शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

म्हादईप्रश्नी केंद्र परवानगी देऊ शकणार नाही : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:45 IST

गोव्याच्या वकिलांचे पथक दिल्लीत पोहोचलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होत असून गोव्याच्या वकिलांचे पथक दिल्लीत पोहोचलेले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, 'आमच्या वकिलांचे पथक दिल्लीत आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. 'प्रवाह' प्राधिकरण स्थापन झालेले आहे. आता या प्राधिकरणामार्फतच सर्व परवाने घ्यावे लागतील. सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडणार आहोत.

म्हादई जल तंटा लवादाने म्हादईच्या पाणी वाटपाबाबत दिलेल्या निवाड्याला गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कर्नाटकला केवळ पिण्यासाठीच पाणी वापरता येईल, असे लवादाने स्पष्ट करूनही कर्नाटकने म्हादईवरील आपले प्रकल्प पुढे रेटून केंद्रीय जल आयोगाकडून कळसा भंडुरा प्रकल्प डीपीआरना मंजुरीही मिळवली आहे. गोवा सरकारने या विरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

केंद्रीय जल आयोगाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने म्हादई जल प्राधिकरण ( प्रवाह) स्थापन करण्यास मान्यता दिली. त्याचे मुख्यालय पणजीत होणार आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने चार दिवसांपूर्वीच विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना कळसा भंडुरा प्रकल्पांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. प्रवाह प्राधिकरण स्थापन केल्याने आता केंद्र सरकारसुद्धा कर्नाटकला पाणी वळविण्यासाठी परवानगी देऊ शकणार नाही, असे एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, सुदीप ताम्हणकर यांनी म्हादईप्रश्नी विशेष याचिका सादर केली आहे. ताम्हणकर म्हणाले, की म्हादईबाबत सरकार गंभीर नाही. इतकी वर्षे सरकारने म्हादईचा लढा लढण्यासाठी न्यायालयात ५० हून अधिक वकिलांची नेमणूक केली आहे. म्हादईसाठीच्या बैठका पंचतारांकित हॉटेलांमध्ये घेतल्या गेल्या. यावर सरकारने कोट्यवधी रुपये उधळले. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या ७१ पानी प्रतिज्ञापत्रात तसे नमूद केल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत