शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 10:26 IST

घन कचऱ्यावरून आस्थापनांना सुनावले; पिसुर्ले येथे औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, होंडा : 'स्वच्छ गोवा, हरित गोवा' हे स्वप्न साकार करण्यासाठी विविध प्रकारच्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया झाली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. औद्योगिक वसाहतीत निर्माण होणाऱ्या हानिकारक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. यापुढे उघड्यावर धोकादायक कचरा टाकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत गुरुवारी फोंडा एन्व्होकेअर लिमिटेड कंपनीच्या राज्यातील पहिल्या औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष हडकोणकर, कचरा व्यवस्थापन सल्लागार पद्मश्री डॉ. शरद काळे, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव महेश शंभू, संचालक डॉ. स्नेहा गित्ते, किरण चिपकर, कंपनीचे मालक तथा राज्यसभेचे माजी खासदार अजय संचिती, संचालक परम संचिती मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे राज्यातील युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलच. शिवाय सामाजिक विकासाला चालनाही मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारी घेऊन विविध प्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी झटावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान, गोवा कचरा व्यवस्थापन व्यवस्थापकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष हडकोणकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव महेश शंभू यांनी कचरा व्यवस्थापन संबंधी माहिती दिली. कंपनीचे संचालक परम संचेती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी हिने केले तर हसन हुसेन यांनी आभार मानले.

दरम्यान, देशातील ९ राज्यात कंपनीचे कचरा व्यवस्थापन करण्याचे प्रकल्प आहेत, त्यात महाराष्ट्रातील रांजणगाव देशात येथील सर्वात्कृष्ट प्रकल्प ठरला आहे. कंपनीचे सर्व कामकाज शासकीय नियमानुसार चालत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असे माजी खासदार अजय संचेती यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'एसएमएस' या ग्रुपचे अध्यक्ष अजय संचेती यांनी हा प्रकल्प गोव्यात आणला, त्यामुळे गोवा सरकारच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.या प्रकल्पामुळे राज्यातील विविध औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या कंपन्यांतील घातक घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत होणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा कचरा प्रकल्प उभारून या कंपनीने गोव्यात १०० वर्षे कचरा व्यवस्थापन करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सर्व औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या कंपन्यांनी आपला औद्योगिक कचरा या प्रकल्पाला पुरवावा.

कंपनीने पर्यावरणाचा समतोल राखावा : राणे

आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, पर्ये मतदारसंघातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतीत हा प्रकल्प उभारण्यात आल्याने याचा या परिसराला फायदा होणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर कंपनीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, या कार्यक्रमास पिसुर्ले पंचायत मंडळ उपस्थित राहिलेले नाही. लवकरच कंपनी व्यवस्थापन व पंचायत मंडळ यांच्यात समझोता घडवून आणू, असेही दिव्या राणे म्हणाल्या. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत