शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

सीएम व अपॉइन्टमेन्ट

By admin | Updated: May 7, 2014 18:08 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट मिळावी, त्यांनी भेटीची वेळ द्यावी, आपली समस्या ऐकून घ्यावी म्हणून राज्यातील अनेक लोक आणि विविध संघटना प्रयत्न करत असतात.

सीएम व अपॉइन्टमेन्टमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट मिळावी, त्यांनी भेटीची वेळ द्यावी, आपली समस्या ऐकून घ्यावी म्हणून राज्यातील अनेक लोक आणि विविध संघटना प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकांना भेटीची वेळ मिळत नाही, अशी खंत अनेकजण व्यक्त करताना पहायला मिळतात. पर्रीकर खूप बिझी राहत असल्याने त्यांना प्रत्येकास भेटण्यासाठी वेळ मिळत नसावा. मंगळवारी पणजीत महिला संघटनांची एक बैठक झाली. त्या वेळी तीव्रपणे एक खंत व्यक्त करण्यात आली. आम्ही राज्यातील मद्यालयांच्या वेळांबाबतच्या समस्येविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागतोय पण ते वेळच देत नाहीत, असे महिला संघटनांच्या नेत्यांनी बैठकीत सांगितले. पणजीतील तलवार हल्ला प्रकरणी कांपालमधील काही नागरिकांनी कँडल रॅली काढली होती. कांपालमधील उपमहापौर कबिर मखिजा यांच्यासारख्या हायप्रोफाईल व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांना लगेच भेट दिली गेली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समस्याही ऐकून घेतली. आम्हाला मात्र सीएम भेटीसाठी वेळ देत नाहीत. मद्यालयांच्या वेळांचा विषय सरकारला गंभीर वाटत नसावा किंवा आम्ही आम आदमी असल्याने आम्हाला भेटीसाठी वेळ दिला जात नसावा, अशी चर्चा महिला कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. सॅबिना मॅडमही सरकारच्या धोरणावर खूप नाराज झाल्या आहेत. बिच्चारे वादळग्रस्तसत्तरी व डिचोली तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठे वादळ आले होते, तेव्हा सर्व पक्षाच्या राजकारण्यांनी व काही प्रमुख उमेदवारांनी तिथे धाव घेतली होती. वादळग्रस्तांची समस्या ऐकून घेतली होती. तेथील हानीची पाहणी केली होती. वादळग्रस्तांसाठी आम्ही हे करू आणि ते करू, अशा घोषणा काहीजणांनी केल्या होत्या. मात्र, अजूनही सत्तरीतील अनेक वादळग्रस्तांना मदत मिळालेली नाही. ज्यांची घरे पूर्णत: मोडली त्यांना थोडी मदत मिळाली. मात्र, ज्यांच्या बागायतींची मोठी हानी झाली आहे, त्यांना काहीच अर्थसा‘ मिळालेले नाही. काहीजणांनी कृषी खात्याकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत, काहीजणांनी अर्ज केलेले नाहीत. शेतकर्‍यांचे नुकसान मोठे होते; पण सरकार तुटपुंजी मदत देते. ती तुटपुंजी मदतदेखील वेळेत मिळत नाही तेव्हा शेतकरी व बागायतदार हताश होतात. सत्तरी व डिचोलीतील अनेक शेतकरी हताश झाले आहेत. लोकांनी शेतीकडे वळावे, युवकांनी स्वयंरोजगार करावा, असे राजकीय नेते सांगतात तेव्हा त्यांना शेतकर्‍यांचे दु:ख दिसत नाही.