शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

पत्रकारितेसमोर आव्हान विश्वासार्हता जपण्याचे - दिनकर रायकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 21:07 IST

विश्वासार्हता टिकवायची असेल तर पत्रकारांनी अष्टोप्रहर जागृत राहून तपशिलांविषयी खात्री पटल्यावरच बातमी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी येथे शुक्रवारी केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने माहिती आणि प्रसिद्ध खात्याने रायकर यांचे ‘पत्रकारिता : नैतिकता आणि डिजिटल युगातील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजिले होते.

पणजी : तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता गतीशरण झालेली आहे. गतीच्या हव्यासातून दिलेल्या बातम्यांच्या आणि पत्रकारितेच्याही विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विश्वासार्हता टिकवायची असेल तर पत्रकारांनी अष्टोप्रहर जागृत राहून तपशिलांविषयी खात्री पटल्यावरच बातमी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी येथे शुक्रवारी केले.राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने माहिती आणि प्रसिद्ध खात्याने रायकर यांचे ‘पत्रकारिता : नैतिकता आणि डिजिटल युगातील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजिले होते. इन्स्टिट्यूट आॅफ मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव सुधीर महाजन, संचालक गुरुदास पिळर्णकर, गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर उपस्थित होते. ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी रायकर यांची ओळख करून दिली.रायकर यांनी आणीबाणीच्या काळातील पत्रकारितेवर लादलेल्या निर्बंधांची माहिती भाषणाच्या प्रारंभी दिली. त्या वेळी काँग्रेसच्या विरोधात सर्वत्र एकच उमेदवार उभा करण्यास माध्यमांनी विरोधकांना भाग पाडले. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचा पाडाव झाल्यानंतर जी पहिली घटना दुरुस्ती मंजूर केली ती आणीबाणीची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेणारी होती, असे सांगत हे प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे घडल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर तंत्रज्ञानाच्या गतीमुळे पत्रकारितेचे स्वरूप कसे बदलले आहे, याचा ऊहापोह त्यांनी केला. धैर्य, विश्वासार्हता आणि सत्य ही पत्रकारितेची ताकद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या गतीमुळे चुकीच्या बातम्यांचेही वहन गतीने होते आहे आणि पत्रकारितेपुढे हे मोठे आव्हान आहे. अशी आव्हाने पेलली पाहिजेत. त्यासाठीच बातमीची खात्री करा, खात्रीशीर बातमीच प्रसिद्ध करा आणि विश्वासार्हता जपा, असा संदेश त्यांनी पत्रकारांना दिला. केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्यातील कथित संघर्षाच्या बातमीचे उदाहरण देत शहानिशा न करताच यासंदर्भात येणाऱ्या बातम्या एकूणच विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणाºया असून हे प्रकार राष्ट्रीय पातळीवरही घडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.एक्स्क्लुझिव्ह, सुपर एक्स्क्लुझिव्ह आणि ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात वर्तमानपत्रे दुसºया दिवशी जुन्याच बातम्या देतात, मग त्यांचे अस्तित्व कसे राहील, असा प्रश्न रायकर यांनी उपस्थित केला.तंत्रज्ञानाच्या गतीत आता माहिती खूप असते, तिथे संशोधन नसते. नुसती माहिती म्हणजे बातमी नव्हे, असे सांगत त्यांनी असंतुष्ट पत्रकारितेच्या धोक्यावर बोट ठेवले. खूप माहिती असणे ही सामग्री (डाटा) झाली; पण सामग्री आणि बातमीत फरक आहे. याचा विचार न होता स्पर्धेच्या गतीत एका ओळीची ब्रेकिंग न्यूज देण्याची घाई केली जाते. आणि एक कळ (बटण) दाबताच फेक न्यूज इंडस्ट्री आकाराला येते. देशातील हा अत्यंत घातक प्रवाह आहे. लोकशाहीसमोरचे हे धोके आहेत. त्यावर तातडीची उत्तरे नसली तरी समाधान सापडेल याबाबत आपण आशावादी आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा