शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

श्रीलंकेतून नारळ आयातीचा निर्णय गोव्याकडून मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 14:05 IST

श्रीलंकेतून गोव्यात नारळाची आयात करण्यात येईल अशा प्रकारचा विचार कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वी जाहीरपणे मांडला तरी, अशा प्रकारे आयात करणे हे सरकारवर दोष येणारे ठरेल याची कल्पना लगेच सरकारला आली. यामुळे सरकारने प्रस्ताव आता गुंडाळला आहे.

पणजी : श्रीलंकेतून गोव्यात नारळाची आयात करण्यात येईल अशा प्रकारचा विचार कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वी जाहीरपणे मांडला तरी, अशा प्रकारे आयात करणे हे सरकारवर दोष येणारे ठरेल याची कल्पना लगेच सरकारला आली. यामुळे सरकारने प्रस्ताव आता गुंडाळला आहे.गोव्यात नारळाचे दर प्रचंड वाढले आहेत. छोटे नारळ वीस रुपये दराने विकले जात आहेत. किंचित मोठे नारळ 25 रुपये तर एकदम मोठय़ा आकाराचे नारळ 35 ते 40 रुपये दराने विकले जात आहेत. नारळाचे दर प्रचंड वाढलेले असताना सरकार लोकांना दिलासा देण्यासाठी काहीच करत नाही अशी टीका करत काँग्रेसच्या महिला शाखेने अलिकडेच आंदोलन केले. आंदोलनावेळी महिला काँग्रेसने कमी दरात नारळ विक्री केली व ग्राहकांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला. याच काळात कृषी मंत्री सरदेसाई यांनी गोव्यात नारळाचा तुटवडा असल्याने सरकार श्रीलंकेमधून नारळाची आयात करील असे विधान केले. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर व इतरांनी टीका केली. नारळाच्या आयातीची गरज नाही, सरकारचा त्यामागिल हेतू गोव्यातील माडाच्या बागायती संपुष्टात आणून तेथील जमिनींचे सेटलमेन्ट झोनमध्ये रुपांतर करावे असा असावा असे चोडणकर यांनी म्हटले होते. त्यावर चोडणकर यांच्या मानसिकतेवर मंत्री सरदेसाई यांनी टीका करत प्रत्युत्तर दिले होते.या सगळ्य़ा वादात सरकारने अनुदानित दराने राज्यातील काही दालनांमधून नारळ विक्री सुरू केली. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाने पहिल्या टप्प्यात अवघ्याच दालनांमधून नारळ विक्री सुरू केली आहे. राज्यभरातील सर्व दालनांमधून नारळ विक्रीचा विस्तार करण्याचा गोवा फलोत्पादन विकास महामंडळाचा प्रस्ताव आहे. दालनांमधून कमी दराने नारळ विक्री करण्यासाठी मुळात जास्त संख्येने नारळ जलदगतीने उपलब्ध होणो गरजेचे आहे. एकूण एक लाख नारळ सरकारने तत्काळ विकत घ्यावे असा प्रयत्न महामंडळाने चालवला आहे. स्थानिक व अन्य ट्रेडर्सकडून गोवा बागायतदार संस्था व गोवा फलोत्पादन महामंडळ ही नारळ खरेदी करणार आहे.दरम्यान, श्रीलंकेतून नारळाची आयात करण्याचा प्रस्ताव आम्ही मागे घेतल्याचे कृषी मंत्री सरदेसाई यांनी सांगितले. आयात करण्याचा विचार आम्ही प्रारंभी केला होता पण आता गरज वाटत नाही असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा