शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्र्यांना केंद्राचे आशीर्वाद; दिल्लीत अनेक नेत्यांच्या गाठीभेटी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:28 IST

गोव्यातील विविध विषयांवर केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या कारकिर्दीची सहा वर्षे पूर्ण केली आहेत. दिल्लीत त्यांनी त्यानिमित्ताने विविध केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्र सरकारने विविध बाबतीत मुख्यमंत्री सावंत यांना आशीर्वाद दिला आहे.

मंगळवारी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले होते. दुसऱ्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही त्यांनी भेट घेतली. गोव्यातील काही प्रकल्पांविषयी चर्चा केली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मुख्यमंत्री भेटले. केंद्रीय रेल्वे मंत्री व इतरांचीही त्यांनी भेट घेतली. मंत्रिमंडळ फेररचना ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतर एप्रिलमध्ये होईल, असे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना वाटते.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सागरमाला सर्वोच्च समितीच्या बैठकीला उपस्थित राहून संबोधित केले. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किनारी राज्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारीही उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी सागरमाला अंतर्गत सरकारने सुरू केलेल्या विविध प्रकल्पांवर प्रकाश टाकला.

मुख्यमंत्री सावंत यांनी कौशल्य वाढ, सामाजिक आणि आर्थिक समावेश आणि आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित करून किनारी विकासाचे महत्त्व विषद केले. किनारी प्रदेशांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी सरकार रो-रो सेवा आणि वॉटर मेट्रोसारखे नवीन मार्ग देखील शोधत आहे.

राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीची बैठक भारतातील बंदर-नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सागरमाला कार्यक्रमाच्या विविध पैलूंवर चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी भागधारकांना एक व्यासपीठ प्रदान करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सागरमाला बैठकीत बंदरांचे आधुनिकीकरण व जेटींचे बळकटीकरण करणे हे गोव्यात पर्यटन आणि दैनंदिन प्रवास वाढवणे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा