शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाचे काम माहीत; ते योग्य निर्णय घेतील!: सुभाष फळदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 08:28 IST

सहा वर्षपूर्तीबद्दल केले अभिनंदन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेऊन कामगिरी न दाखविलेल्या मंत्र्याला वगळण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यांना प्रत्येक मंत्र्यांचे काम माहिती आहे. त्यामुळे भविष्यात जे काही बदल होतील त्याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, अशी माहिती देताना समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.

डॉ. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारर्किदीला काल, बुधवारी सहा वर्षे झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी काल पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री फळदेसाई बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार डिलायला लोबो, भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर व आमदार केदार नाईक उपस्थित होते.

मंत्रिमंडळातील बदलाबाबत विचारले असता फळदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्री मंत्र्यांच्या कामाचा नियमितपणे आढावा घेत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या कामाबद्दल त्यांना माहिती आहे. त्यामुळे कोणाला डच्चू या निर्णयावर भाष्य करण्याचा अधिकार आम्हा मंत्र्यांना नाही, असेही ते म्हणाले.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विपरीत परिस्थितीत राज्याला सावरले. कोविड महामारीसारख्या जीवघेण्या संकट काळात मुख्यमंत्री सावंत यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यामुळेच निवडणुकीत जनतेने पुन्हा त्यांना मुख्यमंत्री बनविले. पक्ष, मंत्री यांच्यात चांगला समन्वयाचे कामही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यांच्या स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचे पंतप्रधान मोदी यांनीही कौतुक केल्याचे फळदेसाई म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण