शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:52 IST

एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

 लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळ बदलास थोडा वेळ लागेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, एक मंत्रिपद सध्या रिकामे आहे ते लवकरात लवकर भरावे हा विचार करून सर्व गोष्टी चालल्या आहेत. मी केंद्रीय नेत्यांशी याबाबतीत बोललेलो आहे. योग्यवेळी योग्य ते होईल.

गोविंद गावडे यांना मंत्रि‍पदावरून हटवण्याचा निर्णय मीच घेतला. पक्षशिस्त व इतर गोष्टीही महत्त्वाच्या असतात. गोविंद हे माझे चांगले मित्र आहेत. राज्याच्या हिताने काही निर्णय घ्यावे लागतात. गोविंदशी माझी कोणतीही कटुता नाही. माझ्या बाजूने मी बिल्कुल साफ आहे. गोविंद आजही त्यांचे काही काम असले तर मला सांगतात आणि मी ते करतो.' गोविंद यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय कठीण गेला का? या प्रश्नावर ते बोलत होते.

मंत्रिमंडळ हे बाराजणांच्या क्रिकेट टीमसारखे आहे. ज्याला बॅटिंग करायला दिली तो प्रसंगी सेंच्युरीही मारतो. परंतु बाराव्या खेळाडूला संधी मिळाली नाही म्हणून तो निष्क्रिय असे म्हणता येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीतच आरक्षण?

एसटींना निवडणुकीत आरक्षण देण्याबाबतची प्रक्रिया वेगाने झाली तर कदाचित २०२७ च्या निवडणुकीतही ते मिळू शकते. २०२७ मध्ये जनगणना होणार आहे. मतदारसंघांची फेररचना २०२७ नंतरच होणार आहे. ही प्रक्रिया जर लवकर झाली तर कदाचित लवकरही आरक्षण मिळू शकते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'आदिवासींसाठी भाजप सरकारने अनेक गोष्टी केलेल्या आहेत. मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी वननिवासी हक्क कायद्याखाली एकालाही सनद मिळाली नव्हती. आता २८०० सनदा या लोकांना बहाल केल्या. येत्या १९ डिसेंबर पूर्वी जास्तीत जास्त अर्ज निकालात काढले जातील.'

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण