शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशातील समस्यांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा; पालिका बैठकीत कचराप्रश्नाने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:44 IST

कचराफेकूंविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : म्हापसा पालिकेतील अभियंत्यांचे असहकार्य, फाईल्स प्रलंबित ठेवल्या जातात, कचरा मुद्दा, पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा मुद्दा, जुन्या इमारतींचा मुद्दा यासारख्या विविध मुद्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालिकेत दि. ३ रोजी झालेल्या बैठकीत दिले.

म्हापशातील कचऱ्याच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन मंडळामार्फत कंत्राटदार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसे आदेश मंडळाला दिले जातील. पुढील ३ महिने हा कंत्राटदार पालिकेला कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी सहकार्य करणार आहे. उघड्यावर तसेच शेजारील परिसरातून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री म्हापसा नगरपालिकेत जाऊन पालिका मंडळासमवेत म्हापशातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती ज्योशुआ डिसोझा, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, इतर नगरसेवक तसेच विविध खात्यातील अधिकारी व्यापारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दीड तासाहून अधिक वेळ झालेल्या या बैठकीत नगरसेवकांनी पालिकेतील विविध मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

तुंबणाऱ्या पाण्याबाबत ठोस तोडगा हवा

मान्सूनपूर्व कामांसाठी जलस्रोत खाते तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सहकार्य लाभत नसल्याचे नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी निदर्शनाला आणून दिले. सदर सूचना मान्य करताना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश संबंधित खात्यांना दिले जातील. मात्र, पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावर तोडगा काढण्यास कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याचे नार्वेकर म्हणाले.

प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश

थकीत कर वसूल करण्यास पालिकेकडून पावले उचलण्यात आली नसल्याने त्या दृष्टीने उपाययोजना हाती घेण्याची सूचना करण्यात आली. इतर पालिकेच्या तुलनेत म्हापसातील करवसुली कमी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आवश्यकता भासल्यास बँकेचे सहकार्य घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच पडून असलेले प्रकल्प पूर्ण करण्याची सूचनाही करण्यात आली.

पाणी तुंबण्यास लोकही जबाबदार

पावसाळ्यात भरणाऱ्या पाण्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. पाणी भरण्यास फक्त पालिकाच जबाबदार नसून लोकही तेवढेच जबाबदार आहे. लोकांनी नाल्यावर संरक्षक भिंती तसेच इतर बांधकामे केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना ८ दिवसात तोडगा काढण्याचे आदेशही देण्यात आले. पाण्याचा प्रश्न तसेच विजेच्या मुद्यावर तोडगा काढला जाईल.

... म्हणून मुख्यमंत्र्यांना केले निमंत्रित

कचऱ्याच्या मुद्यावर सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती, अशी माहिती ज्योशुआ डिसोझा यांनी दिली. तसेच इतर विविध मुद्यांवर तोडग्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत