शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

सेवा नियमात बदल भोवला; सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2024 07:55 IST

मुख्य सचिवांना सुनावले खडे बोल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांच्या भरती आणि सेवेबाबत तयार केलेल्या नियमांमध्ये बदल केल्याने सर्वोच्च न्यायालयाने गोव्याच्या मुख्य सचिवांना कडक शब्दांत फटकारले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीच्या माजी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर तीन ते सात वर्षे उलटूनही निवृत्तिवेतनाचा लाभ मिळालेला नाही. यासंदर्भात तक्रारीवरून सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेत सुनावणी सुरू केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या भरती आणि सेवेबाबत नियम तयार केले होते तरीही मुख्य सचिवांनी ते बदलताना त्यांचा सल्ला घेतला गेला नाही व हायकोर्ट गोवा अधिकारी व कर्मचारी (भरती व सेवा शर्ती) २०२३ हे नियम नव्याने आणले आहेत. याबद्दल न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने केलेले बदल हे कायद्याच्या विरोधात असल्याचा आक्षेप तक्रारदारांचा आहे.

हे एक निर्लज्ज कृत्य : संतप्त न्यायमूर्तीचे भाष्य

मुख्य सचिवांनी या सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मजकुराचा उल्लेख करून 'हे एक निर्लज्ज कृत्य आहे. हे काय चालले आहे? अशा शब्दांत न्यायमूर्तींनी मुख्य सचिवांना फटकारले आहे. याबाबत न्यायालयाने सरकारने केलेले बदल त्वरित मागे घेतले जावेत, असे बजावले. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या २२ रोजी ठेवण्यात आली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या या सुनावणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा, असेही न्यायमूर्तीनी म्हटले आहे. सरकारने न्यायालयाने तयार केलेल्या नियमांत केलेल्या बदलांची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या प्रकरणाच्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्हाला मुख्य सचिवांना धडा शिकवायलाच हवा : न्यायमूर्ती

उच्च न्यायालयाने तयार केलेले नियम गोवा सरकारने बदलून अंतिम सल्लामसलत न करता सरन्यायाधीशांच्या नावाने ते प्रसिद्ध केले, याकडे कोर्टात तक्रारदार कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी लक्ष वेधले होते. राज्य सरकारच्या वकिलांनी यास उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. मात्र, न्यायालयाने सांगितले की, 'आम्हाला मुख्य सचिवांना धडा शिकवायला हवा.' या ठप्प्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही हस्तक्षेप केला. सर्व काही योग्यरीत्या केले जाईल. मला वेळ द्या, असे मुख्य सचिवांच्या वतीने बाजू मांडताना ते म्हणाले. तथापि, न्यायमूर्तीनी त्यांची विनंती धुडकावून लावली.

आम्हाला धक्का बसला 

न्यायमूर्तीनी अशीही टिप्पणी केली की, 'बदललेले नियम मागे घेण्याऐवजी मुख्य सचिवांनी त्यांचा बचाव केला हे जाणून आम्हाला धक्का बसला आहे. मुख्य सचिवांना त्यांच्या या वर्तनाचे स्पष्टीकरण द्यावेच लागेल.'

तक्रारदारांच्या वकिलांचा आक्षेप

राज्य सरकारने पेन्शनरी फायद्यांबाबत लागू केलेले नियम कायद्याच्या विरोधात असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. प्रतिज्ञापत्र दुरुस्त करण्याऐवजी मुख्य सचिवांनी उलट बदल केलेल्या नियमांचे समर्थन केले. त्यामुळे तक्रारदारांच्या वकिलाने त्यास आक्षेप घेतला.

टॅग्स :goaगोवाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय