शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सीएम व अपॉइन्टमेन्ट

By admin | Updated: May 7, 2014 18:08 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट मिळावी, त्यांनी भेटीची वेळ द्यावी, आपली समस्या ऐकून घ्यावी म्हणून राज्यातील अनेक लोक आणि विविध संघटना प्रयत्न करत असतात.

सीएम व अपॉइन्टमेन्टमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट मिळावी, त्यांनी भेटीची वेळ द्यावी, आपली समस्या ऐकून घ्यावी म्हणून राज्यातील अनेक लोक आणि विविध संघटना प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकांना भेटीची वेळ मिळत नाही, अशी खंत अनेकजण व्यक्त करताना पहायला मिळतात. पर्रीकर खूप बिझी राहत असल्याने त्यांना प्रत्येकास भेटण्यासाठी वेळ मिळत नसावा. मंगळवारी पणजीत महिला संघटनांची एक बैठक झाली. त्या वेळी तीव्रपणे एक खंत व्यक्त करण्यात आली. आम्ही राज्यातील मद्यालयांच्या वेळांबाबतच्या समस्येविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागतोय पण ते वेळच देत नाहीत, असे महिला संघटनांच्या नेत्यांनी बैठकीत सांगितले. पणजीतील तलवार हल्ला प्रकरणी कांपालमधील काही नागरिकांनी कँडल रॅली काढली होती. कांपालमधील उपमहापौर कबिर मखिजा यांच्यासारख्या हायप्रोफाईल व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांना लगेच भेट दिली गेली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समस्याही ऐकून घेतली. आम्हाला मात्र सीएम भेटीसाठी वेळ देत नाहीत. मद्यालयांच्या वेळांचा विषय सरकारला गंभीर वाटत नसावा किंवा आम्ही आम आदमी असल्याने आम्हाला भेटीसाठी वेळ दिला जात नसावा, अशी चर्चा महिला कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. सॅबिना मॅडमही सरकारच्या धोरणावर खूप नाराज झाल्या आहेत. बिच्चारे वादळग्रस्तसत्तरी व डिचोली तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठे वादळ आले होते, तेव्हा सर्व पक्षाच्या राजकारण्यांनी व काही प्रमुख उमेदवारांनी तिथे धाव घेतली होती. वादळग्रस्तांची समस्या ऐकून घेतली होती. तेथील हानीची पाहणी केली होती. वादळग्रस्तांसाठी आम्ही हे करू आणि ते करू, अशा घोषणा काहीजणांनी केल्या होत्या. मात्र, अजूनही सत्तरीतील अनेक वादळग्रस्तांना मदत मिळालेली नाही. ज्यांची घरे पूर्णत: मोडली त्यांना थोडी मदत मिळाली. मात्र, ज्यांच्या बागायतींची मोठी हानी झाली आहे, त्यांना काहीच अर्थसा‘ मिळालेले नाही. काहीजणांनी कृषी खात्याकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत, काहीजणांनी अर्ज केलेले नाहीत. शेतकर्‍यांचे नुकसान मोठे होते; पण सरकार तुटपुंजी मदत देते. ती तुटपुंजी मदतदेखील वेळेत मिळत नाही तेव्हा शेतकरी व बागायतदार हताश होतात. सत्तरी व डिचोलीतील अनेक शेतकरी हताश झाले आहेत. लोकांनी शेतीकडे वळावे, युवकांनी स्वयंरोजगार करावा, असे राजकीय नेते सांगतात तेव्हा त्यांना शेतकर्‍यांचे दु:ख दिसत नाही.