शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 15 जूनला गोव्यात परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 18:41 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कधी एकदा गोव्यात येतात असे काही मंत्र्यांना झाले आहे. येत्या 15 रोजी मुख्यमंत्री अमेरिकेहून गोव्यात परतण्याची शक्यता आहे.

पणजी : सध्या नोकरशाही काही मंत्री व आमदारांचे काहीच ऐकत नाही अशी स्थिती राज्यात आहे. काही मंत्र्यांचे प्रस्ताव मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील प्रधान सचिव कृष्णमूर्ती यांच्याकडून संमतच होत नाहीत असा अनुभव येत असल्याने मंत्री वैतागले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कधी एकदा गोव्यात येतात असे काही मंत्र्यांना झाले आहे. येत्या 15 रोजी मुख्यमंत्री अमेरिकेहून गोव्यात परतण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर हे गेल्या 16 मार्च रोजी अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी तीन मंत्र्यांची समिती (सीएसी) मंत्रिमंडळ सल्लागार म्हणून नेमली होती. त्यापैकी एक मंत्री पोतरुगालला गेला आहे. दोनच मंत्री राहिले आहेत. गेले वीस दिवस सीएसीची एकही बैठक झालेली नाही. कारण बैठक घेण्यासाठी मुख्य सचिवांनी वगैरे या समितीसमोर अजेंडा मांडायचा असतो. अजेंडा मांडण्यासारखे काही नसल्याने बैठक झालेलीच नाही.

एका मंत्र्याने मंगळवारी लोकमतला सांगितले, की आम्ही जे प्रस्ताव प्राधान्याने मंजूर व्हावेत व त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून वरिष्ठ अधिका-यांकडे पाठवतो, ते मंजूर होतच नाहीत. मुख्यमंत्री पर्रीकर गोव्यात होते तेव्हा प्रस्ताव मंजूर व्हायचे. आमचे विचार, कल्पना, प्रस्ताव अंमलात येत नसल्याने आम्हाला लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. मुख्य सचिव किंवा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांना लोक काही विचारू शकत नाहीत. आम्हाला विचारतात. आता लोकांच्या अपेक्षेचाच ताण आमच्यावर खूप वाढला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर गोव्यात परतल्यानंतर आपण त्यांच्यासमोर अधिका-यांकडे पाठविलेल्या व प्रलंबित राहिलेल्या कामांची यादी सादर करीन.

दरम्यान, भाजपचे आमदार निलेश काब्राल यांनी मंगळवारी पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयात एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की पर्रीकर येत्या 15 रोजी गोव्यात परतत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी थांबलो आहोत. गोव्यातील खनिज खाणप्रश्न वगैरे मग मार्गी लागेल. 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दोन दिवस गोव्यात होते. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीमुळे गोव्यात विकास कामे ठप्प होत आहेत काय असे पत्रकारांनी गडकरी यांना विचारले असता, तसे काही ठप्प झालेले नाही असे ते म्हणाले. मुख्यमंत्री नाहीत म्हणून विकास कामे थांबलेली नाहीत. गोव्यातील अन्य सर्व मंत्री कार्यक्षम आहेत आणि ते कामे पुढे नेत आहेत.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाNitin Gadkariनितीन गडकरी