शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सरकारच्या आर्थिक धोरणांवर काँग्रेसचा  हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 13:18 IST

रस्ता करात ३ महिन्यांसाठी ५० टक्क्यांच्या कपातीच्या घोषणेला आक्षेप 

पणजी :  रस्ता करात ५० टक्के कपात केल्याने त्याचा लोकांना फायदा होईल असे भासवण्याचा प्रयत्न करुन सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज जनतेकडे नवीन वाहन विकत घेण्यासाठी आर्थिक शक्तिच राहिली नसल्याचे सांगून, कर कपातीची घोषणा ही निव्वळ धूळफेक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  गिरीश  चोडणकर यानी म्हटले आहे.अर्थ खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या आर्थिक निर्णयाची घोषणा वाहतूकमंत्री कशी काय करु शकतात, असा सवाल करत त्यांनी माविन गुदिन्हो हे भरकटलेल्या भाजप सरकारचे नवे अर्थमंत्री आहेत का असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारला आहे. चुकीची धोरणे व बडेजाव यामुळे डबघाईस आलेली देश व राज्याची अर्थव्यवस्था सांभाळण्याची कसरत करत असताना आता प्रत्येक दिवशी नवीन अर्थसंकल्प सादर होणार का, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी चोडणकर यानी केली आहे.  भाजप केडरमध्ये आरएसएसची ध्येय धोरणे व तत्वप्रणाली असते असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यानी मडगावात केले होते. त्याचा समाचार घेताना  चोडणकर यांनी गोवा विधानसभेत संमत झालेल्या अर्थसंकल्पाला फाटा देऊन केलेल्या आर्थिक घोषणा या संघाच्या 'अर्थशास्त्रा' प्रमाणे आहेत का, असा प्रश्न विचारला. केंद्र व राज्य सरकारच्या भरकटलेल्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून, जनतेला आज दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तात्पुरत्या घोषणा करण्यापेक्षा सरकारने दूरगामी विचार करुन अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करावेत, नपेक्षा खुर्ची सोडावी, अशी मागणी चोडणकर यानी केली आहे. भारतीय रिजर्व बॅंकेचे १.७४ लाख कोटी रुपये मोदी सरकारने घेतल्याचा परिणाम म्हणूनच आज देशातल्या बँका एका मागोमाग एक दिवाळखोरी जाहीर करत असल्याचे चोडणकर यांनी म्हटले. लोकांना आज बँकेत पैसे ठेवणे असुरक्षित वाटत असून, घरात पैसे ठेवायचा विचार केल्यास नोटाबंदीचे भूत समोर दिसते. भाजप सरकारने जनतेचा मानसिक छळ चालवला असून लोकांचे शाप भाजपाला लागणार आहेत, असे चोडणकर म्हणाले. केवळ पंतप्रधान मोदींचा व्यक्तिगत सोस पुरविण्यासाठी लाखो कोटी खर्च करून देश परदेशात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, टेलिप्राऊंटरवरची भाषणे वाचण्याचे व फोटो काढून घेण्याचे व्यसन मोदींना लागले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीचे नाव घेऊन लोकांना तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा त्यांचा मोहनलाल असा उल्लेख करुन अपमान केला  आहे, असे चोडणकर पुढे म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा