शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

पार्से पेडणे येथे चिरेखाणीत बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना 16 लाखांची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:03 IST

राष्ट्रीय हरित लवाद; पर्यावरण हानीचीही पडताळणी करा

मडगाव: मागच्या वर्षी पार्से पेडणे येथे बेवारस स्थितीत टाकून दिलेल्या चिरेखाणीत बुडून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्लीतील मुख्य पीठाने या घटनेची गंभीर दखल घेताना प्रत्येक मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 16 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश गोवा सरकारला दिला आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली पिठाचे न्या. शिवकुमार सिंग आणि डॉ. सत्यमसिंग गबऱ्याल यांचा पीठाने हा निर्णय दिला असून गोवा सरकारच्या खाण खात्याने ही रक्कम द्यावी आणि नंतर प्रदूषण करणाऱ्या त्या खाणीच्या मालकाकडून ती वसूल करावी असे या आदेशात म्हटले आहे.

मागच्या वर्षी 14 सप्टेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती. पार्से येथे खुल्या अवस्थेत सोडून दिलेल्या खाणीत पेडणे येथील डॉन बॉस्को हायस्कुलच्या विद्यार्थी गृहात राहणारे चार विद्यार्थी पाय घसरून आत पडल्याने त्यांना बुडून मरण आले होते. यानंतर गोवा पर्यावरण संरक्षण या संघटनेने हे प्रकरण हरित लवादाकडे नेताना अशा बेवारस खाणीवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. पेडणे तालुक्यात अशा किमान 25 बेवारस खाणी तशाच सोडून दिल्याचे त्यांनी लवादाच्या लक्षात आणून दिले होते.

राष्ट्रीय लवादाने एकूण सात वेगवेगळ्या प्रकरणाची एकत्रित सुनावणी घेतली. पेडणेच्या त्या खाणीबद्दल निवाडा देताना दोन वर्षांपूर्वी चालू असलेल्या पण आता बंद असलेल्या या खाणीमूळे पर्यावरणीय हानी किती झाली आहे त्याची तपासणी राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी आणि पर्यावरणीय नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करावी असे निर्देश दिले आहेत. सुनावणीच्या दरम्यान राज्य सरकारने अशा बेवारस खुल्या  खाणींना जल संसाधन खात्याकडून कुंपण घालण्यात येणार असून या खाणी बुजवून टाकण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याची हमी लवादाला दिली होती.

दरम्यान कर्नाटकातील रेती उत्खनना संधार्भात लवादाने महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या उत्खननासाठी केवळ दोन जेसीबीचाच उपयोग व्हावा. पूल, जलवाहिनी आणि जलपुरवठा प्रकल्प यापासून 500 मीटर क्षेत्रात रेती काढली जाऊ नये तसेच जमिनीतील पाण्याच्या पातळीच्या खाली हे उत्खनन करता कामा नये असे बजावले आहे. या अटींची पूर्तता होते की याची संबंधीत अधिकाऱ्यांनी महिन्यात एकदा तपासणी करावी आणि पर्यावरणीय परिणामाचा दर वर्षी अभ्यास व्हावा अशा सूचना केल्या आहेत.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत