शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

गोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 11:34 IST

भाजपच्या आमदारांमध्येच धुसफूस असल्याचा काँग्रेसचा दावा

पणजी : राज्य सरकार अस्थिर केलं जात असल्याचा सत्ताधारी भाजपचा आरोप काँग्रेस पक्षानं फेटाळून लावला आहे. सत्ताधारी भाजपमध्येच धुसफूस असल्यानं त्यांना सरकार अस्थिर झाल्यासारखं वाटतं, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.काँग्रेसच्या आमदारांनी नुकतीच राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केलं होतं. सरकार चालत नसल्यानं गोव्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांनी या विषयात हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली होती. त्यावर भाजपने टीका केली. राज्यात पीडीएविरोधी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्ष चिथावणी देत आहे, अशीही टीका भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे आणि इतरांनी केली होती. गोव्यातील भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील एक मंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी तर पीडीएविरोधी आंदोलनातून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा करून यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. विरोधी पक्षच पीडीएविरोधी आंदोलनाच्या मागे आहे, असे सरदेसाई म्हणाले होते. भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक गुरुवारी पणजीत पार पडली. त्या बैठकीत एक राजकीय ठराव मांडून संमत केला गेला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारांसाठी अमेरिकेत आहेत. अशावेळी गोव्यात विरोधक सरकार अस्थिर करू पाहत आहेत आणि त्यांचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दांत भाजपने काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. काँग्रेसनं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसल्याचं विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी 'लोकमत'शी सांगताना म्हटलं. 'पर्रीकर यांच्या आजारपणामुळे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी जेव्हा कमी करून तीन दिवसांवर आणला गेला, तेव्हाही काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना सहकार्य केलं. भाजपच्या आमदारांमध्येच धुसफूस आहे आणि त्यामुळे त्यांना सरकार अस्थिर झाल्यासारखं वाटतं असावं,' असं कवळेकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा