शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्बन नक्षली कोण? मुख्यमंत्र्यांनी नवीन वाद ओढवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 07:38 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक नवा वाद परवा ओढवून घेतला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक नवा वाद परवा ओढवून घेतला. लोकसभा निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे विविध समाज घटकांना चुचकारण्याचे धोरण राज्यकर्त्यांनी स्वीकारल्याचे दिसते. एरव्ही गोव्यातील जे मंत्री पंचतारांकित जीवन जगतात ते सध्या अत्यंत गरीब कुटुंबांमध्ये जाऊन चहापान करू लागले आहेत. विविध राज्यांतले भाजपचे काही बडे नेते दलित वस्त्यांमध्ये जातात, तिथे जेवण करण्याचा सोपस्कार पार पाडतात, याचा अर्थ ते पूर्णपणे दलितांशी एकरुप झालेत, असा काढावा काय? एकरुपता ही नैसर्गिक प्रक्रिया असते. गरीब, कष्टकरी, पददलित वर्गाच्या सुख-दुःखाशी खऱ्या अर्थाने समरस होणे हे खूप वेगळे आहे. 

गोव्यात जे एससी म्हणजे अनुसूचित जातीतील लोक आहेत, त्यांच्याविषयी मुख्यमंत्री सावंत यांनी परवा कळवळा दाखवला. गोव्यात गावकुसाबाहेर अनुसूचित जातींचे जे वाडे आहेत, तिथे जाऊन त्या लोकांमध्ये मिसळा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. अजूनदेखील एससी समाजातील लोकांना काही जण वेगळी वागणूक देतात. त्या समाजातील लोक भाजपच्या बैठकांमध्ये सहभागी होत नाहीत. किंवा त्यांच्यातला कुणी भाजप कार्यकर्तादेखील होत नाही, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आपल्या साखळी मतदारसंघात एससी समाजातील एकच भाजप कार्यकर्ता आहे, असे सावंत यांनी नावासह जाहीर केले. मुख्यमंत्री सावंत यांची कणव व तळमळ सच्ची वाटली, पण त्यांनी गोव्यात काही अर्बन नक्षली वावरत आहेत, असे विधान केल्याने सुजाण लोकांना धक्का बसला.

अर्बन नक्षली केवळ परप्रांतांमध्येच आहेत असे नाही तर आमच्या गोव्यातदेखील काही जण वावरत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडे गृह खातेही आहे. पोलिसांनी जर मुख्यमंत्र्यांना गोव्यातील अर्बन नक्षलींच्या नावांची यादी दिली असेल तर मुख्यमंत्र्यांनी ती जाहीर करावी, म्हणजे अर्बन नक्षली कोण व ते कोणकोणत्या गावांमध्ये फिरत आहेत किंवा ते कोणती चळवळ करत आहेत, हे जनतेलाही कळून येईल. मीडियाच्या ज्ञानातही भर पडेल. गोमंतकीय जनता एक मोठा शोध लावल्याबाबत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन व कौतुकही करेल.

भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची गेल्या शनिवारी पणजीत बैठक झाली. त्याच बैठकीत मुख्यमंत्री कथित अर्बन नक्षलींबाबत बोलले. गोव्यातील पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा पुसून टाकू, अशी घोषणा मध्यंतरी मुख्यमंत्री सावंत यांनी दोन-तीन वेळा केली. आता सरकार मुक्तीपूर्वी पोर्तुगीजांनी बांधलेल्या गोव्यातील मोठमोठ्या इमारती मोडून टाकेल, राजभवन प्रकल्प वगैरे जमीनदोस्त करील, असे लोकांना वाटले होते. मात्र तसे काही घडले नाही. गोव्यात काही अर्बन नक्षली अनुसूचित जातींच्या जवळ जाऊ पाहतात, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. 

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एससी समाजात जाऊन त्या लोकांशी संबंध व संपर्क वाढवावा, तसेच मोदी सरकारने राबविलेल्या चांगल्या योजनांची माहिती त्यांना द्यावी, अशी सूचना सावंत यांनी केली, मुख्यमंत्र्यांची ही सूचना योग्य आहे. वास्तविक मोदी सरकारच्या योजनांचा विषय सोडा, पण गोवा सरकारने आतापर्यंत एससी समाजाच्या कल्याणासाठी किती उपक्रम राबविले, त्यांना मूलभूत सुविधा तरी पुरविल्या काय हे जरा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. लोकांच्या घरी नळाद्वारे पाणी देखील पोहोचत नाही, नळ असले तरी, शिवोली, साळगाव, पर्वरी व एकूणव बार्देश व पेडण्यात अनेक ठिकाणी लोकांना नियमितपणे पाणी मिळत नाही. एससी, एसटी किंवा इतरांनाही वीज, पाणी या सुविधा नीट मिळत नाहीत, सत्तरीपासून सांगेपर्यंतच्या दुर्गम गावांमध्ये जर गोव्याचे पूर्ण मंत्रिमंडळ जाऊन काही दिवस राहिले तर तेथील अनेक लोकांना अजून विकासाच्या मुख्य धारेत आपण आणलेलेच नाही हे राज्यकर्त्यांना कळून येईल.

जे कार्यकर्ते कधी एससी किंवा कधी एसटी समाजाच्या जमिनींच्या रक्षणासाठी आंदोलन करतात, जे कधी गरीब जनतेच्या चळवळींना बळ देतात, अशा कार्यकर्त्यांना किंवा एनजीओंना जर सरकार नक्षलवादी ठरवणार असेल तर सरकारची वैचारिक क्षमता तपासून पाहावी लागेल. नेहरूंचा व बालदिनाचा काही संबंध नाही, असे विधान करूनही सरकारने आपली वैचारिक बैठक मध्यंतरी दाखवून दिली आहेच, महात्मा गांधी किंवा नेहरूंचे पूर्ण जीवन ज्यांना कळले आहे, ते कधी अशी विधाने करणार नाहीत.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत