शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

केंद्रीय नेतृत्व योग्यवेळी चर्चा करील: सदानंद तानावडे; 'लोकमत'ची बातमी ठरली राज्यभर चर्चेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 08:45 IST

'लोकमत'ने सोमवारी दिलेल्या बातमीने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा घडून आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'लोकमत'ने सोमवारी दिलेल्या बातमीने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा घडून आली. राज्यभर त्याविषयी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सोमवारी सायंकाळी सविस्तर भाष्य केले. मंत्रिमंडळ फेररचनेचा विषय सध्या आलेला नाही, जेव्हा कधी तो येईल तेव्हा पक्षाचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करील. केंद्रीय नेतृत्व योग्यवेळी योग्य निर्णय घेईल, असे तानावडे यांनी जाहीर केले.

तानावडे म्हणाले, की सरकारमध्ये नेतृत्व बदलाचा विषय आलेला नाही. मंत्रिमंडळ फेररचनेचा विषयही आलेला नाही. सध्या तसे काही नाही. अनेकजण फोन करून त्याविषयी विचारतात, त्या केवळ अफवा आहेत.

तानावडे म्हणाले की, प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीत कुणी बोलावले होते हा प्रश्न आहे. त्यांना बोलावले नव्हते. समजा एखादा विषय भविष्यात आलाच तर केंद्रीय नेते गोव्यात येतील, ते चर्चा करतील. शेवटी भाजपची एक प्रक्रिया असते. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चेत सध्या तरी तथ्य नाही. लिडरशीप बदलण्याबाबत सध्या तरी विषय चर्चेत आलेला नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल हे स्पष्ट असल्याचे पक्ष सूत्रांकडून कळते. मात्र या विषयावर आता मुख्यमंत्री सावंत किंवा प्रदेशाध्यक्ष तानावडे बोलणे टाळतात. प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीला बोलावले आहे, असा निरोप कुणी दिला होता? याचा शोध सध्या भाजपचे काही नेते घेत आहेत.

सध्या बदल नाही 

तानावडे म्हणाले की मंत्री विश्वजीत राणे हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. ते पंतप्रधानांना भेटले यात राजकारण काही नाही. केंद्रीय मंत्र्यांनाही विश्वजीत भेटले यात गैर काही नाही. मुख्यमंत्र्यांसोबत नुकतेच तीन आमदार राजस्थानला जाऊन आले. त्यातही चुकीचे काही नाही. त्यात राजकारण कसलेच नाही. गोव्यात सध्या कसल्याच प्रकारच्या बदलाचा विषय नाही. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण