शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

तिंरगा फडकविण्यासाठी काँग्रेसचे राज्यपालांना साकडे, सभापतींना आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:26 PM

भारतीय स्वातंत्र्यदिनी येत्या 15 रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणा-या सोहळ्य़ावेळी राज्यपालांनी स्वत: तिरंगा ध्वज फडकवावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

पणजी : भारतीय स्वातंत्र्यदिनी येत्या 15 रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणा-या सोहळ्य़ावेळी राज्यपालांनी स्वत: तिरंगा ध्वज फडकवावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्य़ाला अनुपस्थित राहिले तरी, त्यांच्या अनुपस्थितीत सभापतींकडे तिरंगा फडकविण्याची जबाबदारी सोपवून पर्रीकर यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर हे आजारी असल्याने उपचारांसाठी अमेरिकेला गेले आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिन हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे, त्या दिवशी होणा-या राष्ट्रीय सोहळ्य़ावेळी मुख्यमंत्र्यांनी गोव्यात उपस्थित असू नये ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.  भारतीय स्वातंत्र्यदिन नजरेसमोर ठेवून पर्रीकर यांना त्यांच्या अमेरिका भेटीविषयी योग्य पद्धतीने नियोजन करता आले असते. तथापि, ते गोव्याबाहेर गेलेले असले तरी, त्यांनी सभापतींकडे तिरंगा फडकविण्याचे काम सोपवून चुकीची कृती केली आहे, सरकारचा पक्षपातीपणा यावरून दिसून येतो, असे चोडणकर यांचे म्हणणे आहे.

सभापती हे निपक्षपाती असतात. सभापती ही एक स्वतंत्र संस्था असते व त्यांना सरकारच्या कामकाजाशी काही देणोघेणो नसते. सरकारमधील एखादा ज्येष्ठ मंत्री किंवा अन्य कोणत्याही मंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकविण्याची जबाबदारी द्यायला हवी होती. र्पीकर यांनी तसे केले नाही याची दखल राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी घ्यावी व राज्यपालांनी स्वत: तिरंगा फडवून शान राखावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.

देशात कुठेच कधी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत भारतीय स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय सोहळ्य़ावेळी सभापतींनी तिरंगा फडकविल्याचे उदाहरण नाही असे चोडणकर यांचे म्हणणे आहे. विद्यमान सरकारमध्ये काही ज्येष्ठ मंत्री आहेत, तरी देखील मंत्र्यांकडे तिरंगा फडकविण्याचा मान न सोपविता पर्रीकर यांनी सभापतींकडे तो सोपवला असे चोडणकर यांनी राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनातही नमूद केले आहे.

मंत्र्यांमध्येही चर्चा 

दरम्यान, विरोधी काँग्रेसने हा विषय लावून धरल्यानंतर त्यावरून मंत्र्यांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या दिनी पणजीतील मुख्य सोहळ्य़ावेळी आमच्याकडे मुख्यमंत्र्यांनी तिरंगा फडकविण्याचे काम का सोपविले नाही असा प्रश्न काही मंत्र्यांनाही पडला आहे. काही मंत्री तालुकास्तरावर होणा-या कार्यक्रमावेळी ङोंडा फडकवतील. मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे यावेळी म्हापशात तिरंगा फडकवणार नाहीत, कारण ते आजारी आहेत. तिथे महसुल मंत्री रोहन खंवटे हे ध्वज फडकावतील. आरोग्य मंत्री विश्वजित राणो हे वाळपईत तिरंगा फडकविणार नाहीत. त्यामागिल नेमके कारण कळाले नाही. वाळपईच्या मामलेदारांच्या हस्ते तिरंगा फडकविला जाईल. 

टॅग्स :goaगोवा