शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

म्हादईबाबत कर्नाटकला झुकते माप; केंद्र सरकारच्या निर्णयावर गोव्यात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:43 IST

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आमची भीती खरी ठरली, असे म्हणताना म्हादई बाबतीत आता सर्व आशा मावळल्याची खंत व्यक्त केली आहे.

पणजी : म्हादईबाबत पाणी तंटा लवादाचा कर्नाटकच्या बाजूने असलेला अवॉर्ड केंद्र सरकारने अधिसूचित केल्याने गोव्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या प्रश्नावर केंद्राने गोव्याला वाऱ्यावर सोडल्याचा करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आता म्हादईबाबतच्या सर्व आशा मावळल्या असल्याचे म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हादईबाबतीत केंद्र सरकारने गोव्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकचा पाणी वळविण्याचा हेतू स्पष्ट आहे. गोव्यातील जनतेचा विश्वासघात झालेला आहे. भाजप सरकारने गोमंतकीयांची अवहेलना केली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया कामत यांनी दिली. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने कर्नाटकला झुकते माप दिल्याचे आता उघड झालेले आहे. केंद्रीय जलस्रोतमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटल्यानंतर अवघ्या काही तासातच अधिसूचना आलीच कशी? असा सवाल त्यांनी केला.  सरकार दबावाला बळी पडले असल्याचा आरोप त्यांनी केला. कामत म्हणाले की एका बाजूने मुख्यमंत्री प्रमोद सावंत  म्हादईबाबतचमोठी आश्वासने देत होते तर दुसर्‍या बाजूला केंद्र सरकार अधिसूचना काढायच्या तयारीत होते. गोव्याला याबाबतीत वाऱ्यावर सोडून विश्वासघात केलेला आहे. संशयाची सुई राज्य सरकारवरच फिरत आहे. गेल्या काही महिन्यात राज्य सरकारने घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. म्हादई प्रश्नावर एक दिवशीय विधानसभेच्या खास अधिवेशनाची मागणी आम्ही केली होती, परंतु ती मान्य केली नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जावे असे आम्ही मागितले होते तेही झाले. तसेच विरोधी आमदारांनी विधानसभेत संयुक्तपणे या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव दिला होता तोही चर्चेला घेतला नाही, असा आरोप कामत यांनी केला ते म्हणाले की, सरकारला  वस्तुस्थिती लपवायची आहे. कारण ती उघड झाली तर सरकार तोंडघशी पडणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  श्वेतपत्रिकाही नाकारली. या सरकारने गोव्याच्या जनतेला उत्तर द्यायला हवे.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आमची भीती खरी ठरली, असे म्हणताना म्हादई बाबतीत आता सर्व आशा मावळ्याची खंत व्यक्त केली आहे. मदतीसाठी मी ‌हे केले आणि मी ते केले, असे सांगणारे सावंत सरकार आता उघडे पडले आहे आणि या सरकारचा  खोटारडेपणा जनतेसमोर आला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया सरदेसाई यांनी दिली. या प्रश्नावर आता भाजप तसेच मुख्यमंत्री प्रमोद यांना काय सांगायचे आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

विश्वासघात केला : काँग्रेस प्रदेशाध्यक्षमुख्यमंत्र्यांनी म्हादई कर्नाटकला विकली असा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. लवादाचा अवॉर्ड अधिसूचित झाल्याने गोव्याचा हा  विश्वासघात असून राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार विश्वासघातकी आहे हे स्पष्ट झाले आहे.  गोव्याच्या हिताचे या सरकारला सोयरसुतक नाही आणि सावंत पर्रीकरांचीच पटकथा पुढे चालवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.गोमंतकीयांचा घात : गोवा प्रोग्रेसिव्ह फ्रंटगोवा प्रोग्रेसिव्ह फ्रंटचे महेश म्हांबरे यांनी यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. संतप्त प्रतिक्रीया देताना ते म्हणाले की, केंद्रातील, कर्नाटकातील आणि गोव्यातील भाजप सरकारने मिळून गोमंतकीय जनतेचा घात केलेला आहे. 17 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला ईसी बाबत मुभा देणारे पत्र दिल्याच्या घटनेपासून 24 डिसेंबर पर्यंतचा घटनाक्रम पाहता सर्व गोष्टी कर्नाटकच्या बाजूने होत असल्याची कल्पना आम्हाला नाताळातच आली होती.  म्हादई  सरकारने विकली. गोवा सरकारने म्हादईसाठी काहीच केले नाही. आता रस्त्यावर उतरून आंदोलन अधिक तीव्र करण्याव्यतिरिक्त पर्याय राहिलेला नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयWaterपाणीCentral Governmentकेंद्र सरकारKarnatakकर्नाटक