शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बाल हक्क आयोगातर्फे बालसभासाठी 'मार्गदर्शक दस्तऐवज' जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 14:55 IST

या सभामार्फत मुलांचे आवाज ऐकले जातील आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कृती केली जाईल.

पणजी (नारायण गावस ): मुलांनाही लोकशाही कळावी तसेच भविष्यात एक उत्कृष्ट नागरिक व्हावे यासाठी गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पंचायत तसेच नगरपालिकांमध्ये बालसभेसाठी 'मार्गदर्शक दस्तऐवज' जारी केला आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये बालसभा आयोजित करण्यासाठी एक सर्वसमावेशक पुस्तिका म्हणून काम करेल. या सभामार्फत मुलांचे आवाज ऐकले जातील आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कृती केली जाईल.

बालहक्क आयोगाने म्हटले आहे की, भविष्यात एक जबाबदार नागरिक तयार करण्यासाठी गाव पातळीवर बाल संरक्षण आकार मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक पंचायत आणि नगरपालिकेने बाल ग्रामसभा आयोजित केल्यापासून ३० दिवसांच्या आत, कार्यवाही आणि परिणामांचा तपशीलवार अनुपालन अहवाल सादर करावा, असा आदेशही आयोगाने दिला आहे.

ही बालसभा फक़्त केवळ मुलांचे ऐकण्यासाठीच नाही तर त्यांना निर्णय प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेईल, असे त्यात म्हटले आहे. बालहक्क आयोगाने पंचायतींच्या संचालकांना आणि नगरपालिका प्रशासनाला दर वर्षी किमान दोन बाल ग्रामसभा आयोजित करण्याच्या विनंतीसह सर्व पंचायती आणि नगरपालिकांना दस्तऐवज प्रसारित करण्यास सांगितले आहे.

देशभर बालसभा आशेचा किरण म्हणून उभ्या राहत आहेत. प्रत्येक मुलाचे मत आपल्या समाजाच्या संरचनेचा महत्वाचे आहे. जगण्याचे, विकासाचे, संरक्षणाचे आणि सहभागाचे मूलभूत अधिकार कळायला हवे. आम्ही अशा समाजाचा पाया रचत आहोत जो केवळ आपल्या मुलांचे ऐकतोच असे नाही तर त्यांच्या विचारांचा आदर करतो आणि त्यावर कार्य करतो असेही बालहक्क आयोगाने म्हटले आहे. 

टॅग्स :goaगोवा