शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पर्रिकर लोकांची दिशाभूल करतायत - शांताराम नाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 13:21 IST

गोव्यातील सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण झालेले नाही, असा खोटा बचाव घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर लोकांची दिशाभूल करत आहेत.

पणजी - गोव्यातील सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण झालेले नाही, असा खोटा बचाव घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राज्यसभेचे माजी खासदार तथा काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला आहे. ते म्हणाले कि पर्रिकर खोटी विधाने करत आहेत. हे नद्यांचे राष्ट्रीयीकरण नव्हे तर मुरगाव बंदर गोवा सरकार आणि केंद्र यांच्यात त्रिपक्षीय परस्पर समझोता कराराचे प्रयोजन काय, असा सवाल त्यांनी केला. 

गोव्यातील नद्यांचे राष्ट्रीयीकरण झाल्यास किनारी भाग आणि नद्यांवरील सर्व हक्क केंद्राच्या हाती जातील स्थानिकांना किनारी भागात कोणतेही बांधकाम करता येणार नाही आणि प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडून परवानगी घ्यावी लागेल. परस्पर समझोता कराराचा तयार केलेला मसुदा संशयास्पद आहे. राष्ट्रीयीकरण झाले तर  कोणता  सामाजिक  परिणाम होणार याचा अभ्यास केलेला नाही. पर्यावरण संवर्धन कायद्याखाली केंद्र किंवा राज्य सरकारचे आवश्यकतेप्रमाणे परवाने घेतलेले नाही. 

2016 च्या राष्ट्रीय जलवाहतूक कायद्यातील तरतुदीनुसार असे स्पष्ट होते की, काही जलमार्गाचे नियमन आणि विकास तसेच अंतर्गत जलवाहतूक हा हेतू आहे. देशभरातील 111 नद्या मध्ये गोव्याच्या शापोरा, कुंभारजुवे, मांडवी, म्हापसा, साळ, झुवारी या नद्यांचा यामध्ये समावेश आहे.

कायद्याच्या कलम 3 नुसार नद्यांवर केंद्राचे नियंत्रण राहणार आहे अंतर्गत जलवाहतूक तसेच अन्य संबंधित अधिकार केंद्राकडे जातील. वरील कायदा तसेच 1985 चा अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरण कायदा या दोन्ही कायद्यान्वये नद्यांचे सर्व अधिकार केंद्राकडे जाणार आहेत. नद्यांमध्ये काहीही करता येणार नाही कायद्याचे कलम 14 अन्वये अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरणाला गोव्याच्या नद्यांमध्ये सर्वेक्षण, तपासणी तसेच अन्य गोष्टी करण्याची पूर्ण मुभा मिळणार आहे. 

स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर  गदा येणार आह, असा आरोप शांताराम नाईक यांनी केला दरम्यान पत्रकार परिषदेत अन्य एका प्रश्नावर बोलताना  आधार कार्डचा लाभ अनिवासी गोमंतकीयांनाही दिला जावा, अशी मागणी केली आहे. नोकरीधंद्यानिमित्त विदेशात वास्तव्यास आहेत ते अधूनमधून गोव्यात येत असतात परंतु त्यांना आधार कार्ड दिले जात नाही राज्यात 182 दिवसांचे वास्तव्य ही अट त्यांच्या मुळावर आलेली आहे केंद्र-सरकार संसदेत कायदा आणून अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क बहाल करण्याचे पाऊल एकीकडे उचलत असताना दुसरीकडे गोव्यात मात्र अनिवासी गोमंतकाची आधार कार्डसाठी ससेहोलपट झाली आहे. 

अनिवासी गोमंतकीय किंवा अनिवासी भारतीय यांना आधार कार्ड तसेच येथे मतदानाचा हक्क प्राप्त व्हायला हवा ,अशी मागणी शांताराम यांनी शेवटी केली आहे. दरम्यान खाण घोटाळा प्रकरणात पोलिसांना हवे असलेले काँग्रेस आमदार दिगंबर कामत यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्षांना विचारले असता ते आपल्या संपर्कात नसल्याचा दावा त्यांनी केला.  कामत यांना क्लीन चिट देताना शांताराम म्हणाले की खाणींना विलंबाची माफी देण्याची कामत यांची कृती गुन्हा नव्हे, त्यांनी न्यायिक अधिकाराखाली विलंबाची माफी दिलेली आहे आणि चुकीचे काही केले आहे असे वाटत नाही कामत त्यांच्याविरुद्ध हा राजकीय सूड असल्याचा आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा