शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

आयोग भरणार ३,४२९ रिक्त पदे; रोजगार क्षेत्रात मोठ्या सुधारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:32 IST

रोजंदारींना हंगामी दर्जानंतर मासिक वेतन २१,८०० ते २६,८०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रोजगार क्षेत्रात मोठ्या सुधारणा घडवून आणताना सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. सात वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या रोजंदारीवरील कामगारांना हंगामी दर्जा देण्याचा निर्णय ऐतिहासिक मानला जात असून याचा सामान्य कामगारांना मोठा फायदा होणार आहे. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी हिताच्या योजनांबरोबरच भरती प्रक्रिया आणि करिअरच्या संधी सुधारण्यासाठी व्यापक सुधारणांची मालिका सुरू केली आहे.

सरकारी खाती, महामंडळे किंवा स्वायत्त संस्थांमधील रोजंदारीवरील कामगारांना महिना २१,८०० ते २६,८०० एवढे निश्चित मासिक वेतन मिळेल. तसेच नैमित्तिक (कॅज्युअल) रजा, आजारी रजा, प्रसूती रजा आणि वेतनात वार्षिक ३ टक्के वाढ मिळेल. त्यांना अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्येही सामावून घेतले जाईल. सुमारे ३,००० कामगारांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. हे कामगार खास करून पालिकांमधील आहेत.

मिशन कर्मयोगी प्रशिक्षण मोहिमेंतर्गत राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'आयगॉट' कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर दरवर्षी किमान तीन अभ्यासक्रम आणि सहा तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. मूल्यांकन अहवालात वार्षिक कामगिरी नोंदवली जाईल. सध्या, ५६,३३५ कर्मचारी नोंदणीकृत आहेत, ज्यांनी ८८,७०९ अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.

१० वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या कंत्राटी कामगारांना नियमित करण्याचे धोरण विचाराधीन आहे. गोवा थेट भरती नियम २०२४ नुसार कंत्राटी कर्मचारी, लेक्चर तत्त्वावर काम करणारे शिक्षक आणि अनुदानित संस्थांमधील नियमित कर्मचाऱ्यांना पाच वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आली आहे.

१९६ गृहरक्षक बनले पोलिस हवालदार

गृहरक्षकांच्या दीर्घसेवेची दखल घेत १९६ जणांना पोलिस हवालदार म्हणून सामावून घेण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास महामंडळाने ३०० ठिकाणी ४,५०० हून अधिक कर्मचारी नियुक्त केले. महामंडळांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिस, अग्निशमन सेवा आणि वन यासारख्या खात्यांमध्ये नोकरीत दहा टक्के आरक्षण दिले. त्यांना उच्च शिक्षणासाठी १० हजार रुपयांची मदत देणारी योजनादेखील सुरू करण्यात आली आहे.

उमेदवारांना फायदा

अर्धवेळ शिक्षकांना कंत्राटी दर्जा, रजा लाभ आणि ५ टक्के वार्षिक वेतनवाढीसह किमान २५,००० वेतन देण्यात आले आहे. क श्रेणी पदांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी नोकरीचे आरक्षण दुप्पट करून दहा टक्के केले आहे. ज्यामुळे २०१९ पासून ३७३ उमेदवारांना फायदा झाला आहे. अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या योजनेत २०२३ मध्ये सुधारणा करण्यात आली. ज्यामुळे उत्पन्न पात्रता मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढली. २०१९ पासून ३६५ उमेदवारांनी या योजनेअंतर्गत नोकऱ्या मिळवल्या आहेत.

कर्मचारी निवड आयोगाकडे ३,४२९ रिक्त पदांचे प्रस्ताव

गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे भरती सुरू झाली आहे. २०२३ ते २०२५ या काळात विविध खात्यांनी ३,४२९ रिक्त पदांचे प्रस्ताव आयोगाकडे पाठवले. पैकी १,२२१ पदांसाठी जाहिराती देण्यात आल्या व आतापर्यंत ४८ पदे भरण्यात आली. हे उपाय कार्यक्षमता सुधारण्यासाठी, गुणवत्तेवर आधारित भरती निश्चित करण्यासाठी आणि राज्याच्या सरकारी परिसंस्थेतील कामगारांना योग्य संधी प्रदान करण्यासाठी व्यापक प्रयत्नांचा एक भाग असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भरती आणि कौशल्य सुधारणा मोहिमेंतर्गत मल्टिटास्किंग स्टाफ आणि लिपिकसारख्या पदांसाठी सरकारने एक वर्षाचा कामाचा अनुभव अनिवार्य केला आहे. याव्यतिरिक्त, १ नोव्हेंबर २०२५ पासून मान्यताप्राप्त संस्थेकडून सहा महिन्यांचा संगणक डिप्लोमा आवश्यक असेल. २०२२ पासून ९४ भरती नियम अद्ययावत करण्यात आले आहेत, ज्यामध्ये अधिक सुधारणा सुरू आहेत.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकारjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन