शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

कायद्याचा गैरवापर करून आडनाव बदलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:27 IST

आमदारांच्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नावे, आडनावे बदलून राज्यात राहणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. यातून अनेक धोके निर्माण झाले आहेत, हेही मान्य आहे. याच पार्श्वभूमीवर आताच्या आणि मागील काही वर्षामधील अशा प्रकरणांचा पुन्हा नव्याने अभ्यास केला जाईल आणि यात जर काही फसवणूक आढळली तर गुन्हेगारांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी अधिवेशनात दिली.

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकजण आडनाव बदलून राज्यातील प्रसिद्ध आडनावे ठेवण्याचे कारस्थान करत आहेत, असा मुद्दा लक्षवेधी सूचनेवेळी आमदार वीरेश बोरकर, विजय सरदेसाई व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडला होता. त्यावर आमदारांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.

आमदारांच्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. आमचे सरकार या मुद्दयाबाबत खूप गंभीर असून, यापुढे असे काही होणार नाही याची काळजी घेतली जाईल. मला माहिती आहे की, अशी नावे, आडनावे बदलली की धर्म आणि जातही बदलते. त्यामुळे भविष्यात समाजाला देखील याचा धोका उद्भवू शकतो, पण आम्हाला हेही मान्य करावे लागणार की काही ठिकाणी पूर्ण कायद्याच्या चौकटीत राहून या गोष्टी केल्या जातात. मात्र, आता बोगस गोष्टींवर आळा बसण्यासाठी जर कायद्यातही काही बदल करावा लागणार आहे असेल तर तो देखील करू, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

आडनावे बदलली की धर्म आणि जातही बदलते. आता यातून समाजावरही मोठा प्रभाव पडू शकतो. म्हणून या कायद्यातच बदल व्हायला हवा आणि याच गोष्टी आम्ही आमच्या पोगो बिलमध्ये देखील हे नमूद केल्या आहेत. म्हणून पोगो बिल महत्त्वाचे आहे. कायद्यात बदल झाला तरच या गोष्टींवर आळा बसू शकतो, असे आमदार वीरेश बोरकर यांनी म्हटले.

केवळ तुरुंगवास नको, दंडही ठोठावावा : विजय सरदेसाई

नाव आणि आडनाव बदलून राज्यात राहणे हे गंभीर प्रकरण आहे. यातून राज्यातील प्राचीन आडनावाचे देखील महत्त्व कमी होणार आहे. सामाजिक समस्या देखील नक्कीच उद्भवणार आहे. त्यामुळे सरकार पोगो बिल पास करण्याचा विचार येथे करू शकते. कारण अनेकदा अशा प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असते. पुढे हेच नाव, आडनाव बदललेले लोक भाजपचे उमेदवारही होऊ शकतात. त्यामुळे तुरुंगवासासोबत आर्थिक दंडही आवश्यक आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPramod Sawantप्रमोद सावंत