शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

केंद्रीय नेतृत्व योग्यवेळी चर्चा करील: सदानंद तानावडे; 'लोकमत'ची बातमी ठरली राज्यभर चर्चेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 08:45 IST

'लोकमत'ने सोमवारी दिलेल्या बातमीने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा घडून आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'लोकमत'ने सोमवारी दिलेल्या बातमीने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा घडून आली. राज्यभर त्याविषयी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सोमवारी सायंकाळी सविस्तर भाष्य केले. मंत्रिमंडळ फेररचनेचा विषय सध्या आलेला नाही, जेव्हा कधी तो येईल तेव्हा पक्षाचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करील. केंद्रीय नेतृत्व योग्यवेळी योग्य निर्णय घेईल, असे तानावडे यांनी जाहीर केले.

तानावडे म्हणाले, की सरकारमध्ये नेतृत्व बदलाचा विषय आलेला नाही. मंत्रिमंडळ फेररचनेचा विषयही आलेला नाही. सध्या तसे काही नाही. अनेकजण फोन करून त्याविषयी विचारतात, त्या केवळ अफवा आहेत.

तानावडे म्हणाले की, प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीत कुणी बोलावले होते हा प्रश्न आहे. त्यांना बोलावले नव्हते. समजा एखादा विषय भविष्यात आलाच तर केंद्रीय नेते गोव्यात येतील, ते चर्चा करतील. शेवटी भाजपची एक प्रक्रिया असते. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चेत सध्या तरी तथ्य नाही. लिडरशीप बदलण्याबाबत सध्या तरी विषय चर्चेत आलेला नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल हे स्पष्ट असल्याचे पक्ष सूत्रांकडून कळते. मात्र या विषयावर आता मुख्यमंत्री सावंत किंवा प्रदेशाध्यक्ष तानावडे बोलणे टाळतात. प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीला बोलावले आहे, असा निरोप कुणी दिला होता? याचा शोध सध्या भाजपचे काही नेते घेत आहेत.

सध्या बदल नाही 

तानावडे म्हणाले की मंत्री विश्वजीत राणे हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. ते पंतप्रधानांना भेटले यात राजकारण काही नाही. केंद्रीय मंत्र्यांनाही विश्वजीत भेटले यात गैर काही नाही. मुख्यमंत्र्यांसोबत नुकतेच तीन आमदार राजस्थानला जाऊन आले. त्यातही चुकीचे काही नाही. त्यात राजकारण कसलेच नाही. गोव्यात सध्या कसल्याच प्रकारच्या बदलाचा विषय नाही. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण