शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ
2
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
3
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
4
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
5
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
6
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
7
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
8
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
9
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
10
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
11
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
12
Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
13
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
14
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
15
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
16
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
17
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
18
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने तीळगुळाहून गोड, पण चिडले की समोरच्यावर संक्रांत!
19
५० देशांच्या जीडीपीपेक्षा BMC ची तिजोरी मोठी; पाहा मुंबई महापालिकेच्या सत्तेचे आर्थिक गणित
20
चोराचा कारनामा! मंदिरात चोरी केली, हात जोडून माफी मागितली अन् दागिन्यांवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “निश्चितच!! बहुमत चाचणी सहजपणे पार करेन”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पूर्ण विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:24 IST

Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पणजी: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. नव्या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी दिल्यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या असून, बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. यावेळी दाबोळी विमानतळावर बोलताना, बहुमत चाचणी सहजपणे पार करू शकेन, असा विश्वस एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे रात्री उशिरा गोव्याला रवाना झाले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांची बैठक घेतली. यानंतर ते आता पुन्हा मुंबईत आले आहेत. मुंबईला रवाना होत असताना दाबोळी विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, माझ्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. हे निश्चित आहे की, बहुमत चाचणी सहजपणे पार करून शकेन, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस बंडखोरांना संबोधित करणार?

सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, २ आणि ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार होते. मात्र, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार तसेच शिंदे गटाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार शनिवारी मुंबईत दाखल होणार आहे. शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार मुंबईत दाखल झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडाळी झाली. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी सूरत गाठले. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली. सूरत सोडल्यानंतर शिंदे गट गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये थांबला होता. या ठिकाणी शिवसेनेचे ३९ आमदार आणि अपक्षांसह जवळपास ५० आमदार गुवाहाटीत होते. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांनी गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि आता यानंतर सर्वजण मुंबईत दाखल होणार आहेत.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेgoaगोवाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ