शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

प्रियोळचीही जागा भाजपच लढवणार, मान्य नसेल तर युतीमधून चालते व्हावे; मुख्यमंत्री सावंत यांनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:45 IST

मगोला कडक इशारा, ढवळीकरांना 'टेन्शन'

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: प्रियोळ व मांद्रे विधानसभा मतदारसंघ भाजपच लढवणार असून मान्य नसेल तर चालते व्हा, अशा कडक शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मगोच्या नेतृत्वाला ठणकावले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे भाजप-मगो युतीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे मंत्री गोविंद गावडे यांना हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे.

प्रियोळमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपला युतीची गरज नसल्याचे स्पष्टच सांगितले. ते म्हणाले की, प्रियोळ आणि मांद्रेच्याबाबतीत काडीचीही तडजोड केली जाणार नाही. मान्य नाही तर मगोपने चालते व्हावे. सावंत म्हणाले की, निवडणूक जवळ आल्यावर भूलथापा मारणारे, दुफळी निर्माण करणारे अनेकजण येतील. कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीला आता जास्त कालावधी राहिलेला नाही.' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'केंद्रात व राज्यात भाजपचे डबल इंजीन सरकार आहे. गोव्यात विकासकामांसाठी केंद्र सरकारने भरभरून निधी दिलेला आहे. कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी राहावे व पोटतिडकीने काम करावे.'

येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायतींच्या व नंतर मार्चमध्ये पालिका निवडणुका होतील व विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागतील. विधानसभेसाठी अनेकजण बाशिंग बांधून तयार आहेत. मी आधीच स्पष्ट केलेय, प्रियोळ व भाजप मतदारसंघ भाजपकडेच राहील. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

मला फरक पडत नाही: डॉ. केतन भाटीकर

दरम्यान, फोंड्यात मगोच्या तिकिटावर रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेले डॉ. केतन भाटीकर म्हणाले की, "युती असो वा नसो, मला काही फरक पडत नाही. मी फॉड्यात मगोप नेता म्हणून काम करत आहे. मला खात्री आहे की मी पुढील निवडणूक मगोचा उमेदवार म्हणून लढेन आणि नक्कीच जिंकेन."

कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ आले : गोविंद गावडे

प्रियोळचे आमदार तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने मला व कार्यकर्त्यांना दहा हत्तींचे बळ प्राप्त झाले आहे. २००७साली लक्ष्मीकांत पार्सेकर प्रदेशाध्यक्ष असताना मी हेच सांगत होतो की, भाजपला मगोपकडे युती करण्याची गरज नाही आणि आता आगामी काळातही युती करण्याची अजिबात गरज नाही. भाजपने निवडणूक स्वबळावर लढवल्यास बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याची ताकद भाजपमध्ये आहे. गेली आठ वर्षे मी गोमंतकीयांसाठी काम करत आहे. भाजपने नेहमीच चांगले प्रशासन दिले आहे. त्यामुळे पक्षाचे स्थान जनमानसात मजबूत झाले आहे.'

कोणाला ब्लॅकमेल करण्याचा प्रश्नच नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, पक्ष संघटन मजबूत करणे व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे. निवडणूक स्वबळावर लढवणे ही कार्यकर्त्यांची पूर्वीपासूनची मागणी आहे. जुने व नवे अशा दोन्ही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. यात कोणाला ब्लॅकमेल करणे किंवा कोणाला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही.

मुख्यमंत्री दिल्लीस रवाना

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत काल रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य नेत्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ पुनर्रचना तसेच अन्य राजकीय विषयावर चर्चा करतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गोवा सरकार ७ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार आघाडीवर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांशी बैठकीत ते या विषयावर चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत