शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने रचले कुभांड; मंत्री माविन गुदिन्हो यांचा 'त्या' नेत्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 08:16 IST

न्यायालयाच्या निकालानंतर दाबोळी मतदारसंघातील गुदिन्हो समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : काँग्रेस पक्षात असताना मी मुख्यमंत्री होऊ शकतो, असे लक्षात आल्याने काही नेत्यांनी मला अडकवण्यासाठी स्व. मनोहर पर्रीकर यांना वीज अनुदान घोटाळा झाल्याचे सांगत खोटी कागदपत्रे दिली. पर्रीकर यांनी माझा काहीच दोष नसल्याचे तेव्हा सांगून काही कांग्रेस नेत्यांनीच तुझ्याविरोधात मला कागदपत्रे पुरवली, असे सांगितल्याची माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

काहीच दोष नसताना माझ्यावर विनाकारण २७ वर्षे वीज अनुदानात घोटाळा केल्याचा खोटा खटला चालला. याचा त्रास सोसावा लागला. कार्यकर्ते माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिल्याने आणि देवाच्या कृपेनेच मला इतक्या वर्षांनंतर न्यायालयाने निर्दोष जाहीर केले. याचा मला मोठा आनंद झाला असे ते म्हणाले. सोमवारी (दि. २५) विशेष न्यायालयाने १९९८च्या कथित वीज अनुदान घोटाळ्यातून तत्कालीन वीजमंत्री आणि विद्यमान पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांना निर्दोष मुक्तता दिली. 

न्यायालयाच्या निकालानंतर संध्याकाळी दाबोळी मतदारसंघातील गुदिन्हो समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नवेवाडे येथील गुदिन्हो यांच्या कार्यालयात त्यांचे पुष्पहार घालून आणि फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

पत्रकारांशी बोलताना गुदिन्हो म्हणाले की, '२७ वर्षांनंतर मला न्याय मिळाला. कोणत्याच प्रकारचा घोटाळा झाला नसतानाच माझ्याविरोधात वीज अनुदानात घोटाळा झाल्याचा खोटा खटला घालण्यात आला होता. त्यावेळी पर्रीकर यांना मी काहीच केले नसताना माझ्याविरोधात हे प्रकरण का नोंद केले? असे विचारले. तेव्हा पर्रीकर यांनी, तू काहीच केले नसल्याचे मान्य करत तुझ्याच काही काँग्रेस नेत्यांनी तू मुख्यमंत्री होशील अशा भीतीतून कागदपत्रे आणून दिल्याची माहिती दिली होती.

माझ्याविरोधात काही काँग्रेस नेत्यांनी षडयंत्र रचले. मला विनाकारण संकटात टाकले. पण, कार्यकर्ते सतत माझ्याबरोबर ठामपणे राहिले. त्यामुळे मी आणखी शक्तिशाली झालो. विरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केलेल्या नेत्यांचा मी आभारी आहे.

गुदिन्हो म्हणाले की, 'मी काहीच चुकीचे केलेले नाही. देवाने माझ्यावर कृपा करून यातून निर्दोष सोडवले. मी गेली ४० वर्षे जनतेची सेवा करत आहे. समर्थक, कार्यकर्ते आणि मतदार माझ्याबरोबर आहेत. जे लोक सोबत राहिले त्यांचे आभार. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण