शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोव्यातील नारळ टंचाईवर मात करण्यासाठी श्रीलंकेतून आयात, टंचाईमुळे नारळाचा दर पोचला 50 रुपयांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 19:09 IST

गोव्याला नारळाचा पुरवठा करणा:या रायलसीमा व दक्षिण कॅनरा येथे दुष्काळी स्थिती असल्याने गोव्यात नारळाची टंचाई वाढली आहे

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्याला नारळाचा पुरवठा करणा:या रायलसीमा व दक्षिण कॅनरा येथे दुष्काळी स्थिती असल्याने गोव्यात नारळाची टंचाई वाढली आहे. सध्या नारळाच्या एका नगाची किंमत 50 रुपयावर पोचली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कृषी खात्याने थेट श्रीलंकेतून नारळाची आयात करण्याचे ठरविले आहे.कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी मंगळवारी ही माहिती दिली. मडगावात एका कार्यक्रमाला आले असता गोव्यातील नारळाची टंचाई त्यांच्या लक्षात आणून दिली असता ते म्हणाले, डिसेंबरात राज्यातील नारळाचे दर स्थिर होतील अशी आमची अपेक्षा होती. मात्र अजुनही किंमती नियंत्रणात आलेल्या नाहीत त्यासाठीच आम्ही श्रीलंकेहून नारळाची आयात करण्याच्या विचारात आहोत असे ते म्हणाले.गोव्यात नारळाने एवढी उच्चांकी किंमत कधीच गाठली नव्हती. नारळ हा गोव्यातील मुख्य अन्न घटकांपैकी एक असल्याने सामान्यांची होरपळ झाली आहे. यासंबंधी सरदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले, एक आठवडा आम्ही वाट पाहू, जर दर स्थिर झाले नाहीत तर पर्यायी व्यवस्था करु. गोव्यातील उत्पादकांना नारळाची आधारभूत किंमत वाढवून देऊन मोठय़ा बागायतदारांकडून थेट नारळ खरेदी करण्याचीही सरकारची तयारी आहे. हा नारळ सवलतीच्या दरात तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्याची आमची तयारी आहे.गोव्यात नारळाचे उत्पादन कमी होते यासाठी डीजे फार्मने विकसित केलेल्या ह्यसंपूर्णह्ण या हायब्रीड नारळाची लागवड वाढविण्याच्या दृष्टीनेही सरकार प्रयत्न करत असून या नारळाची रोपे सवलतीच्या दरात बागायतदारांना उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाचाही आम्ही विचार करु असे ते म्हणाले. गोव्यातील सर्वसाधारण माड तीन महिन्यात 50 नारळ उत्पादित करते त्याच ठिकाणी हे हायब्रीड माडापासून 200 नगांचे उत्पादन घेता येणो शक्य आहे. अशा उत्पादनांतून गोव्याची गरज भागू शकते. गोव्यातील कृषी उत्पादन वाढविण्यासाठी वेंगुल्र्यातील कोकण कृषी विद्यापीठाकडे हात मिळविणार असेही सरदेसाई यांनी सांगितले.