शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांकडून फोन येतात, परंतु वस्तुस्थिती पटवून दिल्यानंतर...: दत्तगुरू सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:02 IST

कलंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: चोरीला गेलेले मोबाईल फोन ट्रॅक करण्यासाठी पोलिस विशेष मोबाईल तंत्रज्ञान वापरत आहेत. कळंगुट पोलिसांनी असे ४१ महागडे पुन्हा ताब्यात घेतले आहेत. महागडे चोरीचे मोबाईल कमी पैशांत विकत घेणारे पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यावर कुरियरनेदेखील पाठवून देतात.

"कलंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ही माहिती दिली. अशा प्रकारे जप्त केलेल्या मोबाईल संचांमध्ये आयफोन तसेच इतर महागड्या मोबाईल्सचा समावेश आहे. ६० ते ८० लाखांचा ऐवज जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

सावंत यांनी यापूर्वी खाण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीमध्येही काही काळ काम केले आहे खाण घोटाळ्याच्या व्याप्तीसंबंधी विचारले असता ते म्हणाले की, 'एसआयटी पथकात असताना तपास अधिकारी म्हणन मी एक अहवाल दिला होता. त्यात एका बेकायदा खाण प्रकरणात १५० बेकायदा खाण प्रकरणात १५० होता. एका खाण व्यावसायिकाचे ६९ कोटी रुपये असलेले बँक खाते गोठवले परंतु नंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यावरील स्थगिती उठवली होती, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटनस्थळामुळे मोठे आव्हान

कळंगुट पोलिस स्थानक हे सोन्याची अंडी देणारे पोलीस स्थानक अशी सर्वांची समजूत आहे. या पोलिस स्थानकात बदली करुन घेण्यासाठी अनेक पोलिस अधिकारी धडपडत असतात. याबाबत विचारले असता ते म्हणाले की. सोन्याची अंडी वगैरे देणारे पोलिस स्थानक हा चुकीचा समज आहे. पर्यटनस्थळ असल्याने येथे मोठे आव्हान आहे.

...म्हणून होतात पर्यटकांबरोबर वाद

एका प्रश्नावर सावंत म्हणाले की, 'पर्यटक बहुतांश वेळा मद्यप्राशन करून स्थानिकांबरोबर हुज्जत घालतात. त्यामुळे मारामारी होते. अनेकदा शॅकमध्ये अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्यानेही वाद होतात.

...तर परिस्थिती निवळते

राजकारण्यांकडून अनेकदा फोन येतात, परंतु त्यांना वस्तुस्थिती पटवून दिली की, नंतर कोणताही दबाव येत नाही. पोलिस अधिकाऱ्याने आपल्या कामाबाबत प्रामाणिक राहायला हवे, असे सावंत एका प्रश्नावर सावंत म्हणाले.

एक हजार मोबाइल कायमचेच बंद

जे मोबाइल संच हरवल्यावर किंवा चोरीला गेल्यावर वारंवार प्रयत्न करूनही ट्रॅकिंगला लावल्यानंतरही सापडत नाहीत, ते मोबाइल कायमचे बंद करण्याचा पर्याय पोलिसांकडे आहे. ईएमआई क्रमांकावरून असे मोबाइल कायमचे बंद केले, तर मोबाइल चोरटा त्याचा कधीच वापर करू शकणार नाही. असे सुमारे १ हजारपेक्षा अधिक मोबाइल कायमचेच बंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक सावंत यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमत