शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याचा गैरवापर करून आडनाव बदलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:27 IST

आमदारांच्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नावे, आडनावे बदलून राज्यात राहणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. यातून अनेक धोके निर्माण झाले आहेत, हेही मान्य आहे. याच पार्श्वभूमीवर आताच्या आणि मागील काही वर्षामधील अशा प्रकरणांचा पुन्हा नव्याने अभ्यास केला जाईल आणि यात जर काही फसवणूक आढळली तर गुन्हेगारांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी अधिवेशनात दिली.

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकजण आडनाव बदलून राज्यातील प्रसिद्ध आडनावे ठेवण्याचे कारस्थान करत आहेत, असा मुद्दा लक्षवेधी सूचनेवेळी आमदार वीरेश बोरकर, विजय सरदेसाई व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडला होता. त्यावर आमदारांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.

आमदारांच्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. आमचे सरकार या मुद्दयाबाबत खूप गंभीर असून, यापुढे असे काही होणार नाही याची काळजी घेतली जाईल. मला माहिती आहे की, अशी नावे, आडनावे बदलली की धर्म आणि जातही बदलते. त्यामुळे भविष्यात समाजाला देखील याचा धोका उद्भवू शकतो, पण आम्हाला हेही मान्य करावे लागणार की काही ठिकाणी पूर्ण कायद्याच्या चौकटीत राहून या गोष्टी केल्या जातात. मात्र, आता बोगस गोष्टींवर आळा बसण्यासाठी जर कायद्यातही काही बदल करावा लागणार आहे असेल तर तो देखील करू, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

आडनावे बदलली की धर्म आणि जातही बदलते. आता यातून समाजावरही मोठा प्रभाव पडू शकतो. म्हणून या कायद्यातच बदल व्हायला हवा आणि याच गोष्टी आम्ही आमच्या पोगो बिलमध्ये देखील हे नमूद केल्या आहेत. म्हणून पोगो बिल महत्त्वाचे आहे. कायद्यात बदल झाला तरच या गोष्टींवर आळा बसू शकतो, असे आमदार वीरेश बोरकर यांनी म्हटले.

केवळ तुरुंगवास नको, दंडही ठोठावावा : विजय सरदेसाई

नाव आणि आडनाव बदलून राज्यात राहणे हे गंभीर प्रकरण आहे. यातून राज्यातील प्राचीन आडनावाचे देखील महत्त्व कमी होणार आहे. सामाजिक समस्या देखील नक्कीच उद्भवणार आहे. त्यामुळे सरकार पोगो बिल पास करण्याचा विचार येथे करू शकते. कारण अनेकदा अशा प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असते. पुढे हेच नाव, आडनाव बदललेले लोक भाजपचे उमेदवारही होऊ शकतात. त्यामुळे तुरुंगवासासोबत आर्थिक दंडही आवश्यक आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPramod Sawantप्रमोद सावंत