शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

म्हापशातील समस्यांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा; पालिका बैठकीत कचराप्रश्नाने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:44 IST

कचराफेकूंविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : म्हापसा पालिकेतील अभियंत्यांचे असहकार्य, फाईल्स प्रलंबित ठेवल्या जातात, कचरा मुद्दा, पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा मुद्दा, जुन्या इमारतींचा मुद्दा यासारख्या विविध मुद्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालिकेत दि. ३ रोजी झालेल्या बैठकीत दिले.

म्हापशातील कचऱ्याच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन मंडळामार्फत कंत्राटदार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसे आदेश मंडळाला दिले जातील. पुढील ३ महिने हा कंत्राटदार पालिकेला कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी सहकार्य करणार आहे. उघड्यावर तसेच शेजारील परिसरातून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री म्हापसा नगरपालिकेत जाऊन पालिका मंडळासमवेत म्हापशातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती ज्योशुआ डिसोझा, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, इतर नगरसेवक तसेच विविध खात्यातील अधिकारी व्यापारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दीड तासाहून अधिक वेळ झालेल्या या बैठकीत नगरसेवकांनी पालिकेतील विविध मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

तुंबणाऱ्या पाण्याबाबत ठोस तोडगा हवा

मान्सूनपूर्व कामांसाठी जलस्रोत खाते तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सहकार्य लाभत नसल्याचे नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी निदर्शनाला आणून दिले. सदर सूचना मान्य करताना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश संबंधित खात्यांना दिले जातील. मात्र, पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावर तोडगा काढण्यास कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याचे नार्वेकर म्हणाले.

प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश

थकीत कर वसूल करण्यास पालिकेकडून पावले उचलण्यात आली नसल्याने त्या दृष्टीने उपाययोजना हाती घेण्याची सूचना करण्यात आली. इतर पालिकेच्या तुलनेत म्हापसातील करवसुली कमी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आवश्यकता भासल्यास बँकेचे सहकार्य घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच पडून असलेले प्रकल्प पूर्ण करण्याची सूचनाही करण्यात आली.

पाणी तुंबण्यास लोकही जबाबदार

पावसाळ्यात भरणाऱ्या पाण्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. पाणी भरण्यास फक्त पालिकाच जबाबदार नसून लोकही तेवढेच जबाबदार आहे. लोकांनी नाल्यावर संरक्षक भिंती तसेच इतर बांधकामे केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना ८ दिवसात तोडगा काढण्याचे आदेशही देण्यात आले. पाण्याचा प्रश्न तसेच विजेच्या मुद्यावर तोडगा काढला जाईल.

... म्हणून मुख्यमंत्र्यांना केले निमंत्रित

कचऱ्याच्या मुद्यावर सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती, अशी माहिती ज्योशुआ डिसोझा यांनी दिली. तसेच इतर विविध मुद्यांवर तोडग्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत