शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मुख्यमंत्र्यांचे खलपांवर अस्त्र; प्रसंगी म्हापसा अर्बनची फाईल खुली करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2024 09:20 IST

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हापसा अर्बनमध्ये अनेक गोमंतकीयांचे पैसे बुडाले. लोकांना आपल्या कष्टाचे पैसे खलपांच्या कारकिर्दीतच गमवावे लागले. त्यामुळे नेमके किती लोकांचे पैसे बुडाले, याचा त्यांनी हिशोब द्यावा, असा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लगावत प्रसंगी म्हापसा अर्बनची फाईल खुली करण्याची धमकीच दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुमाळी सुरू असताना आता भाजपने खलपांची कोंडी करण्यासाठी हे अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा आहे.

म्हापसा अर्बन बँकेमध्ये ठेव ठेवलेल्यांचे पैसे बुडविणाऱ्यांनी श्रीपाद नाईक यांना आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये. ठेवीदारांना आणि भागधारकांना दुःख देणाऱ्यांना वेळच धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत? असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, गरज पडली तर या प्रकरणाची फाईल पुन्हा खुली करून चौकशी केली जाईल.

खलप यांच्या प्रत्येक मुद्द्यावर डिबेट करायला मी स्वतः तयार आहे, असे प्रतिआव्हानच मुख्यमंत्र्यांनी दिले. नाईक यांनी एक खासदार व मंत्री म्हणून गोव्यासाठी काय केले हे सांगावे. आपल्याबरोबर खुल्या डिबेटला यावे, असे आव्हान खलप यांनी दिले होते. यावेळी पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेपे, प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तनावडे उपस्थित होते. दोन्ही जिल्ह्यांत यंदा भाजपचाच उमेदवार जिंकत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

खलप यांनी केंद्रीय मंत्री नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात पडूच नये. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहे. त्यांना जे काही विचारायचे असेल ते आपल्याला विचारू शकतात. केवळ अलीकडे आपण जरा व्यस्त असल्यामुळे वेळ मिळत नाही. परंतु गोव्यातील निवडणुका झाल्यानंतर आपल्याकडे वेळ उपलब्ध असेल. त्यामुळे ७ मे नंतर केव्हाही ते आपल्याला खुल्या चर्चेसाठी बोलवू शकतात, असे ते म्हणाले. श्रीपाद नाईक यांनी त्यांच्या कार्यकळात राज्यात मोठ्या प्रमाणात प्रकल्प आणले आहेत. त्यामुळे त्या कारकिर्दीवर बोट ठेवणाऱ्यांनी आधी स्वतः केलेले घोटाळे पाहावे, असेही ते म्हणाले.

सरदेसाई हे गोव्याचे 'कटप्पा'

आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यावेळी आपण माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना पाठिंबा दिला होता, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठिंबा दिला. त्यांना भाजपाने काढून टाकल्यानंतर आता ते काँग्रेसला पाठिंबा देत आहेत. परंतु, ते काँग्रेस पक्षाच्या पाठीत कधी सुरा खुपसतील, हे सांगता येणार नाही. त्यामुळे सरदेसाई हे गोव्याचे 'कटप्पा आहेत, असा टोला आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी काल लगावला. 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Pramod Sawantप्रमोद सावंत