शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

प्रियोळचीही जागा भाजपच लढवणार, मान्य नसेल तर युतीमधून चालते व्हावे; मुख्यमंत्री सावंत यांनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:45 IST

मगोला कडक इशारा, ढवळीकरांना 'टेन्शन'

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: प्रियोळ व मांद्रे विधानसभा मतदारसंघ भाजपच लढवणार असून मान्य नसेल तर चालते व्हा, अशा कडक शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मगोच्या नेतृत्वाला ठणकावले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे भाजप-मगो युतीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे मंत्री गोविंद गावडे यांना हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे.

प्रियोळमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपला युतीची गरज नसल्याचे स्पष्टच सांगितले. ते म्हणाले की, प्रियोळ आणि मांद्रेच्याबाबतीत काडीचीही तडजोड केली जाणार नाही. मान्य नाही तर मगोपने चालते व्हावे. सावंत म्हणाले की, निवडणूक जवळ आल्यावर भूलथापा मारणारे, दुफळी निर्माण करणारे अनेकजण येतील. कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीला आता जास्त कालावधी राहिलेला नाही.' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'केंद्रात व राज्यात भाजपचे डबल इंजीन सरकार आहे. गोव्यात विकासकामांसाठी केंद्र सरकारने भरभरून निधी दिलेला आहे. कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी राहावे व पोटतिडकीने काम करावे.'

येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायतींच्या व नंतर मार्चमध्ये पालिका निवडणुका होतील व विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागतील. विधानसभेसाठी अनेकजण बाशिंग बांधून तयार आहेत. मी आधीच स्पष्ट केलेय, प्रियोळ व भाजप मतदारसंघ भाजपकडेच राहील. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

मला फरक पडत नाही: डॉ. केतन भाटीकर

दरम्यान, फोंड्यात मगोच्या तिकिटावर रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेले डॉ. केतन भाटीकर म्हणाले की, "युती असो वा नसो, मला काही फरक पडत नाही. मी फॉड्यात मगोप नेता म्हणून काम करत आहे. मला खात्री आहे की मी पुढील निवडणूक मगोचा उमेदवार म्हणून लढेन आणि नक्कीच जिंकेन."

कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ आले : गोविंद गावडे

प्रियोळचे आमदार तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने मला व कार्यकर्त्यांना दहा हत्तींचे बळ प्राप्त झाले आहे. २००७साली लक्ष्मीकांत पार्सेकर प्रदेशाध्यक्ष असताना मी हेच सांगत होतो की, भाजपला मगोपकडे युती करण्याची गरज नाही आणि आता आगामी काळातही युती करण्याची अजिबात गरज नाही. भाजपने निवडणूक स्वबळावर लढवल्यास बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याची ताकद भाजपमध्ये आहे. गेली आठ वर्षे मी गोमंतकीयांसाठी काम करत आहे. भाजपने नेहमीच चांगले प्रशासन दिले आहे. त्यामुळे पक्षाचे स्थान जनमानसात मजबूत झाले आहे.'

कोणाला ब्लॅकमेल करण्याचा प्रश्नच नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, पक्ष संघटन मजबूत करणे व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे. निवडणूक स्वबळावर लढवणे ही कार्यकर्त्यांची पूर्वीपासूनची मागणी आहे. जुने व नवे अशा दोन्ही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. यात कोणाला ब्लॅकमेल करणे किंवा कोणाला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही.

मुख्यमंत्री दिल्लीस रवाना

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत काल रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य नेत्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ पुनर्रचना तसेच अन्य राजकीय विषयावर चर्चा करतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गोवा सरकार ७ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार आघाडीवर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांशी बैठकीत ते या विषयावर चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत