेशन घेतल्याने महत्त्वाचे विषय मांडण्याचे राहून गेले, अशी तक्रार आता विरोधकांकडून येऊ लागली आहे. कमीत कमी दहा दिवसांचे अधिवेशन असावे, अशा मागणीचे पत्र लवकरच विरोधी पक्षनेत्यांकडून सभापतींना जाणार आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे म्हणाले की, अधिवेशन कमीत कमी दहा दिवसांचे तरी असायला हवे. पक्षाच्या सर्व आमदारांचे तसे म्हणणे आहे आणि विरोधी पक्षनेते तशी मागणी सभापतींकडे करणार आहेत. कमी वेळ मिळाल्याने अनेक विषय मांडता आले नाहीत. सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. वीज बिलांचा घोळ होता, आता पाणी बिलेही भरमसाट येऊ लागली आहेत. पेट्रोलवरील व्हॅट १0 टक्क्यांनी वाढवला. बेकायदा भूखंड करून विकण्याचे स्वैर प्रकार घडताहेत. आरोग्य क्षेत्रात तर बजबजपुरी माजलेली आहे. या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा आवश्यक होती. जनतेचे मुद्दे मांडण्याचे काम विरोधी काँग्रेसी आमदारांबरोबर अपक्षांनीही या वेळी प्रभावीपणे केले. विरोधक असेच एकत्र राहिल्यास सरकारच्या त्रुटी दाखवून देता येतील. अपक्ष आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, या अधिवेशनात कमी वेळ मिळाला ही गोष्ट खरीच. गोमंतकीयांना नोकऱ्यांमध्ये ८0 टक्के राखीवता मिळावी म्हणून खासगी ठराव दाखल केला होता तो आलाच नाही, तसेच कृषी जमीन परप्रांतीयांना विकण्यास मनाई करण्याची तरतूद असलेले खासगी विधेयक दिले होते तेही कामकाजात घेतले नाही.(पान २ वर)