शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

कायद्याचा गैरवापर करून आडनाव बदलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:27 IST

आमदारांच्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नावे, आडनावे बदलून राज्यात राहणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. यातून अनेक धोके निर्माण झाले आहेत, हेही मान्य आहे. याच पार्श्वभूमीवर आताच्या आणि मागील काही वर्षामधील अशा प्रकरणांचा पुन्हा नव्याने अभ्यास केला जाईल आणि यात जर काही फसवणूक आढळली तर गुन्हेगारांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी अधिवेशनात दिली.

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकजण आडनाव बदलून राज्यातील प्रसिद्ध आडनावे ठेवण्याचे कारस्थान करत आहेत, असा मुद्दा लक्षवेधी सूचनेवेळी आमदार वीरेश बोरकर, विजय सरदेसाई व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडला होता. त्यावर आमदारांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.

आमदारांच्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. आमचे सरकार या मुद्दयाबाबत खूप गंभीर असून, यापुढे असे काही होणार नाही याची काळजी घेतली जाईल. मला माहिती आहे की, अशी नावे, आडनावे बदलली की धर्म आणि जातही बदलते. त्यामुळे भविष्यात समाजाला देखील याचा धोका उद्भवू शकतो, पण आम्हाला हेही मान्य करावे लागणार की काही ठिकाणी पूर्ण कायद्याच्या चौकटीत राहून या गोष्टी केल्या जातात. मात्र, आता बोगस गोष्टींवर आळा बसण्यासाठी जर कायद्यातही काही बदल करावा लागणार आहे असेल तर तो देखील करू, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

आडनावे बदलली की धर्म आणि जातही बदलते. आता यातून समाजावरही मोठा प्रभाव पडू शकतो. म्हणून या कायद्यातच बदल व्हायला हवा आणि याच गोष्टी आम्ही आमच्या पोगो बिलमध्ये देखील हे नमूद केल्या आहेत. म्हणून पोगो बिल महत्त्वाचे आहे. कायद्यात बदल झाला तरच या गोष्टींवर आळा बसू शकतो, असे आमदार वीरेश बोरकर यांनी म्हटले.

केवळ तुरुंगवास नको, दंडही ठोठावावा : विजय सरदेसाई

नाव आणि आडनाव बदलून राज्यात राहणे हे गंभीर प्रकरण आहे. यातून राज्यातील प्राचीन आडनावाचे देखील महत्त्व कमी होणार आहे. सामाजिक समस्या देखील नक्कीच उद्भवणार आहे. त्यामुळे सरकार पोगो बिल पास करण्याचा विचार येथे करू शकते. कारण अनेकदा अशा प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असते. पुढे हेच नाव, आडनाव बदललेले लोक भाजपचे उमेदवारही होऊ शकतात. त्यामुळे तुरुंगवासासोबत आर्थिक दंडही आवश्यक आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPramod Sawantप्रमोद सावंत