शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “निश्चितच!! बहुमत चाचणी सहजपणे पार करेन”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पूर्ण विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:24 IST

Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पणजी: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. नव्या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी दिल्यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या असून, बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. यावेळी दाबोळी विमानतळावर बोलताना, बहुमत चाचणी सहजपणे पार करू शकेन, असा विश्वस एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे रात्री उशिरा गोव्याला रवाना झाले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांची बैठक घेतली. यानंतर ते आता पुन्हा मुंबईत आले आहेत. मुंबईला रवाना होत असताना दाबोळी विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, माझ्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. हे निश्चित आहे की, बहुमत चाचणी सहजपणे पार करून शकेन, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस बंडखोरांना संबोधित करणार?

सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, २ आणि ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार होते. मात्र, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार तसेच शिंदे गटाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार शनिवारी मुंबईत दाखल होणार आहे. शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार मुंबईत दाखल झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडाळी झाली. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी सूरत गाठले. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली. सूरत सोडल्यानंतर शिंदे गट गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये थांबला होता. या ठिकाणी शिवसेनेचे ३९ आमदार आणि अपक्षांसह जवळपास ५० आमदार गुवाहाटीत होते. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांनी गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि आता यानंतर सर्वजण मुंबईत दाखल होणार आहेत.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेgoaगोवाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ