शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

समुदायाच्या पाठिंब्याने डेंग्यूच्या ९० टक्के तक्रारी होऊ शकतात कमी : डॉ. कल्पना महात्मे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:00 IST

डॉ. महात्मे म्हणाल्या, दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढत्या आलेखामुळे  आम्ही  या वर्षी मान्सून येण्याआधीच डेंग्यूच्या संकटाचा सामना करण्यासाठी काम सुरु केले आहे.

पणजी (नारायण गावस ):डेंग्यूवर नियंत्रण मिळवायचे असेल तर समुदायाचा पाठिंबा गरजेचा आहे. समुदायाचा पाठिंबा  मिळाला  तर ९० टक्के डेंग्यू मलेरियाच्या तक्रारी कमी होऊ शकतात. यंदा डेंग्यू जागृती थीम ही डेंग्यू नियंत्रणासाठी समुदायाला जोडा अशी असल्याने आम्ही विविध धार्मिक संस्थांना जागृतीसाठी आवाहन केले आहे, असे आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले 

डॉ. महात्मे म्हणाल्या, दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढत्या आलेखामुळे  आम्ही  या वर्षी मान्सून येण्याआधीच डेंग्यूच्या संकटाचा सामना करण्यासाठी काम सुरु केले आहे. या लढाईत स्थानिक समुदायाने सहभागी करून घेण्याचाही त्यांनी निर्णय घेतला आहे.  नुकतेच   आम्ही पणजी आणि सांतीनेज येथील रहिवासी धर्मगुरूंशी संपर्क साधला आणि रविवारच्या धार्मिक सेवांदरम्यान डासांची उत्पत्ती तपासण्यासाठी आणि डेंग्यूचा सामना करण्यासाठी काय करावे आणि करू नये याबद्दल घोषणा करण्याची विनंती केली.

डॉ कल्पना महात्मे म्हणाल्या, आम्ही मशिदींमध्ये अशाच घोषणा करण्यासाठी मुस्लिम धार्मिक नेत्यांशी संपर्क साधला आहे. तसेच मंदिर व्यवस्थापनाशीही संपर्क साधण्यात आला आहे, परंतु हिंदू समुदायाऐवजी वैयक्तिकरित्या उपासना करतात त्यामुळे चर्च आणि मशिदींमध्ये जशा घोषणा प्रभावी ठरू शकतात तशा इथे ठरत नाहीत.

डॉ. महात्मे म्हणाल्या, यंदा डेंग्यू नियंत्रणासाठी सरकारी  खात्याच्या विविध नाेडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.  तसेच खात्याने आता कदंब महामंडळ औद्योगिक विकास महामंडळ, कॅप्टन ऑफ पोर्ट, शिक्षण खाते, सोसायटी रजिस्टर यांना आपआपल्या खात्यात डेंग्यू नियंत्रण करण्यासाठी सुचना दिल्या आहेत.

महात्मे म्हणाल्या,गेल्या वर्षी आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून संपूर्ण राज्यात आमची जागरूकता आणि डास उत्पत्ती प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आम्हाला कर्मचारी पुरवण्यासरखी लक्षणीय मदत मिळाली.  जर आपल्याला डेंग्यूला आळा घालायचा असेल आणि अखेरीस त्याला दूर करायचा असेल तर स्थानिक समुदायाने (लोकांनी) आमच्या या प्रयत्नांमध्ये सामील होण्याची गरज आहे. दरम्यान, नागरी आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांच्या प्रभारी डॉक्टरांना डेंग्यू आणि मलेरियाचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. 

अनेक वस्त्यांमध्ये आणि शहरी भागात जेथे निवासी इमारती आणि संकुले विपुल प्रमाणात आहेत तेथे घरांमध्ये साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होते, फुलांच्या कुंड्यांखालील बेसप्लेट आणि काहीवेळा न वापरलेल्या कमोडमध्ये देखील डासांची पैदास होते.त्यामुळेअसे उरलेले पाणी चार आठ दिवसांतून किमान एकदा तरी साफ केले जायला हवे असेही महात्मे म्हणाल्या.

टॅग्स :goaगोवाdengueडेंग्यू