शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

काँग्रेसला अपक्षांचे ‘बळ’

By admin | Updated: March 30, 2015 01:27 IST

पणजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर धारेवर धरण्यासाठी अपक्ष आमदारांनी विरोधी काँग्रेसबरोबर केलेला समन्वय

पणजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर धारेवर धरण्यासाठी अपक्ष आमदारांनी विरोधी काँग्रेसबरोबर केलेला समन्वय पुढील काळातही सत्ताधाऱ्यांना गारद करण्यास पुरेसा ठरणार आहे. सरकारने अल्पकालीन अधिवेशन घेतल्याने महत्त्वाचे विषय मांडण्याचे राहून गेले, अशी तक्रार आता विरोधकांकडून येऊ लागली आहे. कमीत कमी दहा दिवसांचे अधिवेशन असावे, अशा मागणीचे पत्र लवकरच विरोधी पक्षनेत्यांकडून सभापतींना जाणार आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे म्हणाले की, अधिवेशन कमीत कमी दहा दिवसांचे तरी असायला हवे. पक्षाच्या सर्व आमदारांचे तसे म्हणणे आहे आणि विरोधी पक्षनेते तशी मागणी सभापतींकडे करणार आहेत. कमी वेळ मिळाल्याने अनेक विषय मांडता आले नाहीत. सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. वीज बिलांचा घोळ होता, आता पाणी बिलेही भरमसाट येऊ लागली आहेत. पेट्रोलवरील व्हॅट १0 टक्क्यांनी वाढवला. बेकायदा भूखंड करून विकण्याचे स्वैर प्रकार घडताहेत. आरोग्य क्षेत्रात तर बजबजपुरी माजलेली आहे. या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा आवश्यक होती. जनतेचे मुद्दे मांडण्याचे काम विरोधी काँग्रेसी आमदारांबरोबर अपक्षांनीही या वेळी प्रभावीपणे केले. विरोधक असेच एकत्र राहिल्यास सरकारच्या त्रुटी दाखवून देता येतील. अपक्ष आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, या अधिवेशनात कमी वेळ मिळाला ही गोष्ट खरीच. गोमंतकीयांना नोकऱ्यांमध्ये ८0 टक्के राखीवता मिळावी म्हणून खासगी ठराव दाखल केला होता तो आलाच नाही, तसेच कृषी जमीन परप्रांतीयांना विकण्यास मनाई करण्याची तरतूद असलेले खासगी विधेयक दिले होते तेही कामकाजात घेतले नाही.(पान २ वर)