शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 11:34 IST

भाजपच्या आमदारांमध्येच धुसफूस असल्याचा काँग्रेसचा दावा

पणजी : राज्य सरकार अस्थिर केलं जात असल्याचा सत्ताधारी भाजपचा आरोप काँग्रेस पक्षानं फेटाळून लावला आहे. सत्ताधारी भाजपमध्येच धुसफूस असल्यानं त्यांना सरकार अस्थिर झाल्यासारखं वाटतं, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.काँग्रेसच्या आमदारांनी नुकतीच राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केलं होतं. सरकार चालत नसल्यानं गोव्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांनी या विषयात हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली होती. त्यावर भाजपने टीका केली. राज्यात पीडीएविरोधी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्ष चिथावणी देत आहे, अशीही टीका भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे आणि इतरांनी केली होती. गोव्यातील भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील एक मंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी तर पीडीएविरोधी आंदोलनातून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा करून यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. विरोधी पक्षच पीडीएविरोधी आंदोलनाच्या मागे आहे, असे सरदेसाई म्हणाले होते. भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक गुरुवारी पणजीत पार पडली. त्या बैठकीत एक राजकीय ठराव मांडून संमत केला गेला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारांसाठी अमेरिकेत आहेत. अशावेळी गोव्यात विरोधक सरकार अस्थिर करू पाहत आहेत आणि त्यांचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दांत भाजपने काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. काँग्रेसनं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसल्याचं विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी 'लोकमत'शी सांगताना म्हटलं. 'पर्रीकर यांच्या आजारपणामुळे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी जेव्हा कमी करून तीन दिवसांवर आणला गेला, तेव्हाही काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना सहकार्य केलं. भाजपच्या आमदारांमध्येच धुसफूस आहे आणि त्यामुळे त्यांना सरकार अस्थिर झाल्यासारखं वाटतं असावं,' असं कवळेकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा