शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

लहान मुलांना होऊ शकतो 'ऑक्टोबर हीट'चा ताप; विविध आजार होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2024 08:44 IST

सूर्य किरणांच्या तीव्रतेत होते वाढ; कोणत्या आजारांचा धोका? 

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून शरद ऋतू लागल्यानंतर सूर्याच्या किरणांची तीव्रता (प्रखरता) वाढते. त्यामुळे विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. दुपारी सूर्याच्या किरणांपासून शक्त तेवढे दूर राहणे लाभदायक ठरेल. शरदऋतूमध्ये माणसाच्या शरीरातील पित्ताचा प्रकोप वाढत असल्याने या काळात संसर्ग होऊन विविध प्रकारचे आजार होऊ शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करतात. 

ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विविध भागांत सकाळ-दुपारच्या वेळी सर्वांत जास्त असा कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचू शकतो. त्यामुळे या कालावधीत माणसाच्या शरीरातील पित्ताचा प्रकोप वाढतो अशावेळी या कालावधीत चण्याचे पीठ, राजमा, उडीद डाळ, थंड पदार्थ, बटाटे आणि बटाट्याचे विविध पदार्थ, मांसाहारी जेवण, दही इत्यादी पित्त वाढवणारे खाद्यपदार्थ टाळणे अनेकदा फायद्याचे ठरते.

लहान मुले, वृद्धांना धोका

शरीरात पित्ताचा प्रकोप वाढल्यानंतर सर्दी-ताप, खोकला इत्यादी संसर्गजनक आजार होण्याची शक्यता निर्माण होते. अशा प्रकारचे संसर्गजनक आजार लहान मुले आणि वृद्धांना अधिक प्रमाणात आढळून येतात.

कोणत्या आजारांचा धोका? 

सर्दी : वर्षा ऋतूत माणसाच्या शरीरात पित्ताचे संचय (जमा होणे) व्हायला सुरुवात होते. मध्य सप्टेंबरमध्ये शरद ऋतू लागल्यानंतर माणसाच्या शरीरातील पित्ताचा प्रकोप वाढतो. त्यामुळे अनेक लोकांना संसर्गजनक आजारांचे प्रमाण वाढते. या काळात अनेकांना सर्दीचा त्रास होताना दिसून येतो. 

ताप : या काळात अनेक लोकांना ताप येणे, खोकला सुरु होणे अशा प्रकारचे त्रास होताना दिसून येतात. ज्यांना अशा प्रकारची समस्या निर्माण होते, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषध घ्यावे.

नाक वाहणे : अनेकांना या काळात सर्दी, खोकला होण्याबरोबरच नाक वाहणे यांसारख्या समस्येमुळे त्रस्त व्हावे लागते.

मध्य सप्टेंबर ते मध्य ऑक्टोबर अशा कालावधीत शरद ऋतू लागत असून या कालावधीत माणसाच्या शरीरातील पित्ताचा प्रकोप वाढतो. त्यामुळे या काळात संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कालावधीत आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी पित्त-वायू शरीरात वाढणार नाही, अशा प्रकारच्या खाद्यपदार्थाचे सेवन केल्यास फायदेशीर ठरते. फायदेशीर ठरेल. पित्त वाढवणारे खाद्यपदार्थ टाळल्यास - डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, आयुर्वेदिक चिकित्सक, मुरगाव

 

टॅग्स :goaगोवाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजना