शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

राजकारण्यांकडून फोन येतात, परंतु वस्तुस्थिती पटवून दिल्यानंतर...: दत्तगुरू सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:02 IST

कलंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: चोरीला गेलेले मोबाईल फोन ट्रॅक करण्यासाठी पोलिस विशेष मोबाईल तंत्रज्ञान वापरत आहेत. कळंगुट पोलिसांनी असे ४१ महागडे पुन्हा ताब्यात घेतले आहेत. महागडे चोरीचे मोबाईल कमी पैशांत विकत घेणारे पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यावर कुरियरनेदेखील पाठवून देतात.

"कलंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ही माहिती दिली. अशा प्रकारे जप्त केलेल्या मोबाईल संचांमध्ये आयफोन तसेच इतर महागड्या मोबाईल्सचा समावेश आहे. ६० ते ८० लाखांचा ऐवज जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

सावंत यांनी यापूर्वी खाण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीमध्येही काही काळ काम केले आहे खाण घोटाळ्याच्या व्याप्तीसंबंधी विचारले असता ते म्हणाले की, 'एसआयटी पथकात असताना तपास अधिकारी म्हणन मी एक अहवाल दिला होता. त्यात एका बेकायदा खाण प्रकरणात १५० बेकायदा खाण प्रकरणात १५० होता. एका खाण व्यावसायिकाचे ६९ कोटी रुपये असलेले बँक खाते गोठवले परंतु नंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यावरील स्थगिती उठवली होती, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटनस्थळामुळे मोठे आव्हान

कळंगुट पोलिस स्थानक हे सोन्याची अंडी देणारे पोलीस स्थानक अशी सर्वांची समजूत आहे. या पोलिस स्थानकात बदली करुन घेण्यासाठी अनेक पोलिस अधिकारी धडपडत असतात. याबाबत विचारले असता ते म्हणाले की. सोन्याची अंडी वगैरे देणारे पोलिस स्थानक हा चुकीचा समज आहे. पर्यटनस्थळ असल्याने येथे मोठे आव्हान आहे.

...म्हणून होतात पर्यटकांबरोबर वाद

एका प्रश्नावर सावंत म्हणाले की, 'पर्यटक बहुतांश वेळा मद्यप्राशन करून स्थानिकांबरोबर हुज्जत घालतात. त्यामुळे मारामारी होते. अनेकदा शॅकमध्ये अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्यानेही वाद होतात.

...तर परिस्थिती निवळते

राजकारण्यांकडून अनेकदा फोन येतात, परंतु त्यांना वस्तुस्थिती पटवून दिली की, नंतर कोणताही दबाव येत नाही. पोलिस अधिकाऱ्याने आपल्या कामाबाबत प्रामाणिक राहायला हवे, असे सावंत एका प्रश्नावर सावंत म्हणाले.

एक हजार मोबाइल कायमचेच बंद

जे मोबाइल संच हरवल्यावर किंवा चोरीला गेल्यावर वारंवार प्रयत्न करूनही ट्रॅकिंगला लावल्यानंतरही सापडत नाहीत, ते मोबाइल कायमचे बंद करण्याचा पर्याय पोलिसांकडे आहे. ईएमआई क्रमांकावरून असे मोबाइल कायमचे बंद केले, तर मोबाइल चोरटा त्याचा कधीच वापर करू शकणार नाही. असे सुमारे १ हजारपेक्षा अधिक मोबाइल कायमचेच बंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक सावंत यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमत