शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारितेसमोर आव्हान विश्वासार्हता जपण्याचे - दिनकर रायकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 21:07 IST

विश्वासार्हता टिकवायची असेल तर पत्रकारांनी अष्टोप्रहर जागृत राहून तपशिलांविषयी खात्री पटल्यावरच बातमी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी येथे शुक्रवारी केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने माहिती आणि प्रसिद्ध खात्याने रायकर यांचे ‘पत्रकारिता : नैतिकता आणि डिजिटल युगातील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजिले होते.

पणजी : तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता गतीशरण झालेली आहे. गतीच्या हव्यासातून दिलेल्या बातम्यांच्या आणि पत्रकारितेच्याही विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विश्वासार्हता टिकवायची असेल तर पत्रकारांनी अष्टोप्रहर जागृत राहून तपशिलांविषयी खात्री पटल्यावरच बातमी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी येथे शुक्रवारी केले.राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने माहिती आणि प्रसिद्ध खात्याने रायकर यांचे ‘पत्रकारिता : नैतिकता आणि डिजिटल युगातील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजिले होते. इन्स्टिट्यूट आॅफ मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव सुधीर महाजन, संचालक गुरुदास पिळर्णकर, गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर उपस्थित होते. ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी रायकर यांची ओळख करून दिली.रायकर यांनी आणीबाणीच्या काळातील पत्रकारितेवर लादलेल्या निर्बंधांची माहिती भाषणाच्या प्रारंभी दिली. त्या वेळी काँग्रेसच्या विरोधात सर्वत्र एकच उमेदवार उभा करण्यास माध्यमांनी विरोधकांना भाग पाडले. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचा पाडाव झाल्यानंतर जी पहिली घटना दुरुस्ती मंजूर केली ती आणीबाणीची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेणारी होती, असे सांगत हे प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे घडल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर तंत्रज्ञानाच्या गतीमुळे पत्रकारितेचे स्वरूप कसे बदलले आहे, याचा ऊहापोह त्यांनी केला. धैर्य, विश्वासार्हता आणि सत्य ही पत्रकारितेची ताकद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या गतीमुळे चुकीच्या बातम्यांचेही वहन गतीने होते आहे आणि पत्रकारितेपुढे हे मोठे आव्हान आहे. अशी आव्हाने पेलली पाहिजेत. त्यासाठीच बातमीची खात्री करा, खात्रीशीर बातमीच प्रसिद्ध करा आणि विश्वासार्हता जपा, असा संदेश त्यांनी पत्रकारांना दिला. केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्यातील कथित संघर्षाच्या बातमीचे उदाहरण देत शहानिशा न करताच यासंदर्भात येणाऱ्या बातम्या एकूणच विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणाºया असून हे प्रकार राष्ट्रीय पातळीवरही घडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.एक्स्क्लुझिव्ह, सुपर एक्स्क्लुझिव्ह आणि ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात वर्तमानपत्रे दुसºया दिवशी जुन्याच बातम्या देतात, मग त्यांचे अस्तित्व कसे राहील, असा प्रश्न रायकर यांनी उपस्थित केला.तंत्रज्ञानाच्या गतीत आता माहिती खूप असते, तिथे संशोधन नसते. नुसती माहिती म्हणजे बातमी नव्हे, असे सांगत त्यांनी असंतुष्ट पत्रकारितेच्या धोक्यावर बोट ठेवले. खूप माहिती असणे ही सामग्री (डाटा) झाली; पण सामग्री आणि बातमीत फरक आहे. याचा विचार न होता स्पर्धेच्या गतीत एका ओळीची ब्रेकिंग न्यूज देण्याची घाई केली जाते. आणि एक कळ (बटण) दाबताच फेक न्यूज इंडस्ट्री आकाराला येते. देशातील हा अत्यंत घातक प्रवाह आहे. लोकशाहीसमोरचे हे धोके आहेत. त्यावर तातडीची उत्तरे नसली तरी समाधान सापडेल याबाबत आपण आशावादी आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा