शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

डॉक्टर झाल्यावर परदेशात जाण्याची मानसिकता बदला; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2024 07:48 IST

आयएमए फोंडाचा सुवर्ण महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यात आरोग्यविषयक साधन सुविधा निर्माण करण्यात सरकार पुढे आहे. लोकांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही गोवा मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या जागा वाढवल्या; परंतु डॉक्टर झाल्यानंतर विदेशात जाण्याची मानसिकता निर्माण होऊ लागली आहे. तेथे डॉक्टरांना चांगला मोबदला मिळत असला तरी येथील आरोग्य क्षेत्रावर त्यामुळे अप्रत्यक्षपणे ताण येतो. त्यामुळे येथील डॉक्टरांनी गोव्यातच राहून गोमंतकीयांची सेवा करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या फोंडा शाखेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. व्ही. अशोकन्, डॉ. दत्ताराम देसाई, डॉ. श्वेता खांडेपारकर, डॉ. सूरज काणेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, एकेकाळी फॅमिली डॉक्टर संकल्पना होती. आता कॉर्पोरेट काळात डॉक्टर व पेशंटमधील जिव्हाळा कमी होऊ लागला आहे. त्याला कारण केवळ डॉक्टर नाहीत. आज सरकारी इस्पितळात लोकांच्या रांगा दिसून येतात. डॉक्टरांना दीडशे दोनशे लोकांना तपासावे लागते. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांमधील जिव्हाळा निर्माण करण्यात वेळ कमी मिळतो.

आजारी पडल्यावर खर्च करण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून लोकांनी खर्च करायला हवा. लोक आजारी पडू नयेत, हा ट्रेंड आता डॉक्टरांनी निर्माण करायला हवा. त्यासाठी सरकार मदत करायला तयार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी ए.व्ही. अशोकन् म्हणाले की, आपल्या देशाला आयएमए फोंडा शाखेचा अभिमान आहे. पेलेटिव्ह केअर क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाची देशात दखल घेतली जात आहे. यापुढेसुद्धा संस्थेने आपल्या कार्याच्या माध्यमातून आदर्श निर्माण करत राहावे. यावेळी दत्ताराम देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. अजय पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव एरोन सुवारिस यांनी आभार मानले.

'तो' निधी कधीच बंद होणार नाही 

दिलासाच्या माध्यमातून पॉलिटिव्ह केअर क्षेत्रात आयएमए फोंडाने जे काम केले आहे, त्याचा आदर्श आज प्रत्येकजण घेत आहे. त्यांची तळमळ लक्षात घेऊन मी सरकारच्या माध्यमातून त्यांना खास अनुदान मिळवून दिले आहे. पुढे कोणीही मुख्यमंत्री झाला तरी त्यांच्या निधीवर टाच येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

डायलिसिसच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता 

राज्यात डायलिसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री म्हणून मलाही चिंता आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात डायलिसिस युनिट सुरू केले आहे. तरीसुद्धा ती अपुरी पडू लागली आहेत. यावर आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी अभ्यास करायला हवा. सुदृढ आरोग्यशैली निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत