शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

राजकारण्यांकडून फोन येतात, परंतु वस्तुस्थिती पटवून दिल्यानंतर...: दत्तगुरू सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:02 IST

कलंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: चोरीला गेलेले मोबाईल फोन ट्रॅक करण्यासाठी पोलिस विशेष मोबाईल तंत्रज्ञान वापरत आहेत. कळंगुट पोलिसांनी असे ४१ महागडे पुन्हा ताब्यात घेतले आहेत. महागडे चोरीचे मोबाईल कमी पैशांत विकत घेणारे पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यावर कुरियरनेदेखील पाठवून देतात.

"कलंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ही माहिती दिली. अशा प्रकारे जप्त केलेल्या मोबाईल संचांमध्ये आयफोन तसेच इतर महागड्या मोबाईल्सचा समावेश आहे. ६० ते ८० लाखांचा ऐवज जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

सावंत यांनी यापूर्वी खाण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीमध्येही काही काळ काम केले आहे खाण घोटाळ्याच्या व्याप्तीसंबंधी विचारले असता ते म्हणाले की, 'एसआयटी पथकात असताना तपास अधिकारी म्हणन मी एक अहवाल दिला होता. त्यात एका बेकायदा खाण प्रकरणात १५० बेकायदा खाण प्रकरणात १५० होता. एका खाण व्यावसायिकाचे ६९ कोटी रुपये असलेले बँक खाते गोठवले परंतु नंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यावरील स्थगिती उठवली होती, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटनस्थळामुळे मोठे आव्हान

कळंगुट पोलिस स्थानक हे सोन्याची अंडी देणारे पोलीस स्थानक अशी सर्वांची समजूत आहे. या पोलिस स्थानकात बदली करुन घेण्यासाठी अनेक पोलिस अधिकारी धडपडत असतात. याबाबत विचारले असता ते म्हणाले की. सोन्याची अंडी वगैरे देणारे पोलिस स्थानक हा चुकीचा समज आहे. पर्यटनस्थळ असल्याने येथे मोठे आव्हान आहे.

...म्हणून होतात पर्यटकांबरोबर वाद

एका प्रश्नावर सावंत म्हणाले की, 'पर्यटक बहुतांश वेळा मद्यप्राशन करून स्थानिकांबरोबर हुज्जत घालतात. त्यामुळे मारामारी होते. अनेकदा शॅकमध्ये अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्यानेही वाद होतात.

...तर परिस्थिती निवळते

राजकारण्यांकडून अनेकदा फोन येतात, परंतु त्यांना वस्तुस्थिती पटवून दिली की, नंतर कोणताही दबाव येत नाही. पोलिस अधिकाऱ्याने आपल्या कामाबाबत प्रामाणिक राहायला हवे, असे सावंत एका प्रश्नावर सावंत म्हणाले.

एक हजार मोबाइल कायमचेच बंद

जे मोबाइल संच हरवल्यावर किंवा चोरीला गेल्यावर वारंवार प्रयत्न करूनही ट्रॅकिंगला लावल्यानंतरही सापडत नाहीत, ते मोबाइल कायमचे बंद करण्याचा पर्याय पोलिसांकडे आहे. ईएमआई क्रमांकावरून असे मोबाइल कायमचे बंद केले, तर मोबाइल चोरटा त्याचा कधीच वापर करू शकणार नाही. असे सुमारे १ हजारपेक्षा अधिक मोबाइल कायमचेच बंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक सावंत यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमत