शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुख्यमंत्र्यांविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार; खाण कंपन्यांना चपराक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 17:57 IST

धक्कादायक बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे निमित्त करून खाणपट्ट्यात जेव्हा ही अंदाधुंदी चालली होती, तेव्हा सरकार अक्षरश: अस्तित्वात नव्हते.

-  राजू नायकखाणी सुरू करण्याची प्रमोद सावंत सरकारला अशिष्ट घाई झाली आहे. परंतु ते सरकार सर्वोच्च न्यायालयात निकाल आपल्या बाजूने लागेल या आशेवर कुठे थांबलेय ?गेले काही महिने गोव्यात खाणपट्ट्यात बेसुमार खाणकाम वाहतूक चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने, काढून ठेवलेला माल उचलण्यास खाण कंपन्यांना मान्यता दिली होती. रॉयल्टीही भरलेला माल तुम्ही उचलू शकता, असे न्यायालयाचे निर्देश होते. परंतु जेव्हा राज्य सरकारची खाण कंपन्यांशी मिलीभगत असते, तेव्हा ड्युटी भरलेला व नव्याने काढलेला माल यातील फरक कोण तपासणार? न्या. एम. बी. शहा यांनी असे अनेक गैरव्यवहार आपल्या अहवालातून चव्हाट्यावर आणले आहेत, ज्यात बहुतांश खाण कंपन्या गुंतल्या आहेत; ज्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यास सरकारला दारुण अपयश आले आहे.लक्षात घेतले पाहिजे की सर्वोच्च न्यायालयानेच यापूर्वी खाणी व खनिजाची वाहतूक करण्यास बंदी लादली होती. परंतु न्या. एस. ए. बोबडे यांनी सहा महिन्यांत ड्युटी भरलेले खनिज उचलण्यास खाण कंपन्यांना सांगितले होते. या सहा महिन्यांचा कालावधी गेल्या बुधवारी संपण्यापूर्वी खाणींवर एकच घाई चालली असल्याचे दृश्य लोकांना दिसले.धक्कादायक बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे निमित्त करून खाणपट्ट्यात जेव्हा ही अंदाधुंदी चालली होती, तेव्हा सरकार अक्षरश: अस्तित्वात नव्हते. म्हणजे, खाण खात्यात कर्मचारी आहेत की नाहीत, खाणींवर कोण देखरेख ठेवतोय, संचालकांनी खाणींना किती वेळा भेट दिलीय व ट्रकांची वाहतूक व प्रत्यक्ष नव्याने उत्खनन चालले असल्यास त्याच्यावर नजर ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात आहे का, कोणाला काहीच माहीत नाही. त्याचाच लाभ खाण कंपन्यांनी घेतला असण्याची शक्यता आहे. आता गोवा फाऊंडेशनचे पर्यावरणवादी प्रमुख क्लॉड आल्वारीस म्हणताहेत की त्यांनी आरटीआयद्वारे सरकारकडे तपशिलाची मागणी केली आहे. ते असेही म्हणाले, ‘‘खाण कंपन्यांनी चोरले व राज्य सरकारचे प्रतिनिधी त्यात खुलेआम सामील होते!’’कोविड काळात प्रमोद सावंत सरकारने खाण कंपन्यांना उघडपणे पाठिंबा व अभय दिल्याचा आरोप गोव्यात होत असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.त्यात भर म्हणून आता प्रमोद सावंत गोव्यात पूर्ववत खाणी सुरू करण्याच्या प्रयत्नात असून तसे निवेदन त्यांनी जाहीरपणे दिले आहे. सर्वोच्च न्यायालय खाणी सुरू करण्यास मान्यता देईल अशी मला आशा वाटते, असे ते म्हणाले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या खाण कंपन्यांना खुलेपणाने पाठिंबा देण्याच्या प्रवृत्तीविरोधात क्लॉड आल्वारीस यांनी नुकतीच पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे. त्या पत्रात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने खाणींच्या लिजेस कालबाह्य असल्याच्या कारणास्तव त्या सर्व बंद केल्या व काढून ठेवलेला मालही नेण्यास बंदी लागू केली होती. त्यानंतर मोदी सरकारने लिलावाशिवाय नव्याने लिजेस दिल्या जाऊ नयेत, असा कायदा केला आहे व भाजपाचे निवडणूक जाहीरनाम्यातील वचन आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वत:च्या स्वार्थासाठी या तत्त्वांना व कायद्याला हरताळ फासत असून ते खाण कंपन्यांना फुकटात लिजेस देण्याची तरफदारी करतात.खाण कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या रिव्ह्यू पिटिशनलाही सरकारचा उघड पाठिंबा असून खाण कंपन्यांनी अद्याप त्याची प्रतही गोवा फाऊंडेशनला दिलेली नाही. क्लॉड यांच्या मते, आता हा अर्ज सर्वोच्च न्यायालयात वेगळ्या खंडपीठाकडे पाठविल्यामुळे त्यावर लवकर सुनावणी अपेक्षित नाही. गोवा फाऊंडेशनने या प्रकरणाचा निर्णय एकतर्फी लागू नये म्हणून त्याला १४० जणांचे आपले प्रतिज्ञापत्र जोडून लिजेस लिलावाद्वारेच दिल्या जाऊ शकतात, असा दावा केला आहे. गोव्याला महसूल न देता या व्यवसायातून हजारो कोटी मिळविणाऱ्या खाण कंपन्यांच्या उत्साहावर गोवा फाऊंडेशनच्या प्रतिज्ञापत्रामुळे विरजण पडले असून खाण कंपन्यांच्या ओंजळीने पाणी पिणाºया नेत्यांनाही हात चोळीत बसावे लागले आहे. गोव्यातील अनेक राजकारणी प्रत्यक्ष खाण व्यवसायात आहेत!

टॅग्स :goaगोवा